शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

समिती करणार उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2017 03:46 IST

मुंबई महानगर प्राधिकरणाचा विकास आराखडा हा केवळ वसईतील १४ गावांपुरताच असल्याचे स्पष्टीकरण फसवे आहे.

पारोळ : मुंबई महानगर प्राधिकरणाचा विकास आराखडा हा केवळ वसईतील १४ गावांपुरताच असल्याचे स्पष्टीकरण फसवे आहे. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सर्वच गावे विकासाच्या नावाने या आराखड्यात समाविष्ट करून त्यांचे लचके तोडण्याचे कारस्थान शिजले आहे. त्या विरोधात ३० जानेवारीला तहसीलदार कचेरीसमोर सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मौन उपोषण करण्यात येणार आहे. यावेळी जास्तीत जास्त नागरीकांनी या आंदोलनात सहभागी व्हावे, असे जाहीर आवाहन फा.फ्रान्सिस दिब्रिटो यांनी केले. हरकती येऊ नये व आराखडा विरोधी आंदोलनाला खिळ बसावी म्हणून बुद्धीभेद करण्याच्या सुरू असलेल्या प्रयत्नांना बळी न पडता भूमीपूत्रांना रस्त्यावर आणणाऱ्या आराखड्याविरोधात हरकती मोठ्या प्रमाणात नोंदवाव्यात,असे जाहिर आवाहन आंतरराष्ट्रीय किर्तीचे नगररचना तज्ञ चंद्रशेखर प्रभू यांनी वसई येथे केले. मुंबई महानगर प्राधिकरणाच्या प्रस्तावित विकास आराखड्यास विरोध करण्यासाठी वसईतील पर्यावरण संवंर्धन समितीतर्फे वसईत सभांद्वारे जनजागरण मोहिम राबविण्यात येत असून, मंगळवारी पापडी येथील थॉमस बाप्टीस्ट महाविद्यालयाच्या सभागृहात सभा पार पडली.फा.जोएल डिकुन्हा अध्यक्ष होते. फा. ज्यो आल्मेडा ,फा.नाझरेथ गब्रु, समीर वर्तक, फा.सालोमन रॉड्रीग्ज मंचावर होते. चंद्रशेखर प्रभू म्हणाले की,परवडणारी घरे द्यायच्या गोंडस घोषणेसोबत विकासाच्या भूलथापा असलेला हा आराखडा समाज पोखरणारे षडयंत्र असून, परदेशातून कोट्यावधी रूपये यावेत, जगातल्या धन-दांडग्यांना मुंबई व मुंबई लगतची आपली उपनगरे पार्कींग झोन करता यावीत, याची तरतूद या आराखड्यात केलेली आहे. हरित पट्टयांमध्येही ८ मजली २४ मीटर उंचीच्या इमारती उभारल्या जाणार असून, डोंगर उध्वस्त करून ,सखल जमीनीत भराव करण्याची मुभा या आराखड्यात असणार आहे. सुरवातीला आराखड्यात समाविष्ट नसलेली गावे महापालिकेच्या ठरावानंतर मात्र आराखड्यात घेता येणार असून ,यासाठी महापालिका सज्ज आहे. गावा-गावांतून ७५ हजार वाहनांची वाहतूक करणारा कोस्टल रोड किंवा घर-दारे उद्ध्वस्त करणारी मेट्रो आम्हाला नको असून, त्यासोबतच येणाऱ्या गगनचुंबी इमारतींचे जंगलही आंम्हाला नको आहे. भिवंडी, वाडा या भागातही आराखड्याविरोधातील आंदोलन जोर धरते आहे. वसईकरांनीही मुदत संपण्यापूर्वी आपल्या हरकती जास्तीत जास्त संख्येने नोंदवाव्यात ,असे आवाहन प्रभू यांनी यावेळी केले. स्थानिक भूमीपुत्रांचे हक्क हिरावणाऱ्या या विकास आराखड्याची खलबते २०१२ पासून सुरू असून, हरित पट्टयातही रासायनिक कारखाने व अन्य औद्योगिकरणास चालना नव्या आराखड्यात दिली जाणार आहे, असा दावा यावेळी केला गेला. (प्रतिनिधी)>प्रत्येक कुटुंबातील १ व्यक्ती व्हावी आंदोलकया विकासाने वसईच्या पर्यावरणावर वरवंटा फिरवला जाणार असल्याने वसईकरांनी संघटीत होऊन या बिल्डरधार्जिण्या विकास आराखड्यास विरोध करण्याची वेळ आली आहे. सभेचे प्रास्तविक प्रा.जॉना वाझ यांनी केले. समीर वर्तक यांनी ही ३९ वी सभा असल्याचे सांगीतले. बिल्डरांसाठी केलेल्या या आराखड्यास विरोध करण्यासाठी प्रत्येक कुटुंबातून एकतरी व्यक्ती सक्रिय झाली पाहिजे , असे यावेळी आवाहन केले गेले.