शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
5
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
6
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
7
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
8
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
9
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
10
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
11
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
12
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
13
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
14
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
15
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
16
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
17
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
18
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
19
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
20
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण

चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2024 06:35 IST

पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील अनेक जण नोकरी-व्यवसायानिमित्त मुंबईत वास्तव्यास आहेत. त्यांचे गावाकडेच मतदार यादीत नाव आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याचे मतदान मंगळवारी, ७ मे रोजी होणार आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी-सिंधुदुर्ग या महत्त्वाच्या आणि चर्चेतल्या मतदारसंघांत मतदान होणार असून मतदानासाठी गाव गाठण्यास चाकरमान्यांनी सुरुवात केली आहे. त्यामुळे गावी जाणाऱ्या गाड्या फुल्ल झाल्या आहेत. 

पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील अनेक जण नोकरी-व्यवसायानिमित्त मुंबईत वास्तव्यास आहेत. त्यांचे गावाकडेच मतदार यादीत नाव आहे. त्यामुळे अनेकांनी मतदानासाठी गावी जाण्याला प्राधान्य दिले असून शनिवारपासूनच सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी या ठिकाणी जाणाऱ्या गाड्या फुल्ल झाल्या आहेत. खासगी गाड्यांनाही त्यामुळे मागणी वाढली आहे. 

परिणामी भाड्यात कृत्रिम वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. एरवी साताऱ्याला जाण्यासाठी साध्या खासगी गाड्या ५०० रुपये भाडे आकारतात. आता ते ८०० रुपये झाले आहे. तर कोल्हापूरसाठी हजार ते बाराशे रुपये मोजावे लागत आहेत. सातारा, कोल्हापूर आणि कोकणातील काही मतदारांनी तर बसचे ग्रुप बुकिंगही केल्याचे एका वाहतूकदाराने सांगितले.

अनेक गाड्यांमध्ये झाले आरक्षण     सोमवारी कामावरून सुटल्यानंतर थेट गाव गाठण्याकडेही अनेक चाकरमान्यांचा कल आहे. त्यामुळे सोमवारी गावाकडे जाणाऱ्या गाड्यांचे बुकिंग आणखी वाढण्याची शक्यता आहे.     अनेक गाड्यांमध्ये ९० टक्के प्रवाशांचे बुकिंग झाले आहे, अशी माहिती मुंबई बस मालक संघटनेचे उपाध्यक्ष मुराद नाईक यांनी दिली.

टॅग्स :state transportएसटी