शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

Eknath Shinde : "…नाहीतर आमचाच 'कार्यक्रम' झाला असता"; एकनाथ शिंदेंनी सांगितलं नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2022 15:13 IST

Eknath Shinde And Shivsena : राज्यातील नव्या सरकारच्या सत्तास्थापनेसंदर्भातील घडामोडींबद्दल बोलताना मुख्यमंत्र्यांनी गळ्यावर हात फिरवत आमचाच 'कार्यक्रम' झाला असता असं म्हटलं आहे. 

मुंबई - राज्यात भाजपा आणि शिवसेनेचा शिंदे गट यांनी एकत्र येत सत्तास्थापन केली. या सर्व घडामोडीत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे राज्याचे मुख्यमंत्री असतील मी मंत्रिमंडळात सहभागी नसेन असं विधान देवेंद्र फडणवीस (BJP Devendra Fadnavis) यांनी केले होते. त्यानंतर काही तासातच भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने फडणवीसांच्या निर्णयाला बदलून त्यांना मंत्रिमंडळात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. यानंतर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले आहेत. यानंतर आता राज्यातील नव्या सरकारच्या सत्तास्थापनेसंदर्भातील घडामोडींबद्दल बोलताना मुख्यमंत्र्यांनी गळ्यावर हात फिरवत आमचाच 'कार्यक्रम' झाला असता असं म्हटलं आहे. 

"मलाही विश्वास नव्हता की मी राज्याच्या मुख्यमंत्री होईल. मात्र सर्व काही घडत गेलं. तुम्ही सर्व टीव्हीमध्ये पाहिलं असेल. तुम्हाला पण धाकधूक लागली असेल. आम्ही सुरुवातीला तीन-चार दिवस झोपलोच नाही. तीन दिवस सतत दिवस-रात्र हा एकनाथ शिंदे एक मिनिट पण झोपला नव्हता कारण खूप टेन्शन होतं" असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. तसेच "डोक्यात त्यावेळी बऱ्याच गोष्टी सुरू होत्या. आम्ही मोठा कार्यक्रम हातात घेतला होता. नाहीतर आमचाच कार्यक्रम झाला असता" असं शिंदेंनी म्हटलं आहे. 

"परमेश्वर आमच्या पाठीशी होता. बघता बघता सगळे लोक एक एक करत वाढत गेले. एक दोन नव्हे तर 50 लोक एकत्र आले" असंही शिंदेंनी सांगितलं धनगर मेळावा आणि सन्मान सोहळ्यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे. धनगर समाज बांधवांवर आंदोलनादरम्यान करण्यात आलेल्या केसेस मागे घेण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करू, तसेच ज्या ३ धनगर समाजबांधवांनी आरक्षण आंदोलनात आत्मदहन केले. त्यांच्या कुटुंबियांना सरकारच्या वतीने प्रत्येकी १० लाख रुपये मदत दिली जाईल, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. 

धनगर समाजासाठी जाहीर करण्यात आलेली आर्थिक मदत देखील लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू अशी ग्वाही देखील एकनाथ शिंदेंनी यावेळी दिली. राज्यातील धनगर समाज बांधवांच्या विविध प्रश्न मांडण्यासाठी धनगर समाज बांधवांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात उपस्थित राहून बहुसंख्येने जमलेल्या धनगर बांधवांशी शिंदेंनी रविवारी संवाद साधला.

तुमच्या ज्या काही हक्काच्या मागण्या आहे, त्याला मी नक्की हात घालणार आहे. न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. धनगर समाजाच्या मागण्या आहेत. एक एक काम आपण मार्गी लावू. एक-एक सुविधा देऊ. धनगर समाजासाठी जे काही करायला पाहिजे ते नक्की केलं जाईल, एवढी खात्री बाळगा, असंही एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.  

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारण