शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

दोन दिवसांत थंडी आणखी वाढण्याचा अंदाज; मुंबईचे किमान तापमान १४ अंशांवर येण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 06:17 IST

अनेक शहरांचे किमान तापमान एक अंकी नोंदवण्यात येईल, असा अंदाज हवामान अभ्यासाकांनी वर्तविला आहे

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: हिमाचल प्रदेश आणि आसपासच्या परिसरामध्ये सातत्याने होत असलेल्या बर्फवृष्टीचा परिणाम म्हणून उत्तर भारतातून दक्षिण भारताकडे वाहणाऱ्या गार वाऱ्याचा प्रभाव अधिक वाढला आहे. त्यामुळे थंड वारे राज्य आणि मुंबईकडे वाहत असल्याने मंगळवारी, बुधवारी मुंबईचे किमान तापमान १४ अंश नोंदवण्यात येईल तर राज्यभरातील अनेक शहरांचे किमान तापमान एक अंकी नोंदवण्यात येईल, असा अंदाज हवामान अभ्यासाकांनी वर्तविला आहे.

मुंबईसोबत कोकणातील अनेक शहरांचा किमान तापमानाचा पारा १४ अंशांच्या आसपास नोंदविण्यात येईल तर राज्यभरामध्ये मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रमध्ये एक अंकी तापमान नोंदवले जाईल. उत्तर महाराष्ट्रमध्ये काही शहरांचे किमान तापमान सहा अंश नोंदविले जाण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवस मुंबई आणि राज्यभरात हवामानामध्ये प्रामुख्याने बदल होतील. त्या बदलांमुळे थंडीमध्ये आणखी भर पडेल.

गेल्या तीन दिवसांपासून मुंबई आणि आसपासच्या परिसरातील किमान तापमानाचा पारा १६ अंशांच्या आसपास नोंदविला जात आहे. सोमवारीदेखील मुंबईचे किमान तापमान १६ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. किमान तापमानात होत असलेल्या घसरणीमुळे मुंबईकरांना नव्या वर्षाच्या सुरुवातीला आनंद लुटता येत आहे. गुरुवारनंतर मात्र पुन्हा एकदा मुंबईच्या किमान तापमानात वाढ नोंदविली जाईल. आणि किमान तापमान सर्वसाधारण नोंदवले जाईल, अशी माहिती हवामान अभ्यासक अथ्रेया शेट्टी यांनी दिली.

  • मुंबई    १६
  • नाशिक    १४
  • धाराशिव    ११
  • परभणी    ११
  • सातारा    १२
  • अहिल्यानगर    १२
  • छ. संभाजीनगर    १५
  • जळगाव    ११
  • महाबळेश्वर     १४
  • मालेगाव    १४
टॅग्स :Winter Care Tipsथंडीत त्वचेची काळजीMumbaiमुंबईPuneपुणे