शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री ठाकरेंचा आणखी एक धक्का; फडणवीसांच्या महत्त्वाकांक्षी योजनेला पूर्णविराम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2020 06:54 IST

अपूर्ण कामे ३१ मार्चपर्यंत पूर्ण करणार

मुंबई : जलयुक्त शिवार अभियानाला अखेर पूर्णविराम लागला आहे. या अभियानांतर्गत अपूर्ण असलेली कामे ३१ मार्चपर्यंत पूर्ण करण्यात येतील, जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी विधानपरिषदेत लेखी उत्तरात सांगितले.जलयुक्त शिवार अभियानासाठी २०१८-१९ हे शेवटचे वर्ष होते. मागील सरकारने या अभियानाला ३१ डिसेंबर १९ पर्यंतच मुदतवाढ दिली होती. त्यामुळे योजना बंद करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे गडाख यांनी स्पष्ट केले. राज्यातील जलयुक्त शिवार योजनेस मुदतवाढ न देता ती बंद करण्यात आली का, असा प्रश्न शेकापचे जयंत पाटील यांच्यासह भाजप सदस्यांनी उपस्थित केला होता. यावर जलयुक्त शिवार योजनेला राज्य सरकारने ३१ डिसेंबर २०१९ पर्यंतच मुदतवाढ दिली होती. त्यामुळे ही योजना बंद केल्याचे म्हणता येणार नाही.शिवाय, जलयुक्त शिवार योजनेचे नाव बदलून रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ही कामे करण्याचे कोणतेच निर्देश सरकारने दिले नसल्याचे गडाख यांनी स्पष्ट केले. जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून २०१५ ते २०१९ या काळात २२ हजार ५८६ गावे निवडण्यात आली होती. या गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत एकूण ६ लाख ३२ हजार ७०८ कामे पूर्ण झाली आहेत. त्यासाठी ९ हजार ७०७ कोटींचा निधी खर्च झाल्याचे जलसंधारण मंत्र्यांनी लेखी उत्तरात स्पष्टपणे नमूद केले.योजना नव्हे, हे तर अभियानजलयुक्त शिवार ही योजना नसून एक अभियान आहे. अभियानाची मुदत संपल्यानंतरही जी कामे अपूर्ण असतील ती कामे ३१ मार्च पर्यंत पूर्ण केली जातील. मात्र नव्याने कोणतेही काम हाती घेतले जाणार नाही, असे गडाख यांनी यासंदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर सांगितले.

टॅग्स :Jalyukt Shivarजलयुक्त शिवारUddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस