शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
सारा तेंडुलकर 'या' बॉलिवूड अभिनेत्याला करतेय 'डेट'? दीपिका पदुकोणसोबत दिलेत भरपूर 'किसिंग सीन'
3
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
4
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
5
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
6
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
7
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
8
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
9
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
10
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
11
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
12
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

भविष्याच्या चिंतेने जन्मदात्यानेच केली दोन मुलांची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2019 00:07 IST

साताऱ्याचे रहिवासी चंद्रकांत अशोक मोहिते (३७) याला मुलांच्या हत्येप्रकरणी अटक झाली.

सातारा/मुंबई : क्षयरोगासह दुर्धर आजारामुळे खालावत चाललेली प्रकृती, त्यात पत्नीसोबत होत असलेल्या सततच्या भांडणातून भविष्यात आपल्यानंतर मुलांचे काय होणार? या चिंतेने जन्मदात्यानेच ७ वर्षांच्या मुलासह ११ वर्षांच्या मुलीची गळा आवळून हत्या केली. मुलांचे मृतदेह डिकीत ठेवून तो मुंबईच्या खाडीत उडी मारून आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात होता. त्यापूर्वीच शिरवळ पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. ही धक्कादायक घटना बुधवारी सातारा येथे उघडकीस आली.साताऱ्याचे रहिवासी चंद्रकांत अशोक मोहिते (३७) याला मुलांच्या हत्येप्रकरणी अटक झाली. चंद्रकांत हा पत्नी, मुलगी गौरवी (११), मुलगा गौरव (७) यांच्यासह घाटकोपरच्या जगदुषानगर येथे राहतो. त्याचा खासगी ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे. त्याला दोन वर्षांपूर्वी दुर्धर आजाराचे निदान झाले होते. त्यावरून पत्नीसोबत त्याचे खटके उडत होते. त्यात, औषधांवरील खर्च पेलवत नव्हता. आपल्या मृत्यूनंतर मुलांचा सांभाळ कोण करणार? या विंवचनेतून त्याने यापूर्वी दोनदा आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे त्याच्या भावाने पोलिसांना सांगितले.दसºयाची सुटी असल्यामुळे चंद्रकांतचा भाऊ हा गावावरून मुंबईला आला होता. त्याला रेल्वे स्टेशनवर सोडून येतो, असे सांगत चंद्रकांतने मुलगी गौरवी आणि मुलगा प्रतीक यांना आपल्या सोबत गाडीत घेतले. भावाला रेल्वे स्टेशनला सोडून आल्यानंतर बराच वेळ होऊनही तो परत न आल्याने पत्नीने त्याच्या मोबाइलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी त्याने मी जवळच आहे, घरी लवकर येतो, असे सांगितले. परंतु बराच वेळ झाला तरी तो आला नाही. काही वेळानंतर त्याने भाऊ सूर्यकांतला फोन केला. ‘मी मुलांना ठार मारून खाडीत आत्महत्या करणार आहे,’ असे त्याने सांगितले. यानंतर भावाने तत्काळ पोलिसांशी संपर्क साधला आणि शोधाशोध सुरू झाली.चंद्रकांत मुंबईहून थेट कारने शिंदेवाडी, ता. खडाळा गावच्या हद्दीत रात्री साडेबाराच्या सुमारास पोहोचला. एका कंपनीसमोरील प्रवेशद्वाराजवळ गाडी उभी केली. दोन्ही मुले गाडीत गाढ झोपेत असताना त्याने हाताने गळा आवळून त्यांची हत्या केली. त्यानंतर त्यांना गाडीच्या डिकीत ठेवले व तो मुंबईच्या दिशेने निघाला. त्याच्या गाडीला जीपीएस असल्याने त्याचे लोकेशन पोलिसांना समजत होते. खेड शिवपूर टोलनाका येथे राजगड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्यासह पोलीस व टोलनाक्याच्या कर्मचाऱ्यांनी गाडी थांबविली व या प्रकाराचा उलगडा झाला. न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.एका चुकीच्या आकड्याने केला घात‘मी मुलांना ठार मारून खाडीत आत्महत्या करणार आहे’ असा कॉल चंद्रकांतने भावाला केला. यानंतर भावाने तत्काळ पोलिसांशी संपर्क साधला आणि त्याचा शोध सुरू केला. चंद्रकांतच्या गाडीला जीपीएस प्रणाली होती. त्याच्या भावाने चंद्रकांतच्या गाडीची इत्थंभूत माहिती मुंबई पोलिसांना दिली होती. मात्र, मुंबई पोलिसांकडून गाडीच्या नंबरचा एक आकडा चुकल्याने त्यांना गाडी टोलनाक्यावर अडवता आली नाही. गाडीचा नंबर बरोबर लिहून घेतला असता तर टोलनाक्यावरच त्याला दोन्ही मुलांसह सहिसलामत पकडता आले असते. परंतु एका चुकीच्या आकड्याने दोन्ही चिमुरड्यांचा घात केला, अशी चर्चा आहे.मुलांना जबरदस्तीने नेलेचंद्रकांतसोबत मुले जाण्यासतयार नव्हती. आपण दांडिया पाहून येऊ, असे त्याने मुलांना सांगितले. तरीसुद्धा मुले त्याच्यासोबत जात नव्हती. परंतु त्याने जबरदस्तीने मुलांना गाडीत घेतले आणि शिरवळला आणले, असे पोलीस चौकशीत समोरआले आहे.

टॅग्स :MurderखूनCrime Newsगुन्हेगारी