शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझं बालवाङ्मय वाचण्याचं वय राहिलेलं नाही"; CM देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांना खोचक टोला
2
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार
3
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
4
Kedarnath Weather Alert: केदारनाथला जात आहात! जाणून घ्या, पुढील ५ दिवस कसे असणार हवामान?
5
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
6
'भाजपवर शंका घेणाऱ्यांनी पाकिस्तानात...' शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांचे मोठे वक्तव्य
7
सचिन तेंडुलकर, धोनीनंतर आता रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनाही मिळणार 'हा' सन्मान?
8
डिफेन्स शेअर्सची घोडदौड सुरुच; मिड आणि स्मॉलकॅपमध्येही तेजी, 'या' स्टॉक्सना मोठं नुकसान
9
Astrology: १७ मे, गजकेसरी योगात शनिकृपेचा ५ राशींवर वर्षाव; घडणार अविस्मरणीय घटना!
10
Astro Tips: शनिवारी सायंकाळी पिंपळपारावार लावा पंचदिप; भाग्योदय येईल समीप!
11
"मला त्यांचं तोंडही पाहायचं नाही..", पाकिस्तानी वडिलांचा प्रचंड द्वेष करते ही अभिनेत्री
12
ना रस्ता... ना बस, मोबाइलला तर रेंजही नाही; अखेर गावकऱ्यांनी बीडमधील वाडीच काढली विक्रीला!
13
अनुष्का तिवारी नाही, कारागिरांसारखी मुलं करत होती शस्त्रक्रिया! 'हेअर ट्रान्सप्लांट' प्रकरणात धक्कादायक खुलासा
14
डोकं फिरलंया! फायटर जेट पाडून भारताने लावली पाकची वाट, तरी इशाक दार यांनी थोपटली त्यांच्या वायुदलाची पाठ
15
परेश रावल यांची 'हेरा फेरी ३' मधून एक्झिट! समोर आलं कारण; चाहत्यांची घोर निराशा
16
टीम कुक यांनी ट्रम्प यांचा सल्ला का धुडकावला? अ‍ॅपल अमेरिकेला स्थलांतरीत केल्यास काय होईल?
17
COVID 19 : हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोना परतला, रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ
18
पाकला पाठिंबा देणं तुर्कस्तान आणि अझरबैजानच्या अंगलट! भारताने थेट वर्मावरच घातला घाव
19
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; हा फक्त ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर पूर्ण चित्रपट दाखवू"
20
माऊंट एव्हरेस्टवर भारतीय गिर्यारोहकाचा मृत्यू, शिखर सर करून परतताना घडली दुर्घटना

समिती करणार उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2017 03:46 IST

मुंबई महानगर प्राधिकरणाचा विकास आराखडा हा केवळ वसईतील १४ गावांपुरताच असल्याचे स्पष्टीकरण फसवे आहे.

पारोळ : मुंबई महानगर प्राधिकरणाचा विकास आराखडा हा केवळ वसईतील १४ गावांपुरताच असल्याचे स्पष्टीकरण फसवे आहे. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सर्वच गावे विकासाच्या नावाने या आराखड्यात समाविष्ट करून त्यांचे लचके तोडण्याचे कारस्थान शिजले आहे. त्या विरोधात ३० जानेवारीला तहसीलदार कचेरीसमोर सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मौन उपोषण करण्यात येणार आहे. यावेळी जास्तीत जास्त नागरीकांनी या आंदोलनात सहभागी व्हावे, असे जाहीर आवाहन फा.फ्रान्सिस दिब्रिटो यांनी केले. हरकती येऊ नये व आराखडा विरोधी आंदोलनाला खिळ बसावी म्हणून बुद्धीभेद करण्याच्या सुरू असलेल्या प्रयत्नांना बळी न पडता भूमीपूत्रांना रस्त्यावर आणणाऱ्या आराखड्याविरोधात हरकती मोठ्या प्रमाणात नोंदवाव्यात,असे जाहिर आवाहन आंतरराष्ट्रीय किर्तीचे नगररचना तज्ञ चंद्रशेखर प्रभू यांनी वसई येथे केले. मुंबई महानगर प्राधिकरणाच्या प्रस्तावित विकास आराखड्यास विरोध करण्यासाठी वसईतील पर्यावरण संवंर्धन समितीतर्फे वसईत सभांद्वारे जनजागरण मोहिम राबविण्यात येत असून, मंगळवारी पापडी येथील थॉमस बाप्टीस्ट महाविद्यालयाच्या सभागृहात सभा पार पडली.फा.जोएल डिकुन्हा अध्यक्ष होते. फा. ज्यो आल्मेडा ,फा.नाझरेथ गब्रु, समीर वर्तक, फा.सालोमन रॉड्रीग्ज मंचावर होते. चंद्रशेखर प्रभू म्हणाले की,परवडणारी घरे द्यायच्या गोंडस घोषणेसोबत विकासाच्या भूलथापा असलेला हा आराखडा समाज पोखरणारे षडयंत्र असून, परदेशातून कोट्यावधी रूपये यावेत, जगातल्या धन-दांडग्यांना मुंबई व मुंबई लगतची आपली उपनगरे पार्कींग झोन करता यावीत, याची तरतूद या आराखड्यात केलेली आहे. हरित पट्टयांमध्येही ८ मजली २४ मीटर उंचीच्या इमारती उभारल्या जाणार असून, डोंगर उध्वस्त करून ,सखल जमीनीत भराव करण्याची मुभा या आराखड्यात असणार आहे. सुरवातीला आराखड्यात समाविष्ट नसलेली गावे महापालिकेच्या ठरावानंतर मात्र आराखड्यात घेता येणार असून ,यासाठी महापालिका सज्ज आहे. गावा-गावांतून ७५ हजार वाहनांची वाहतूक करणारा कोस्टल रोड किंवा घर-दारे उद्ध्वस्त करणारी मेट्रो आम्हाला नको असून, त्यासोबतच येणाऱ्या गगनचुंबी इमारतींचे जंगलही आंम्हाला नको आहे. भिवंडी, वाडा या भागातही आराखड्याविरोधातील आंदोलन जोर धरते आहे. वसईकरांनीही मुदत संपण्यापूर्वी आपल्या हरकती जास्तीत जास्त संख्येने नोंदवाव्यात ,असे आवाहन प्रभू यांनी यावेळी केले. स्थानिक भूमीपुत्रांचे हक्क हिरावणाऱ्या या विकास आराखड्याची खलबते २०१२ पासून सुरू असून, हरित पट्टयातही रासायनिक कारखाने व अन्य औद्योगिकरणास चालना नव्या आराखड्यात दिली जाणार आहे, असा दावा यावेळी केला गेला. (प्रतिनिधी)>प्रत्येक कुटुंबातील १ व्यक्ती व्हावी आंदोलकया विकासाने वसईच्या पर्यावरणावर वरवंटा फिरवला जाणार असल्याने वसईकरांनी संघटीत होऊन या बिल्डरधार्जिण्या विकास आराखड्यास विरोध करण्याची वेळ आली आहे. सभेचे प्रास्तविक प्रा.जॉना वाझ यांनी केले. समीर वर्तक यांनी ही ३९ वी सभा असल्याचे सांगीतले. बिल्डरांसाठी केलेल्या या आराखड्यास विरोध करण्यासाठी प्रत्येक कुटुंबातून एकतरी व्यक्ती सक्रिय झाली पाहिजे , असे यावेळी आवाहन केले गेले.