शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
2
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
3
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
4
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
5
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
6
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
7
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
8
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
9
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
10
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
11
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
12
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
13
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
14
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
15
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
16
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
17
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार
18
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
19
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
20
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!

सर्वसाधारण सभेच्या कामकाजामध्येही आयुक्तांची पारदर्शकता

By admin | Updated: July 20, 2016 02:54 IST

शहराच्या विकासावर दीर्घकालीन परिणाम करणारे महत्त्वाचे प्रस्ताव आयत्यावेळी सभागृहात मांडण्याची चुकीची प्रथा अनेक वर्षांपासून सुरू झाली

नवी मुंबई : शहराच्या विकासावर दीर्घकालीन परिणाम करणारे महत्त्वाचे प्रस्ताव आयत्यावेळी सभागृहात मांडण्याची चुकीची प्रथा अनेक वर्षांपासून सुरू झाली होती. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी याला लगाम लावला आहे. बुधवारी होणाऱ्या सभेत विकास आराखडा तयार करणे, स्मार्ट सिटी व मालमत्तांचे सर्वेक्षण करण्याचा प्रस्ताव मूळ विषयपत्रिकेत घेवून सर्व नगरसेवकांना अभ्यास करण्याची संधी प्राप्त होणार आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या कामकाजामध्ये २५ वर्षांमध्ये अनेक चुकीच्या गोष्टी सुरू झाल्या होत्या. यामध्ये आयत्या वेळच्या विषयांचा समावेश होता. सर्वसाधारण सभेच्या मूळ विषयपत्रिकेवर महत्त्वाचे विषय दिले जात नव्हते. आयत्यावेळी सभागृहात विषय मांडून तो मंजूर करून घेतला जात होता. यामुळे नगरसेवकांना अभ्यास करण्याची संधीच मिळत नसल्याने प्रस्तावांवर सविस्तर चर्चा होत नव्हती. यामुळे अनेक प्रस्तावांमध्ये त्रुटी राहून पालिकेचे व शहरवासीयांचे नुकसान होवू लागले होते. विरोधी पक्षांनी वारंवार याविषयी नाराजी व्यक्त केली होती. महत्त्वाचे प्रस्ताव आठ दिवस अगोदर मिळाले तर त्यावर योग्य अभ्यास करता येईल असे मत व्यक्त केले होते. परंतु यामध्ये कधीच बदल झाला नाही. महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पहिल्यांदा महत्त्वाच्या विषयांचा मूळ प्रस्तावांमध्ये समावेश केला आहे. बुधवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेमध्ये शहराचा विकास आराखडा तयार करण्याचा प्रस्ताव चर्चेसाठी ठेवण्यात आला आहे. याशिवाय विकास आराखडा सल्लागाराऐवजी पालिकेच्या नगररचना विभागाकडून तयार करून घेतला जाणार आहे. लेखा परीक्षण अहवालही सर्वसाधारण सभेत मांडण्यात येत आहे. नवी मुंबईमधील मालमत्तांचे अनेक वर्षांपासून सर्वेक्षण झालेले नाही. यामुळे शहरातील मालमत्तांचे लाइट डिटेक्शन अँड रँगिंग टेक्नॉलॉजी (लीडार) तंत्राचा वापर करून सर्वेक्षण करण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेमध्ये येणार आहे. अत्यंत आधुनिक पद्धतीने सर्वेक्षण केल्यामुळे शहरातील सर्व मालमत्तांची सविस्तर माहिती उपलब्ध होणार आहे. ज्यांनी वाढीव बांधकाम केले त्यांना बांधकामाप्रमाणे मालमत्ताकर आकारणे शक्य होणार आहे. यामुळे उत्पन्नामध्ये वाढ होणार आहे. यासाठी वीस कोटी रूपये खर्च येणार असून प्रस्तावाला मंजुरी मिळणार का याकडे लक्ष लागून आहे. (प्रतिनिधी)>आयुक्त लोकप्रतिनिधींच्या अधिकारावर गदा आणत असल्याची चर्चा शहरभर सुरू आहे. परंतु आयुक्तांनी लोकप्रतिनिधींच्या अधिकारावर गदा आणली जात नसल्याचे स्पष्ट केले आहे. धोरण ठरविण्यासाठी सर्व प्रस्ताव सभेसमोर ठेवले जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. महत्त्वाचे सर्व विषय मूळ विषयपत्रिकेवर ठेवून ते कृतीतून दाखवून दिले असून आता लोकप्रतिनिधी काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे. >पुन्हा स्मार्ट सिटीचा प्रस्ताव स्मार्ट सिटीच्या प्रस्तावावरून यापूर्वी मोठे वादळ निर्माण झाले होते. बुधवारी होणाऱ्या सभेमध्ये पुन्हा एकदा स्मार्ट सिटीचा प्रस्ताव चर्चेसाठी येणार आहे. स्वनिधीतून ही योजना राबवायची आहे. वादग्रस्त एसपीव्हीचा समावेशही यामध्ये करण्यात आला आहे. वास्तविक एसपीव्हीविषयी असणारे गैरसमज आयुक्त दूर करून देणार का? यापूर्वी विरोध करणारे सत्ताधारी या प्रस्तावास मंजुरी देणार का याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.