शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

सणासुदीच्या दिवसांत नारळ महागला; केरळ महापुराचा परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2018 05:25 IST

२० ते ४० रुपयांपर्यंत भाव, श्रावण सुरू असल्याने नारळाला अधिक मागणी

कोल्हापूर : केरळातील महापुरामुळे आवक कमी झाल्याने ऐन सणासुदीच्या तोंडावर नारळाचे दर भडकले आहेत. घाऊक बाजारात १० ते २० टक्क्यांपर्यंत दर वाढल्याने सर्वसामान्य ग्राहकाला एका नारळासाठी प्रतिवारीप्रमाणे किमान २० रुपयांपासून ४० रुपये मोजावे लागत आहेत.व्रतकैवल्यांचा महिना असणारा श्रावण सुरू झाल्याने नारळाची मागणी अगोदरच वाढली आहे. त्यातच नारळांचे आगार समजल्या जाणाऱ्या केरळला महापूराचा फटका बसल्याने तिकडून होणारी आवक चांगलीच रोडावली आहे. आता गणेशोत्सव तोंडावर आला आहे. या काळात नारळाला सर्वात जास्त मागणी असते. परंतु आतापासून दर वाढू लागले आहेत.त्यामुळे येत्या काही दिवसांत केरळमधून आवक सुरू झाली तरी दर असेच चढे राहतील, असा व्यापाºयांचा अंदाज आहे.केरळमधून नियमित नवा पाणी, जुना पाणी, बोळ, कंगणार, आदी जातींचे नारळ विक्रीसाठी राज्यात येतात. हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये प्रामुख्याने बोळ नारळाचा वापर केला जातो. त्यामुळे या नारळाचे दर कायम चढेच असतात. सध्या किरकोळ बाजारातील त्याचे दर आणखी वाढून ४० ते ५० रुपये प्रतिनग असा झाला आहे.मुंबईच्या एपीएमसी बाजारात तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यांतून नारळाची सर्वाधिक आवक होते. त्यामुळे केरळमधून आवक रोडावल्याचा परिणाम अजून तरी दिसत नाही. परंतु श्रावणाच्या तोंडावर दर वाढले असून त्यामध्ये आणखी वाढ होऊ शकते, असे व्यापाºयांनी सांगितले.नारळाचे दर असे (घाऊक बाजार)मोठा जुना पाणी नारळ - शेकडा दर १३५० रुपये (पूर्वी १२५० )लहान जुना पाणी नारळ - शेकडा दर १३००(पूर्वी १४००)कंगणार - शेकडा दर - १५००बोळ (हॉटेल किंग) आकारानुसार -शेकडा दर - २८०० ते ३०००

टॅग्स :Kerala Floodsकेरळ पूर