शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027 : केंद्र सरकारकडून जनगणनेची अधिसूचना जारी! ३५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करणार, अ‍ॅपचा वापर होणार
2
'अनेक वळा लोक अशा गोष्टींकडे लक्ष देत नाहीत', कुंडमळ घटनेबद्दल CM फडणवीसांनी मांडली भूमिका
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात बिघाड; फ्लाईटने हवेतून यु-टर्न घेतला, हाँगकाँगला गेले
4
"इराणने मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, बेडरूमवर डागलं क्षेपणास्त्र’’, इस्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी केला दावा   
5
टाटा मोटर्सचे शेअर्स ५% ने घसरले, जर तुम्हीही गुंतवणूक केली असेल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या
6
Kedarnath Helicopter Crash:'हेलिकॉप्टर थोडे वळले, मागे गेले आणि मग...', केदारनाथ हेलिकॉप्टर अपघाताचे खरे कारण समोर आले
7
अमृता सुभाष अन् अनिता दातेच्या 'जारण'ची वाढती लोकप्रियता, १० दिवसातली कमाई किती?
8
Air India Plane Crash: ९२ जणांचे DNA नमुने जुळले, पण ८७ जणांचीच पटली ओळख; कारण...
9
संजय कपूरच्या निधनानंतर करिश्माला बसणार मोठा फटका! दर महिन्याला मिळणारी रक्कम होणार बंद?
10
'पाकिस्तान इस्रायलवर अणु बॉम्ब टाकेल', इराणी अधिकाऱ्याच्या दाव्यानंतर पाक स्पष्टच बोलला!
11
Israel Iran War: इस्रायलचा इराणवर बॉम्बवर्षाव; ४०६ जण ठार!
12
Govandi Accident: ‘मुझे अब पापा कौन कहेंगे?’ गोवंडी अपघातात मुलांना गमावलेल्या वडिलांनी फोडला टाहो!
13
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
14
Lufthansa Hyderabad Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
15
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
16
Astrology: जुलैअखेर पर्यंत अस्मानी-सुलतानी संकटांचे सावट; दररोज करा 'हे' उपाय!
17
काय आहे लोडिंग फॅक्टर, घर घेताना अनेकदा तुमच्यापासून लपवून ठेवतात लोक; मोठ्या प्रमाणात होतं नुकसान
18
ST Bus Pass: सरकारनं विद्यार्थ्यांना केलं खूश, एसटी पासबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
20
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?

Maharashtra Politics: “आम्ही साडेतीन महिन्यांपूर्वी मॅच जिंकली”; भारत-पाक सामन्यावरुन CM एकनाथ शिंदेंची टोलेबाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2022 13:06 IST

Maharashtra Politics: मेलबर्नमध्ये बाळासाहेबांची शिवसेना झळकली. स्टेडियममध्ये बाळासाहेबांच्या शिवसेनेचे पोस्टर झळकवण्यात आले, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

Maharashtra Politics: ऑस्ट्रेलियातील मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर भारत-पाकिस्तान (IND VS PAK) सामन्यात जे काही अनुभवायला मिळाले ते कुणालाही शब्दात सांगणे अवघड आहे. टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतानेपाकिस्तानवर विजय मिळवला आणि खऱ्या अर्थाने देशवासीयांची दिवाळी गोड झाली. पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर देशभरात जल्लोष करण्यात आला. फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. यानंतर देशभरातून यावर प्रतिक्रिया आल्या. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही भारत-पाकिस्तान सामन्यावर भाष्य केले. आम्ही साडेतीन महिन्यांपूर्वी मॅच जिंकली, असा टोलाही एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी लगावला. 

अत्यंत चुरशीच्या झालेल्या भारतविरुद्ध पाकिस्तान सामन्याची जोरदार चर्चा अद्यापही सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेदेखील या सामन्यामुळे प्रभावित झाल्याचे सांगितले जात आहे. टीम इंडियाने एक मॅच जिंकली. तशीच मॅच आपण तीन साडेतीन महिन्यांपूर्वी जिंकलीय, असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी जोरदार फटकेबाजी केली. ठाण्यात दिवाळी निमित्ताने दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली. ठाणेकरांना दिवाळीच्या शुभेच्छा देतानाच एकनाथ शिंदेंनी खोचक टोले लगावले. 

मेलबर्नमध्येही बाळासाहेबांची शिवसेना झळकली

टीम इंडिया जिंकली हा आनंदाचा क्षण आहे. तोही उत्सव आहेच. तुम्ही पाहिले असेल मेलबर्नमध्येही बाळासाहेबांची शिवसेना झळकली. स्टेडियममध्ये बाळासाहेबांच्या शिवसेनेचे पोस्टर झळकवण्यात आले. आम्ही तीन साडेतीन महिन्यापूर्वी एक मॅच खेळलो आणि ती जिंकली. या देशाने आणि महाराष्ट्राने पाहिली लोकांच्या मनातील राज्य आणण्याचा आम्ही प्रयत्न केला. आम्ही आल्या आल्या आपली संस्कृती परंपरा पुढे नेण्याचा प्रयत्न केला. विकासाबरोबर या गोष्टी आवश्यक आहे. माणसाचे मन आनंदी असेल तर ऊर्जा प्रेरणा घेऊन आपल्याला पुढे जाता येते. या राज्यात परिवर्तनाचे पर्व सुरू झाले आहे. हे विकासाचे पर्व असेल. या राज्याचा आपल्याला विकास करायचा आहे. जिथे जातो तिथे लोक उत्स्फुर्त प्रतिसाद देत आहेत, असे एकनाथ शिंदे यांनी नमूद केले. 

दरम्यान, ग्रामपंचायतीच्या निवडणूक निकालांतर भाष्य करताना, ग्रामपंचायतीच्या निकालात भाजपला ३९७ जागा मिळाल्या. शिवसेनेला २९८ जागा मिळाल्या. आपले सरपंच निवडून आले. ही चांगली नांदी आहे, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेT20 World Cupट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२IndiaभारतPakistanपाकिस्तान