शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2024 06:35 IST

पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील अनेक जण नोकरी-व्यवसायानिमित्त मुंबईत वास्तव्यास आहेत. त्यांचे गावाकडेच मतदार यादीत नाव आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याचे मतदान मंगळवारी, ७ मे रोजी होणार आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी-सिंधुदुर्ग या महत्त्वाच्या आणि चर्चेतल्या मतदारसंघांत मतदान होणार असून मतदानासाठी गाव गाठण्यास चाकरमान्यांनी सुरुवात केली आहे. त्यामुळे गावी जाणाऱ्या गाड्या फुल्ल झाल्या आहेत. 

पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील अनेक जण नोकरी-व्यवसायानिमित्त मुंबईत वास्तव्यास आहेत. त्यांचे गावाकडेच मतदार यादीत नाव आहे. त्यामुळे अनेकांनी मतदानासाठी गावी जाण्याला प्राधान्य दिले असून शनिवारपासूनच सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी या ठिकाणी जाणाऱ्या गाड्या फुल्ल झाल्या आहेत. खासगी गाड्यांनाही त्यामुळे मागणी वाढली आहे. 

परिणामी भाड्यात कृत्रिम वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. एरवी साताऱ्याला जाण्यासाठी साध्या खासगी गाड्या ५०० रुपये भाडे आकारतात. आता ते ८०० रुपये झाले आहे. तर कोल्हापूरसाठी हजार ते बाराशे रुपये मोजावे लागत आहेत. सातारा, कोल्हापूर आणि कोकणातील काही मतदारांनी तर बसचे ग्रुप बुकिंगही केल्याचे एका वाहतूकदाराने सांगितले.

अनेक गाड्यांमध्ये झाले आरक्षण     सोमवारी कामावरून सुटल्यानंतर थेट गाव गाठण्याकडेही अनेक चाकरमान्यांचा कल आहे. त्यामुळे सोमवारी गावाकडे जाणाऱ्या गाड्यांचे बुकिंग आणखी वाढण्याची शक्यता आहे.     अनेक गाड्यांमध्ये ९० टक्के प्रवाशांचे बुकिंग झाले आहे, अशी माहिती मुंबई बस मालक संघटनेचे उपाध्यक्ष मुराद नाईक यांनी दिली.

टॅग्स :state transportएसटी