शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार; "२०१९ ला तुम्ही जोडे धुवायला गेला होता की..." 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2023 19:02 IST

हे सरकार सर्वसामान्यांचे आहे. त्यांच्यावर अन्याय करणार नाही. लोकांच्या हिताचा निर्णय घेईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ग्वाही दिली. 

पालघर - सर्वसामान्य जोडे पुसणारा हा विश्वासू असतो तुमच्यासारखा विश्वासघातकी नसतो. त्यामुळे मुजोरीपणा करणाऱ्यांना मतपेटीतून जनता नक्की जोडे मारेल असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे. बारसू रिफायनरी प्रकल्पावरून ठाकरेंनी केलेल्या टीकेला एकनाथ शिंदेंनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. 

कंत्राटदार नेते बनायला लागले अन्...; उद्धव ठाकरेंचा शिंदे-फडणवीसांवर हल्लाबोल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, २०१९ ला जोडे पुसायला कोण गेले होते? जोडे धुवायला गेले होते की डोक्यावर घ्यायला गेले होते? हे लोकांना माहिती आहे. हा द्वेष, मत्सर आहे. सर्वसामान्य माणसाबाबत राग आहे. चहावाला, टपरीवाला, रिक्षावाला सर्वसामान्य माणसं नेतृत्व करायला लागतात तेव्हा अशाप्रकारे पोटदुखी होते. त्यातूनच अशी प्रतिक्रिया येते असं त्यांनी म्हटलं. 

तसेच बारसू इथं रिफायनरी प्रकल्प व्हावा यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला पत्र लिहिले होते. त्यानंतर मुख्यमंत्रिपद गेल्यानंतर भूमिका बदलली त्याचे कारण काय? याचा शोध जनतेने घेतला पाहिजे. ही दुटप्पी भूमिका वारंवार घेतली जाते. समृद्धी महामार्गाच्या प्रकल्पालाही हीच भूमिका घेतली होती. परंतु समृद्धी महामार्ग हा गेमचेंजर प्रकल्प आम्ही केला. त्याला नावही बाळासाहेबांचे दिले. बारसूचा प्रकल्प सर्वसामान्यांना विश्वासात घेऊनच, कुणावरही अन्याय न करता हा प्रकल्प लोकांच्या हितासाठी केला जाईल. हे सरकार सर्वसामान्यांचे आहे. त्यांच्यावर अन्याय करणार नाही. लोकांच्या हिताचा निर्णय घेईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ग्वाही दिली. 

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे? महाराष्ट्रातून चांगले प्रकल्प दुसऱ्या राज्यात जात आहेत आणि पर्यावरणाचा ऱ्हास करणारे प्रकल्प राज्यात आणले जातायेत. एअरबस, वेदांता हे प्रकल्प राज्यात का आणले नाहीत? रिफायनरी प्रकल्पाबाबत सत्य काय हे लोकांना कळाले पाहिजे. ग्रीन रिफायनरी असेल तर मारझोड कशाला करतायेत? तुमच्यात आत्मविश्वास असेल तर जनतेसमोर जावे. सध्या मुख्यमंत्री स्वत:च्या शेतात फिरतायेत आणि तिकडे लोक रस्त्यावर उतरलेत अशी टीका ठाकरेंनी केली होती. त्याचसोबत अलीकडेच जोडे बनवणारी कंपनीही तामिळनाडूत गेली. जोडे पुसण्याची लायकी असलेले लोक राज्य करतायेत. महाराष्ट्राचे होणार काय? माझ्या पाठित वार करून सरकार पाडले. त्याचा सूड आणि बदला घेणारच असा इशाराही उद्धव ठाकरेंनी दिला होता.  

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरे