शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

सणासुदीच्या दिवसांत नारळ महागला; केरळ महापुराचा परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2018 05:25 IST

२० ते ४० रुपयांपर्यंत भाव, श्रावण सुरू असल्याने नारळाला अधिक मागणी

कोल्हापूर : केरळातील महापुरामुळे आवक कमी झाल्याने ऐन सणासुदीच्या तोंडावर नारळाचे दर भडकले आहेत. घाऊक बाजारात १० ते २० टक्क्यांपर्यंत दर वाढल्याने सर्वसामान्य ग्राहकाला एका नारळासाठी प्रतिवारीप्रमाणे किमान २० रुपयांपासून ४० रुपये मोजावे लागत आहेत.व्रतकैवल्यांचा महिना असणारा श्रावण सुरू झाल्याने नारळाची मागणी अगोदरच वाढली आहे. त्यातच नारळांचे आगार समजल्या जाणाऱ्या केरळला महापूराचा फटका बसल्याने तिकडून होणारी आवक चांगलीच रोडावली आहे. आता गणेशोत्सव तोंडावर आला आहे. या काळात नारळाला सर्वात जास्त मागणी असते. परंतु आतापासून दर वाढू लागले आहेत.त्यामुळे येत्या काही दिवसांत केरळमधून आवक सुरू झाली तरी दर असेच चढे राहतील, असा व्यापाºयांचा अंदाज आहे.केरळमधून नियमित नवा पाणी, जुना पाणी, बोळ, कंगणार, आदी जातींचे नारळ विक्रीसाठी राज्यात येतात. हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये प्रामुख्याने बोळ नारळाचा वापर केला जातो. त्यामुळे या नारळाचे दर कायम चढेच असतात. सध्या किरकोळ बाजारातील त्याचे दर आणखी वाढून ४० ते ५० रुपये प्रतिनग असा झाला आहे.मुंबईच्या एपीएमसी बाजारात तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यांतून नारळाची सर्वाधिक आवक होते. त्यामुळे केरळमधून आवक रोडावल्याचा परिणाम अजून तरी दिसत नाही. परंतु श्रावणाच्या तोंडावर दर वाढले असून त्यामध्ये आणखी वाढ होऊ शकते, असे व्यापाºयांनी सांगितले.नारळाचे दर असे (घाऊक बाजार)मोठा जुना पाणी नारळ - शेकडा दर १३५० रुपये (पूर्वी १२५० )लहान जुना पाणी नारळ - शेकडा दर १३००(पूर्वी १४००)कंगणार - शेकडा दर - १५००बोळ (हॉटेल किंग) आकारानुसार -शेकडा दर - २८०० ते ३०००

टॅग्स :Kerala Floodsकेरळ पूर