शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

मुख्यमंत्री ठाकरेंचा आणखी एक धक्का; फडणवीसांच्या महत्त्वाकांक्षी योजनेला पूर्णविराम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2020 06:54 IST

अपूर्ण कामे ३१ मार्चपर्यंत पूर्ण करणार

मुंबई : जलयुक्त शिवार अभियानाला अखेर पूर्णविराम लागला आहे. या अभियानांतर्गत अपूर्ण असलेली कामे ३१ मार्चपर्यंत पूर्ण करण्यात येतील, जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी विधानपरिषदेत लेखी उत्तरात सांगितले.जलयुक्त शिवार अभियानासाठी २०१८-१९ हे शेवटचे वर्ष होते. मागील सरकारने या अभियानाला ३१ डिसेंबर १९ पर्यंतच मुदतवाढ दिली होती. त्यामुळे योजना बंद करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे गडाख यांनी स्पष्ट केले. राज्यातील जलयुक्त शिवार योजनेस मुदतवाढ न देता ती बंद करण्यात आली का, असा प्रश्न शेकापचे जयंत पाटील यांच्यासह भाजप सदस्यांनी उपस्थित केला होता. यावर जलयुक्त शिवार योजनेला राज्य सरकारने ३१ डिसेंबर २०१९ पर्यंतच मुदतवाढ दिली होती. त्यामुळे ही योजना बंद केल्याचे म्हणता येणार नाही.शिवाय, जलयुक्त शिवार योजनेचे नाव बदलून रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ही कामे करण्याचे कोणतेच निर्देश सरकारने दिले नसल्याचे गडाख यांनी स्पष्ट केले. जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून २०१५ ते २०१९ या काळात २२ हजार ५८६ गावे निवडण्यात आली होती. या गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत एकूण ६ लाख ३२ हजार ७०८ कामे पूर्ण झाली आहेत. त्यासाठी ९ हजार ७०७ कोटींचा निधी खर्च झाल्याचे जलसंधारण मंत्र्यांनी लेखी उत्तरात स्पष्टपणे नमूद केले.योजना नव्हे, हे तर अभियानजलयुक्त शिवार ही योजना नसून एक अभियान आहे. अभियानाची मुदत संपल्यानंतरही जी कामे अपूर्ण असतील ती कामे ३१ मार्च पर्यंत पूर्ण केली जातील. मात्र नव्याने कोणतेही काम हाती घेतले जाणार नाही, असे गडाख यांनी यासंदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर सांगितले.

टॅग्स :Jalyukt Shivarजलयुक्त शिवारUddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस