शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

आले तर सोबत नाहीतर एकट्याने; भाजपची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2019 05:56 IST

फडणवीस यांचा चार दिवसांत शपथविधी

मुंबई : सत्तास्थापनेसाठी शिवसेना सोबत आली तर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात युती सरकारचा किंवा सोबत न आल्यास केवळ भाजप सरकारचा शपथविधी होणार आहे. अत्यंत विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली.

शिवसेनेला दिलेल्या प्रस्तावासंदर्भात प्रतिसादाची अखेरपर्यंत वाट पाहू. तोपर्यंत तिढा सुटला नाही तर २०१४ प्रमाणे केवळ भाजप मंत्र्यांचा शपथविधी करावा, असे भाजपमध्ये ठरले असल्याचे समजते. मात्र त्यापूर्वी शिवसेनेने मंत्रिमंडळात सहभागी व्हावे, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. सूत्रांनी सांगितले की, ते प्रयत्न सफल झाले किंवा अपयशी ठरले तरी ७ नोव्हेंबरला फडणवीस सरकारचा शपथविधी करायचा, असे भाजपचे ठरले आहे.

भाजपने महसूल आणि सार्वजनिक बांधकाम ही खाती शिवसेनेला देण्याची तयारी दर्शवली आहे. उपमुख्यमंत्रिपदासह १६ मंत्रिपदे देऊ केली आहेत. तथापि नगर विकास, वित्त आणि गृह ही खाती मात्र देण्यास सपशेल नकार दिला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. शिवसेना सत्तेत सहभागी होत असल्याचे दर्शविण्यासाठी शिवसेनेच्या दोनच मंत्र्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याबरोबर शपथ घ्यावी आणि इतर मंत्री व खात्यांसंदर्भात चर्चा सुरू ठेवून लगेच काही दिवसांत विस्तारामध्ये शिवसेनेचे आणखी मंत्री सामावून घ्यावेत, असाही एक प्रस्ताव भाजपकडून दिला जाऊ शकतो.

राज्यात लवकरच सरकार स्थापन होईल - मुख्यमंत्रीसरकार लवकरच स्थापन होईल. सध्याचे सरकार काळजीवाहू आहे. या सरकारला निर्णय घेताना काही बंधने आहेत. तरीही, नियमांच्या अधीन राहून आम्ही काम करीत आहोत. महाराष्ट्राचे हित लक्षात घेता सत्तास्थापनेचा तिढा सोडवून, लवकरात लवकर सरकार स्थापन होईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अकोला जिल्ह्यात अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केल्यानंतर दिली. 

 

टॅग्स :BJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसShiv Senaशिवसेना