शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

दलित समाजाला लक्ष्य करण्यासाठीच कोम्बिंग, कॉंग्रेसचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 01:40 IST

कोरेगाव भीमा हिंसाचाराच्या निषेधार्थ पुकारलेल्या महाराष्ट्र बंदनंतर पोलिसांकडून सध्या कोम्बिंग आॅपरेशन सुरू आहे. रात्री अपरात्री घरात घुसून तरुण, महिला, अल्पवयीन मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना विनाचौकशी अटक करण्याचे काम सध्या पोलीस दलाकडून सुरू आहे. दलित समाजाला लक्ष्य करून सुरू असलेले कोम्बिंग आॅपरेशन ताबडतोब थांबविण्याची मागणी काँग्रेसने केली आहे.

मुंबई : कोरेगाव भीमा हिंसाचाराच्या निषेधार्थ पुकारलेल्या महाराष्ट्र बंदनंतर पोलिसांकडून सध्या कोम्बिंग आॅपरेशन सुरू आहे. रात्री अपरात्री घरात घुसून तरुण, महिला, अल्पवयीन मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना विनाचौकशी अटक करण्याचे काम सध्या पोलीस दलाकडून सुरू आहे. दलित समाजाला लक्ष्य करून सुरू असलेले कोम्बिंग आॅपरेशन ताबडतोब थांबविण्याची मागणी काँग्रेसने केली आहे.राज्यात आतापर्यंत विविध ठिकाणांहून दलित समाजाच्या हजारो लोकांना अटक करण्यात आली आहे. मात्र, कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी आरोप दाखल झालेल्या मिलिंद एकबोटे आणि मनोहर भिडे यांच्यावर मात्र अद्याप कसलीच कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे मनुवादी विचारधारेच्या सरकारच्या इशाºयावर पोलीस कारवाई करत आहेत अशी भावना दलित समाजात निर्माण झाल्याचे प्रदेश काँग्रेस सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी सांगितले. दलित समाजाला लक्ष्य करून सुरू असलेल्या या अटकसत्राचा काँग्रेस तीव्र शब्दांत निषेध करीत असून राज्य सरकारने हे कोम्बिंग आॅपरेशन तत्काळ थांबवावे, अशी मागणीही सावंत यांनी केली.आंबेडकरांचा विरोधभारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी कोम्बिंग आॅपरेशन बेकायदा असल्याचे म्हटले आहे. कोम्बिंग ही लष्करी कारवाई असते. नागरी भागात अशा प्रकारची कारवाई करता येत नसल्याचा स्पष्ट निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने अनेकदा दिला आहे. त्यामुळे राज्य सरकारने कोम्बिंग आॅपरेशन थांबविण्याची मागणी आंबेडकर यांनी अलीकडेच केली. कोम्बिंग बाबत नियमावली तयार करण्यासाठी न्यायालयात जाणार असल्याचेही आंबेडकरांनी स्पष्ट केले होते.कोरेगाव-भीमाच्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी व्हावी- संभाजी राजे यांची मागणीअकोला : कोरेगाव-भीमाच्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, यामध्ये कोणत्याही धर्माचे-जातीचे व्यक्ती दोषी असले तरी चालेल, त्यांच्यावर गंभीर कारवाई झाली पाहिजे, त्यांना कोणीही पाठीशी घालू नये अशी प्रतिक्रिया खासदार संभाजी राजे यांनी पत्रकार परिषदेत दिली.छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा स्थानांतरण कार्यक्रमानंतर येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, फुले-आंबेडकर-शाहू महाराजांच्या महाराष्ट्रात अशा प्रकारच्या घटना निंदनीय आहेत. बहुजन समाजाने शांत राहून समाजात अशा घटना घडू नये, यासाठी प्रयत्न करावेत. कोरेगाव-भीमाच्या निमित्ताने दलित-मराठा यामध्ये कुठेही वितुष्ट निर्माण होऊ नये, यासाठी आपला प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले.कोरेगाव-भीमाच्या घटनेप्रकरणी संभाजी भिडे-मिलिंद एकबोटे यांच्यावर गुन्हा दाखल झाला; मात्र अटकेची कारवाई नाही, असे का, असा प्रश्न विचारला असता, याचे उत्तर मी नव्हे पोलीस देतील, असे ते म्हणाले. कोरेगाव-भीमाच्या घटनेमुळे हिंदुत्ववादी संघटनांचा जोर वाढला असे वाटत असेल तर ते चौकशीतून समोर येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Bhima-koregaonभीमा-कोरेगाव