शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

Eknath Shinde : "…नाहीतर आमचाच 'कार्यक्रम' झाला असता"; एकनाथ शिंदेंनी सांगितलं नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2022 15:13 IST

Eknath Shinde And Shivsena : राज्यातील नव्या सरकारच्या सत्तास्थापनेसंदर्भातील घडामोडींबद्दल बोलताना मुख्यमंत्र्यांनी गळ्यावर हात फिरवत आमचाच 'कार्यक्रम' झाला असता असं म्हटलं आहे. 

मुंबई - राज्यात भाजपा आणि शिवसेनेचा शिंदे गट यांनी एकत्र येत सत्तास्थापन केली. या सर्व घडामोडीत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे राज्याचे मुख्यमंत्री असतील मी मंत्रिमंडळात सहभागी नसेन असं विधान देवेंद्र फडणवीस (BJP Devendra Fadnavis) यांनी केले होते. त्यानंतर काही तासातच भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने फडणवीसांच्या निर्णयाला बदलून त्यांना मंत्रिमंडळात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. यानंतर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले आहेत. यानंतर आता राज्यातील नव्या सरकारच्या सत्तास्थापनेसंदर्भातील घडामोडींबद्दल बोलताना मुख्यमंत्र्यांनी गळ्यावर हात फिरवत आमचाच 'कार्यक्रम' झाला असता असं म्हटलं आहे. 

"मलाही विश्वास नव्हता की मी राज्याच्या मुख्यमंत्री होईल. मात्र सर्व काही घडत गेलं. तुम्ही सर्व टीव्हीमध्ये पाहिलं असेल. तुम्हाला पण धाकधूक लागली असेल. आम्ही सुरुवातीला तीन-चार दिवस झोपलोच नाही. तीन दिवस सतत दिवस-रात्र हा एकनाथ शिंदे एक मिनिट पण झोपला नव्हता कारण खूप टेन्शन होतं" असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. तसेच "डोक्यात त्यावेळी बऱ्याच गोष्टी सुरू होत्या. आम्ही मोठा कार्यक्रम हातात घेतला होता. नाहीतर आमचाच कार्यक्रम झाला असता" असं शिंदेंनी म्हटलं आहे. 

"परमेश्वर आमच्या पाठीशी होता. बघता बघता सगळे लोक एक एक करत वाढत गेले. एक दोन नव्हे तर 50 लोक एकत्र आले" असंही शिंदेंनी सांगितलं धनगर मेळावा आणि सन्मान सोहळ्यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे. धनगर समाज बांधवांवर आंदोलनादरम्यान करण्यात आलेल्या केसेस मागे घेण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करू, तसेच ज्या ३ धनगर समाजबांधवांनी आरक्षण आंदोलनात आत्मदहन केले. त्यांच्या कुटुंबियांना सरकारच्या वतीने प्रत्येकी १० लाख रुपये मदत दिली जाईल, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. 

धनगर समाजासाठी जाहीर करण्यात आलेली आर्थिक मदत देखील लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू अशी ग्वाही देखील एकनाथ शिंदेंनी यावेळी दिली. राज्यातील धनगर समाज बांधवांच्या विविध प्रश्न मांडण्यासाठी धनगर समाज बांधवांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात उपस्थित राहून बहुसंख्येने जमलेल्या धनगर बांधवांशी शिंदेंनी रविवारी संवाद साधला.

तुमच्या ज्या काही हक्काच्या मागण्या आहे, त्याला मी नक्की हात घालणार आहे. न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. धनगर समाजाच्या मागण्या आहेत. एक एक काम आपण मार्गी लावू. एक-एक सुविधा देऊ. धनगर समाजासाठी जे काही करायला पाहिजे ते नक्की केलं जाईल, एवढी खात्री बाळगा, असंही एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.  

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारण