शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

जवाहर द्विपावरील बीपीसीएल टँकरला लागलेल्या आगीवर पूर्णतः नियंत्रण, कूलिंग ऑपरेशन सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2017 17:00 IST

मुंबई- भाऊच्या धक्क्याजवळच्या बुचर द्विपावर समुद्रातील तेलाचा साठा करणाऱ्या टाक्यांना लागलेल्या आगीवर आज अखेर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे.

मुंबई- भाऊच्या धक्क्याजवळच्या बुचर द्विपावर समुद्रातील तेलाचा साठा करणाऱ्या टाक्यांना लागलेल्या आगीवर आज अखेर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. अग्निशामक दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून तब्बत 40 तासांनी म्हणजेच तीन दिवसांनी आग पूर्णतः आटोक्यात आणली आहे. सध्या जवाहर द्विपावर कूलिंग ऑपरेशन सुरू असल्याची माहिती अग्निशामक दलाच्या जवानांनी दिली आहे.या आगीमध्ये तेलाच्या टाक्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. शुक्रवारी संध्याकाळी 4.30 वाजण्याच्या सुमारास ही आग लागली होती. आग लागण्याच्या घटनेला 15 तासांहून अधिक काळ उलटला आहे. मात्र हे अग्नितांडव शमलेले नाही. जवाहर द्वीपावर ही दुर्घटना घडली आहे. ही आग मोठी असल्यानं तिच्यावर 40 तासांनी नियंत्रण मिळवलं आहे. आग नेमकी कशामुळे लागली याबाबत कोणतीही ठोस  मिळालेली नाही. मात्र टाक्यांवर वीज कोसळून लाग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला होता.  13 आणि 14 क्रमांकाच्या तेलटाक्यांना आग लागल्याची माहिती समोर आली होती.या बेटावर 15 ते 20 टँक आहेत. त्यापैकी 12 नंबरच्या टँकला आग लागल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. समुद्रातून तेल काढून मोठ्या जहाजाद्वारे जवाहर द्विपवर आणली जातात. तेथे डिझेल साठवून ठेवले जाते. शुक्रवारी सायंकाळी मोठा पाऊस झाला आणि त्याचवेळी तेथे वीज कोसळली. त्यामुळे स्पार्किंग होऊन डिझेल टँकला आग लागली होती. काही वेळातच ही आग भडकली. आता समुद्रात आग विझवण्यासाठी बंब कसे न्यायचे यासाठी यंत्रणा कामाला लागली होती. अखेर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश  आलं आहे.   

टॅग्स :fireआग