शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
2
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
3
Operation Sindoor Live Updates: स्फोटाचा आवाजांमुळे अमृतसरमध्ये रात्रभर ब्लॅक आऊट; पोलिस म्हणतात काहीच सापडले नाही
4
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
6
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
7
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
8
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
9
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
10
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
11
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
12
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
13
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
14
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
15
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
16
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
17
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
18
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
19
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
20
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 

कर्जाच्या पुनर्गठणासाठी समिती

By admin | Updated: April 10, 2017 04:07 IST

अडचणीत असलेल्या साखर कारखान्यांच्या कर्जाच्या पुनर्गठणाबाबत व कर्जाला शासकीय हमी देण्याबाबत

मुंबई : अडचणीत असलेल्या साखर कारखान्यांच्या कर्जाच्या पुनर्गठणाबाबत व कर्जाला शासकीय हमी देण्याबाबत वित्त सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून पंधरा दिवसांत धोरण तयार करण्यात येईल. तसेच साखर कारखान्यांकडील स्वनिर्मित वीज वापरावरील विद्युत दरांबाबत व वीज खरेदी कराराबाबतही समिती नेमून पंधरा दिवसांत निर्णय घेणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. साखर उद्योगाच्या प्रश्नांसंदर्भात रविवारी मुंबईत बैठक झाली. मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख, ग्रामविकासमंत्री आणि साखर संघाच्या प्रतिनिधी पंकजा मुंडे, साखर फेडरेशनचे अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, विजयसिंह मोहिते-पाटील आदी नेते बैठकीस उपस्थित होते. बैठकीच्या सुरुवातीला साखर आयुक्त विपिन शर्मा यांनी साखर उद्योगापुढील विविध समस्यांबाबत सादरीकरण केले. कारखान्यांनी उभारलेल्या सहवीज निर्मिती प्रकल्पातील वीज खरेदी थंडावल्याने साखर उद्योग अडचणीमध्ये सापडला आहे. राज्य सरकारने कारखान्याबरोबर वीज खरेदीचे करार करावेत. वीज दर योग्य ठेवले नाहीत तर कारखानदारी धोक्यात येईल, अशी मागणी कारखाना संघाकडून करण्यात आली. या वेळी मुख्यमंत्री म्हणाले की, सहवीज प्रकल्पातून निर्माण होणारी वीज पर्यावरणपूरक असल्याने त्याला अधिक दर मिळावा यासाठी राज्य सरकार लवकरच निर्णय घेईल. कर्ज पुनर्गठण आणि कर्ज हमीसंदर्भात धोरण बनवण्यासाठी समिती नेमण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला. (प्रतिनिधी)या विषयांवर झाली चर्चाराज्यातील साखर कारखान्यांवरील कजार्चा बोजा ६ हजार कोटींवर गेला आहे. कर्जाचे पुनर्गठण न झाल्यास पुढचा हंगाम कारखाने घेऊ शकणार नाहीत. परिणामी दहा लाख ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत येतील, असे कारखान्यांच्या प्रतिनिधींनी सांगितले. कारखान्यांना शासन थकहमी देणे, साखरेवरील सेस रद्द करणे, साखरेची आयात, साखर कारखान्यांवरील आयकराची मागणी, कारखान्यांचे सहवीज प्रकल्प, इथेनॉल पुरवठा इत्यादी विषयांवर बैठकीत चर्चा झाली.