शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

राम मंदिरासाठी उद्धव ठाकरेंनी घोषित केलेले १ कोटी गेले कुठे?; शिवसेनेचा एक पैसाही आला नाही, ट्रस्टचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2020 17:47 IST

सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर अयोध्येत राम मंदिर निर्माणाचा मार्ग मोकळा झालेला आहे. या मंदिर निर्माणासाठी कोर्टाच्या आदेशानुसार जो ट्रस्ट स्थापन झाला त्याचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास हे आहेत.

ठळक मुद्देसरकारला १०० दिवस पूर्ण झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येला गेले होतेराम मंदिराच्या निर्माणासाठी १ कोटी रुपयांची देणगी देण्याची घोषणा केलीशिवसेनेकडून १ रुपयाही अद्याप आला नाही, ट्रस्टचा दावा

अयोध्या – येत्या ५ ऑगस्टला राम मंदिर भूमीपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्येत पार पडणार आहे, या सोहळ्यानिमित्त संपूर्ण अयोध्या नगरीत उत्साह पाहायला मिळत आहे. भूमीपूजनाची जय्यत तयारी राम मंदिर ट्रस्टकडून करण्यात आली आहे. अशातच शिवसेनेने राम मंदिर उभारणीसाठी घोषित १ कोटी रुपयांपैकी १ रुपयाही पोहचला नाही असं राम मंदिर निर्माण ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास यांनी सांगितले आहे.

सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर अयोध्येत राम मंदिर निर्माणाचा मार्ग मोकळा झालेला आहे. या मंदिर निर्माणासाठी कोर्टाच्या आदेशानुसार जो ट्रस्ट स्थापन झाला त्याचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास हे आहेत. सध्या राम मंदिर भूमीपूजनाच्या पार्श्वभूमीवर एबीपी माझाने महंत गोपाल दास यांच्याशी संवाद साधला त्यात ट्रस्टचे अध्यक्ष गोपाल दास यांनी दावा केला आहे की, शिवसेनेकडून १ कोटी रुपयांच्या देणगीची जी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली होती, त्यातील एक रुपयाही ट्रस्टला मिळाला नाही.

मात्र महंताच्या या विधानावर शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी स्पष्टीकरण दिलं आहे की, २७ जुलै रोजी उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसा दिवशी राम मंदिरासाठी १ कोटी रुपयांची देणगी ट्रस्टकडे जमा करण्यात आलेले आहेत. २८ तारखेला ही रक्कम ट्रस्टकडे जमा झाली असा दावा त्यांनी केला आहे. मात्र महंत यांनी राम मंदिर ट्रस्टला पैसे पोहचले नाहीत असं सांगितल्याने ते १ कोटी रुपये कुठे गेले याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

राज्यात सत्तापालट झाल्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार आलं, या सरकारला १०० दिवस पूर्ण झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अयोध्येत जाऊन रामाचं दर्शन घेतले होते, त्यावेळी अयोध्येत निर्माण होणाऱ्या राम मंदिरासाठी उद्धव ठाकरेंनी शिवसेनेकडून १ कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली होती. मार्चमध्ये उद्धव ठाकरे अयोध्येत गेले होते. तसेच उत्तर प्रदेशातील योगी सरकारने याठिकाणी जागा दिल्यास महाराष्ट्रातील रामभक्तांसाठी महाराष्ट्र भवन उभारण्याचा मानस असल्याचंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितले होते.

दरम्यान, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांना बोलावलं नसल्याबाबत महंत गोपालदास म्हणाले की, सर्वांना बोलावलं जाईल, अयोध्येत कुणाला आमंत्रणाची गरज पडत नाही, ज्याची भावना आहे ज्याच प्रेम आहे तो आपोआपा येतो, मंदिर निर्माणासाठी पैशांची कमी पडणार नाही असा विश्वासही गोपालदास यांनी व्यक्त केला.  

 

 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाRam Mandirराम मंदिरAnil Desaiअनिल देसाई