शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

२९ जूनपर्यंत मुंबईत या! भाजपाचे आमदारांसह समर्थकांना फोन गेले; उद्याचा दिवस महत्वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2022 23:02 IST

शिवसेनेचे बंडखोर आमदार महाराष्ट्रात आले नाहीत तरी देखील भाजपाकडे मित्रपक्ष मिळून १२३ चे संख्याबळ आहे. मविआकडे १००-११० च्या आसपास संख्याबळ आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने महाराष्ट्रात आलेल्या राजकीय भूकंपाच्या राजकारणाला मोठे वळण मिळण्याची शक्यता आहे. बंडखोर आमदारांचे निलंबन १२ जुलैपर्यंत शक्य नसल्याने ठाकरे सरकारविरोधात कधीही अविश्वास ठराव दाखल होण्याची शक्यता आहे. 

शिवसेनेचे बंडखोर आमदार महाराष्ट्रात आले नाहीत तरी देखील भाजपाकडे मित्रपक्ष मिळून १२३ चे संख्याबळ आहे. मविआकडे १००-११० च्या आसपास संख्याबळ आहे. यामुळे जर अविश्वास ठराव मांडला गेला तर मविआ सरकार कोसळण्याची शक्यता आहे, किंवा त्यापूर्वीच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. 

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आज भाजपाच्या कार्यकारिणीची बैठक झाली. यामध्ये भाजपा आपणहून अविश्वास प्रस्ताव मांडणार नाही, अशी वेट अँड वॉचची भूमिका मांडण्यात आली. तर दुसरीकडे शिंदे गटाकडून काही प्रस्ताव आल्यास त्यावर विचार करण्यात येईल, बैठका घेण्यात येतील असे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले. 

असे असताना भाजपाच्या आपापल्या मतदारसंघात गेलेल्या आमदारांना २९ जूनपर्यंत मुंबईत येण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे उद्याच्या दिवसभरात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. शिंदे राज्यपालांकडे येऊन आपले शक्तीप्रदर्शन करतात की सरकारचे समर्थन काढल्याचे पत्र देतात, तसेच बहुमत सिद्ध करण्याचा प्रस्ताव देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपाShiv Senaशिवसेना