शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

समिती करणार उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2017 03:46 IST

मुंबई महानगर प्राधिकरणाचा विकास आराखडा हा केवळ वसईतील १४ गावांपुरताच असल्याचे स्पष्टीकरण फसवे आहे.

पारोळ : मुंबई महानगर प्राधिकरणाचा विकास आराखडा हा केवळ वसईतील १४ गावांपुरताच असल्याचे स्पष्टीकरण फसवे आहे. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सर्वच गावे विकासाच्या नावाने या आराखड्यात समाविष्ट करून त्यांचे लचके तोडण्याचे कारस्थान शिजले आहे. त्या विरोधात ३० जानेवारीला तहसीलदार कचेरीसमोर सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मौन उपोषण करण्यात येणार आहे. यावेळी जास्तीत जास्त नागरीकांनी या आंदोलनात सहभागी व्हावे, असे जाहीर आवाहन फा.फ्रान्सिस दिब्रिटो यांनी केले. हरकती येऊ नये व आराखडा विरोधी आंदोलनाला खिळ बसावी म्हणून बुद्धीभेद करण्याच्या सुरू असलेल्या प्रयत्नांना बळी न पडता भूमीपूत्रांना रस्त्यावर आणणाऱ्या आराखड्याविरोधात हरकती मोठ्या प्रमाणात नोंदवाव्यात,असे जाहिर आवाहन आंतरराष्ट्रीय किर्तीचे नगररचना तज्ञ चंद्रशेखर प्रभू यांनी वसई येथे केले. मुंबई महानगर प्राधिकरणाच्या प्रस्तावित विकास आराखड्यास विरोध करण्यासाठी वसईतील पर्यावरण संवंर्धन समितीतर्फे वसईत सभांद्वारे जनजागरण मोहिम राबविण्यात येत असून, मंगळवारी पापडी येथील थॉमस बाप्टीस्ट महाविद्यालयाच्या सभागृहात सभा पार पडली.फा.जोएल डिकुन्हा अध्यक्ष होते. फा. ज्यो आल्मेडा ,फा.नाझरेथ गब्रु, समीर वर्तक, फा.सालोमन रॉड्रीग्ज मंचावर होते. चंद्रशेखर प्रभू म्हणाले की,परवडणारी घरे द्यायच्या गोंडस घोषणेसोबत विकासाच्या भूलथापा असलेला हा आराखडा समाज पोखरणारे षडयंत्र असून, परदेशातून कोट्यावधी रूपये यावेत, जगातल्या धन-दांडग्यांना मुंबई व मुंबई लगतची आपली उपनगरे पार्कींग झोन करता यावीत, याची तरतूद या आराखड्यात केलेली आहे. हरित पट्टयांमध्येही ८ मजली २४ मीटर उंचीच्या इमारती उभारल्या जाणार असून, डोंगर उध्वस्त करून ,सखल जमीनीत भराव करण्याची मुभा या आराखड्यात असणार आहे. सुरवातीला आराखड्यात समाविष्ट नसलेली गावे महापालिकेच्या ठरावानंतर मात्र आराखड्यात घेता येणार असून ,यासाठी महापालिका सज्ज आहे. गावा-गावांतून ७५ हजार वाहनांची वाहतूक करणारा कोस्टल रोड किंवा घर-दारे उद्ध्वस्त करणारी मेट्रो आम्हाला नको असून, त्यासोबतच येणाऱ्या गगनचुंबी इमारतींचे जंगलही आंम्हाला नको आहे. भिवंडी, वाडा या भागातही आराखड्याविरोधातील आंदोलन जोर धरते आहे. वसईकरांनीही मुदत संपण्यापूर्वी आपल्या हरकती जास्तीत जास्त संख्येने नोंदवाव्यात ,असे आवाहन प्रभू यांनी यावेळी केले. स्थानिक भूमीपुत्रांचे हक्क हिरावणाऱ्या या विकास आराखड्याची खलबते २०१२ पासून सुरू असून, हरित पट्टयातही रासायनिक कारखाने व अन्य औद्योगिकरणास चालना नव्या आराखड्यात दिली जाणार आहे, असा दावा यावेळी केला गेला. (प्रतिनिधी)>प्रत्येक कुटुंबातील १ व्यक्ती व्हावी आंदोलकया विकासाने वसईच्या पर्यावरणावर वरवंटा फिरवला जाणार असल्याने वसईकरांनी संघटीत होऊन या बिल्डरधार्जिण्या विकास आराखड्यास विरोध करण्याची वेळ आली आहे. सभेचे प्रास्तविक प्रा.जॉना वाझ यांनी केले. समीर वर्तक यांनी ही ३९ वी सभा असल्याचे सांगीतले. बिल्डरांसाठी केलेल्या या आराखड्यास विरोध करण्यासाठी प्रत्येक कुटुंबातून एकतरी व्यक्ती सक्रिय झाली पाहिजे , असे यावेळी आवाहन केले गेले.