शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
6
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
7
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
8
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
9
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
10
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
11
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
12
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
13
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
14
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
15
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
16
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
17
Mehbooba Mufti: "गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार
18
जेवण आणि झोप यामध्ये नेमकं किती अंतर असावं? निरोगी आयुष्यासाठी पाळा 'हा' सोपा नियम
19
सावधान! तुमची एक छोटी चूक आणि बँक खाते रिकामे; UPI वापरताना 'हे' ५ डिजिटल नियम पाळणे आता अनिवार्य
20
Navneet Rana: "अजित पवारांचं भाजपसोबत जाणं, हा शरद पवारांचाच प्लॅन!" नवनीत राणा असं का म्हणाल्या?
Daily Top 2Weekly Top 5

शालेय विद्यार्थ्यांच्या तपासणीसाठी समिती

By admin | Updated: July 22, 2015 01:02 IST

मुंबई-पुण्यातील बालकांमध्ये श्वसनविकाराचे प्रमाण वाढले असून, शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीसंदर्भात आणि आरोग्याच्या

मुंबई : मुंबई-पुण्यातील बालकांमध्ये श्वसनविकाराचे प्रमाण वाढले असून, शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीसंदर्भात आणि आरोग्याच्या तक्रारीच्या निवारणार्थ पर्यावरण आणि आरोग्य विभागाच्या तज्ज्ञांची उच्चस्तरीय समिती नेमणार असल्याचे आरोग्य मंत्री दीपक सावंत यांनी परिषदेत सांगितले. प्रदूषित हवेमुळे मुंबईतील आणि राज्यातील मुलांचे आरोग्य बिघडत असल्याबाबत काँग्रेस सदस्य अनंत गाडगीळ यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. राष्ट्रीय बालस्वास्थ कार्यक्रमांतर्गत २०१४-१५मध्ये राज्यातील आरोग्य पाहणीत ५ ते ११ वयोगटातील १ कोटी २२ लक्ष ३६ हजार १२८ विद्यार्थ्यांची तपासणी केली होती. त्या तपासणीत १ लक्ष १५ हजार ५३ विद्यार्थी श्वसन संस्थेच्या विकाराने आजारी असल्याचे आढळून आले आहे. यापैकी १ लक्ष १४ हजार ७१३ विद्यार्थ्यांवर उपचार करण्यात आले. तर ३४० जणांना उपचारासाठी वरिष्ठ रुग्णालयात पाठवल्याची माहिती दीपक सावंत यांनी दिली. १३ टक्के फुप्फुसाचा विकारब्रेथ ब्ल्यु सर्व्हेनुसार मुंबईतील १३ टक्के विद्यार्थ्यांच्या फुप्फुसाची कार्यक्षमता कमी असून, १४ टक्के विद्यार्थ्यांच्या फुप्फुसाची कार्यक्षमता अत्यंत कमी असल्याचे आढळून आल्याचे सावंत म्हणाले.मुंबईतील माझगाव येथील कोळसा डेपोमुळे परिसरातील नागरिकांना श्वसनाचे विकार उद्भवले आहेत. त्यामुळे कोळसा डेपो अन्यत्र हलवावे, अशी मागणी राष्ट्रवादीच्या राहुल नार्वेकर यांनी केली. त्यावर बदलती जीवनशैली, वाढती बांधकामे आणि प्रदूषण यामुळे श्वसनाचे विकार वाढल्याचे मान्य करत शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीसंदर्भात समिती नेमण्याची घोषणा केली. औषध खरेदीची चौकशी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेला गरज नसताना केलेल्या साडे चार कोटी रुपयांच्या सोडियम हायपोक्लोरोईड खरेदीची आरोग्य विभागाकडून उच्चस्तरीय चौकशी केली जाईल, अशी घोषणा आरोग्य मंत्री दीपक सावंत यांनी विधान परिषदेत केली.सावंत म्हणाले, राज्यातील ९५ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रुग्णालयांकडून झालेली मागणी विचारात घेऊन वर्षभराच्या सोडियम हायपोक्लोरोईडची खरेदी करण्यात आली होती. त्याची एकत्रित किंमत ४ कोटी ४२ लक्ष ९७ हजार इतकी आहे. आवश्यक औषधांसाठी नाशिक महापालिकेने आरोग्य सेवा संचालनालयास तब्बल २७ स्मरणपत्रे पाठवली. मात्र ती औषधे न देता केवळ सोडियम हायपोक्लोराईड ट्रक भरून पाठवले. स्वच्छतेसाठी सोडियम हायपोक्लोरोईड खरेदी करण्यामागे अधिकाऱ्याचे हात ओले झाल्याचा आरोप जयवंत जाधवांनी केला. त्यावर चौकशी करण्याचे आश्वासन दिले.