शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

कोरोना संकट गेल्यानंतरच महाविद्यालये सुरू होणार- उदय सामंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 20:05 IST

Uday Samant : तोवर महाविद्यालये सुरू करणार नाही, अशी आपली स्पष्ट भूमिका असल्याचे उदय सामंत म्हणाले.

बुलडाणा: कोरोनाचे संकट जात नाही तोवर राज्याील महाविद्यालये सुरू करण्यात येणार नसल्याचे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी बुलडाणा येथे शनिवारी स्पष्ट केले.जिल्हा आरोग्य यंत्रणेसाठी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने मिळालेल्या व्हेंटीलेटर्सच्या लोकार्पण सोहळ्यासाठी ते बुलडाण्यात आले होते. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलतांना त्यांनी ही माहिती दिली. यावेळी आ. संजय गायकवाड, डॉ. संजय रायमुलकर आणि बुलाडणा बाजार समितीचे सभापती जालिंधर बुधवत यांच्यासह जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती व अन्य अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

राज्यात कोरोनामुक्त गावात शाळा सुरू करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्या धर्तीवर महाविद्यालये कधी सुरू करणार यासंदर्भात त्यांना विचारणा केली असता त्यांनी उपरोक्त बाब स्पष्ट केली. कोरोनाचे संकट जात नाही, तोवर महाविद्यालये सुरू करणार नाही, अशी आपली स्पष्ट भूमिका असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, नारायण राणे यांना केंद्रात देण्यात आलेले मंत्रीपद हे शिवसेनेला शह देण्यासाठी दिले गेले आहे, अशी चर्चा आहे. त्यासंदर्भाने आपली भूमिका काय? असे विचारले असता केंद्रात महाराष्ट्रातील दहा व्यक्तींनाही मंत्रीपद दिले गेले तरी ते शिवसेनेला रोखू शकत नाही. त्यामुळे त्यांनी खुशाल मंदीपदे द्यावीत तो त्यांचा (भाजपचा) विषय आहे. दरम्यान नारायण राणेंना मंत्रीपद केंद्रा मिळाल्यानंतर राज्यातील शिवसेना जिल्हा प्रमुखांची तातडीने बैठक घेण्यात आली याबाबत विचारणा केली असता शिवसेनची ताकद मोठी असल्याचे ते म्हणाले. शिवसेनेला कोणीही रोखू शकत नाही, असे ते म्हणाले.

टॅग्स :Uday Samantउदय सामंतbuldhanaबुलडाणा