शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

Maharashtra Politics: “आम्ही साडेतीन महिन्यांपूर्वी मॅच जिंकली”; भारत-पाक सामन्यावरुन CM एकनाथ शिंदेंची टोलेबाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2022 13:06 IST

Maharashtra Politics: मेलबर्नमध्ये बाळासाहेबांची शिवसेना झळकली. स्टेडियममध्ये बाळासाहेबांच्या शिवसेनेचे पोस्टर झळकवण्यात आले, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

Maharashtra Politics: ऑस्ट्रेलियातील मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर भारत-पाकिस्तान (IND VS PAK) सामन्यात जे काही अनुभवायला मिळाले ते कुणालाही शब्दात सांगणे अवघड आहे. टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतानेपाकिस्तानवर विजय मिळवला आणि खऱ्या अर्थाने देशवासीयांची दिवाळी गोड झाली. पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर देशभरात जल्लोष करण्यात आला. फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. यानंतर देशभरातून यावर प्रतिक्रिया आल्या. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही भारत-पाकिस्तान सामन्यावर भाष्य केले. आम्ही साडेतीन महिन्यांपूर्वी मॅच जिंकली, असा टोलाही एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी लगावला. 

अत्यंत चुरशीच्या झालेल्या भारतविरुद्ध पाकिस्तान सामन्याची जोरदार चर्चा अद्यापही सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेदेखील या सामन्यामुळे प्रभावित झाल्याचे सांगितले जात आहे. टीम इंडियाने एक मॅच जिंकली. तशीच मॅच आपण तीन साडेतीन महिन्यांपूर्वी जिंकलीय, असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी जोरदार फटकेबाजी केली. ठाण्यात दिवाळी निमित्ताने दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली. ठाणेकरांना दिवाळीच्या शुभेच्छा देतानाच एकनाथ शिंदेंनी खोचक टोले लगावले. 

मेलबर्नमध्येही बाळासाहेबांची शिवसेना झळकली

टीम इंडिया जिंकली हा आनंदाचा क्षण आहे. तोही उत्सव आहेच. तुम्ही पाहिले असेल मेलबर्नमध्येही बाळासाहेबांची शिवसेना झळकली. स्टेडियममध्ये बाळासाहेबांच्या शिवसेनेचे पोस्टर झळकवण्यात आले. आम्ही तीन साडेतीन महिन्यापूर्वी एक मॅच खेळलो आणि ती जिंकली. या देशाने आणि महाराष्ट्राने पाहिली लोकांच्या मनातील राज्य आणण्याचा आम्ही प्रयत्न केला. आम्ही आल्या आल्या आपली संस्कृती परंपरा पुढे नेण्याचा प्रयत्न केला. विकासाबरोबर या गोष्टी आवश्यक आहे. माणसाचे मन आनंदी असेल तर ऊर्जा प्रेरणा घेऊन आपल्याला पुढे जाता येते. या राज्यात परिवर्तनाचे पर्व सुरू झाले आहे. हे विकासाचे पर्व असेल. या राज्याचा आपल्याला विकास करायचा आहे. जिथे जातो तिथे लोक उत्स्फुर्त प्रतिसाद देत आहेत, असे एकनाथ शिंदे यांनी नमूद केले. 

दरम्यान, ग्रामपंचायतीच्या निवडणूक निकालांतर भाष्य करताना, ग्रामपंचायतीच्या निकालात भाजपला ३९७ जागा मिळाल्या. शिवसेनेला २९८ जागा मिळाल्या. आपले सरपंच निवडून आले. ही चांगली नांदी आहे, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेT20 World Cupट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२IndiaभारतPakistanपाकिस्तान