शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

थंडीचा कडाका कायम

By admin | Updated: January 14, 2017 04:57 IST

राज्याला भरलेली हुडहुडी कायम असून परभणी जिल्ह्यात गारठ्याने दोघा ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू झाल्याचे उघड झाले. सातपुड्यातील

मुंबई : राज्याला भरलेली हुडहुडी कायम असून परभणी जिल्ह्यात गारठ्याने दोघा ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू झाल्याचे उघड झाले. सातपुड्यातील अक्कलकुवा तालुक्यातील डाब परिसरात (जि. नंदूरबार)सकाळी हिमकणांचा वर्षाव होऊ लागला आहे. विदर्भात थंडीची लाट कायम असून ही परिस्थिती आणखी दोन दिवस तरी कायम राहिल असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. मुंबईच्या किमान तापमानात गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी दोन अंशाची वाढ झाली असली तरीदेखील शहरातला थंडीचा कडाका कायम आहे. शुक्रवारी मुंबईचे किमान तापमान १३.६ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले असून, गुरुवारी हेच किमान तापमान ११ अंशाच्या आसपास नोंदवण्यात आले होते. विदर्भाबरोबरच खान्देशात थंडीचा कडाका खूपच वाढला आहे. परभणी जिल्ह्यामध्ये गेल्या आठवडाभरापासून थंडीची लाट आहे. पूर्णा तालुक्यातील देऊळगाव दुधाटे येथील विश्वनाथ सखाराम दुधाटे (वय ७६) आणि जिंतूर येथील राधाकिशन कोद्रे (वय ६५) यांचा गारठ्याने मृत्यू झाल्याचे उघड झाले. कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या काही भागात देखील सरासरीच्या तुलनेत किमान तापमानात लक्षणीय घट झाली आहे. धुळे येथे तापमान ४.४ अंश सेल्सिअस नोंदले गेले. गेल्या २६ वर्षातील धुळ्याचे हे सर्वात कमी तापमान ठरले. याआधी २ जानेवारी १९९१ रोजी धुळ्याचा पारा २़४ अंश सेल्सिअस एवढा घसरला होता. (प्रतिनिधी)