शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

मुंबईतील गिरणी कामगारांची जागा आघाडी सरकारने गिळली, मुख्यमंत्र्यांचा विधानसभेत हल्लाबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 02:54 IST

विधानसभेत फडणवीस अन् जयंत पाटील यांच्यात खडाजंगी

विशेष प्रतिनिधी मुंबई : मुंबईतील बंद गिरण्यांच्या जागेवर गिरणी कामगारांसाठीची घरे बांधली जायला हवी होती पण तेव्हाच्या आघाडी सरकारने मिल मालक आणि बिल्डरधार्जिणे निर्णय घेऊन या कामगारांना देशोधडीला तर लावलेच शिवाय कोट्यवधी रुपयांचे घोटाळे केले, असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केला. या वेळी फडणवीस आणि राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्यात जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली.या मिलच्या जागेपैकी ३० टक्के जागा महापालिकेला, ३० टक्के जागा म्हाडाला तर ३० टक्के जागा गिरणी मालकांना मिळायला हवी होती. तथापि, २००१ मध्ये सरकारने धोरण बदलले आणि रिक्त असलेल्या जागेच्या प्रत्येकी ३० टक्के जागांचे वरीलप्रमाणे वाटप केले जाईल, असा निर्णय घेतला. तोपर्यंत जागाच रिक्त राहिलेली नव्हती आणि ती सगळी मालकांच्या व बिल्डरांच्या घशात जाईल, अशा पद्धतीने निर्णय घेण्यात आला. कमला मिलची इंचभरही जागा महापालिका वा म्हाडाला मिळाली नाही. आम्ही सत्तेत आल्यानंतर हा निर्णय बदलला आणि पूर्वीचे सूत्र लागू केले. आता खासगी मिलच्या तर जागा राहिलेल्या नाहीत, पण आमच्या निर्णयाचा फायदा होऊन एनटीसीच्या मिलच्या जागेवर तरी गिरणी कामगारांसाठी घरे बांधता येतील, असे मुख्यमंत्री म्हणाले.मुख्यमंत्री असा हल्लाबोल करीत असतानाच जयंत पाटील यांनी कमला मिलच्या दुर्घटनेबद्दल बोला. चार वर्षांत तुम्ही झोपा काढल्या का? जुना विषय उकरून काढू नका, असे म्हटले. मुख्यमंत्र्यांनी यावर जयंत पाटील यांच्यावर शाब्दिक प्रतिहल्ला केला. कमला मिलची दुर्घटना हे तुमचे पाप आहे. ते मला आता सांगावेच लागेल. तुमच्या सरकारने केलेल्या भ्रष्टाचाराने गिरणी कामगार हद्दपार झाला. आम्ही सगळी चौकशी करू, असे मुख्यमंत्री म्हणाले. यावर ‘आम्ही चौकशीला घाबरत नाही,’ असे प्रतिआव्हान पाटील यांनी दिले. ‘सत्य हे सत्यच असते आणि सत्य सांगण्यापासून जयंतराव तुम्ही मला रोखू शकत नाही,’ असे मुख्यमंत्र्यांनी सुनावले.‘ते’ तर महाराष्टाला ठाऊकच आहेत...तत्पूर्वी म्हाडा, महापालिकेला गिरण्यांच्या जागेत हिस्सा मिळू नये म्हणून गिरणी मालकांनी काय काय केले आणि आयटी पार्कच्या नावाखाली मिळालेल्या एफएसआयचे कसे उल्लंघन केले याकडे भाजपाचे आशिष शेलार यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. एफएसआय उल्लंघनाचा घोटाळा ५०० कोटी रुपयांचा असून या प्रकरणी चौकशीची मागणी त्यांनी केली.२००१ मध्ये गिरणीमालकधार्जिणे धोरण स्वीकारले तेव्हा मुख्यमंत्री अन् नगरविकास मंत्री कोण होते हे सभागृहात सांगा, अशी मागणी शिवसेनेचे सुनील प्रभू यांनी केली. त्यावर, ते सगळ्या महाराष्ट्राला ठाऊक असल्याचा चिमटा मुख्यमंत्र्यांनी काढला.

टॅग्स :Devendra Fadnvisदेवेंद्र फडणवीसJayant Patilजयंत पाटील