शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

Maharashtra Politics: “मविआच्या महामोर्चापेक्षा आमची कोकणातील सभा मोठी होती”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2022 19:40 IST

Maharashtra News: सरकार एवढ्या वेगाने काम करतेय ते पाहून, जे घरात होते ते बाहेर आले, बाहेरचे रस्त्यावर उतरुन मोर्चात आले, आनंद आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटले आहे.

Maharashtra Politics:महाविकास आघाडीने महामोर्चा काढत शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. या मोर्चात तीनही पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. महाविकास आघाडीचे प्रमुख नेतेही या मोर्चात सहभागी झाले होते. मात्र, या मोर्चावरून आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत. भाजपने या मोर्चावर टीका केली आहे. यातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही यावर प्रतिक्रिया नोंदवली असून, महाविकास आघाडीच्या महामोर्चापेक्षा आमची कोकणातील सभा मोठी होती, असा खोचक टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला. 

तीनही पक्षांनी एवढी मेहनत घेतली. किती बैठका घेतल्या, किती तयारी केली, आणि मोर्चा आपण पाहिलेला आहे, त्याला किती यश मिळाले आहे, ते मला सांगण्याची आवश्यकता नाही. आमच्या कोकणातील सभेची माहिती घ्यावी. राज्य सरकारचे काम पाहून विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे, या शब्दांत एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीवर पलटवार केला आहे. 

सत्ता गेल्याने हताश झालेत, तीच-तीच भाषणे पाहिली

सत्ता गेल्याने हे हताश झालेत. आपण तीच-तीच भाषणे पाहिली. आरोप-प्रत्यरोपांची चढाओढ लागलेली आपण पाहिली. खरे म्हणजे जे चार-पाच महिन्यांपासून आम्ही जे काम करतोय ते पाहून त्यांना हताशपणा आणि नैराश्य आलेले आहे. एवढी मोठी तयारी, तीन पक्ष असूनही अन्य लोकांची मदत घ्यावी लागली. मुंबईत भगवा झेंड्यापेक्षा इतर झेंडे जास्त दिसत होते. त्यामुळे शिवसैनिक शिंदे गटात प्रवेश करत आहेत. आमदार, खासदार, पदाधिकारी रोज प्रवेश करत आहेत, असे एकनाथ शिंदे यांनी नमूद केले. 

आमचे युतीचे सरकार प्रचंड बहुमताने येईल

संजय राऊतांनी हे सरकार फेब्रुवारीचा महिना पाहणार नाही. ते कोसळेल, असा दावा केला होता. यावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, हे सरकार भक्कम आहे. केंद्राचा भक्कम पाठिंबा आहे. मोदी-शाह यांचा भक्कम पाठिंबा आहे. म्हणून आम्ही निर्णय घेत आहोत. नैराश्यापोटी सरकार पाडण्याचे दावे केले जात आहे. कुणी त्यावेळी म्हणाले होते की, एक महिन्यात सरकार पडेल. पण पाच महिने झाले. आता फेब्रुवारीचा मुहूर्त काढला आहे. ते मुहुर्तावर मुहूर्त काढत आहेत. एवढेच आहे की, त्यांना त्यांचा पक्ष वाचवण्यासाठी, कार्यकर्त्यांना थांबवण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. हे सरकार मजबूत आहे. सरकार सर्व कार्यकाळ पूर्ण करेल. तसेच पुढच्या निवडणुकीत आमचे युतीचे सरकार प्रचंड बहुमताने येईल, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. 

बाळासाहेबांचे विचार कुणी तोडून मोडून टाकले?

उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेवर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, लफंगे कोण आहे हे महाराष्ट्राने पाहिले आहे. त्यामुळे सत्ता मिळवण्यासाठी लफंगेगिरी कोणी केली? बाळासाहेबांचे विचार कुणी तोडून मोडून टाकले? ज्या पक्षाबरोबर निवडणूक लढवली त्याच्या पाठित कसा खंजीर खुपसला, ही लफंगेगिरीच आहे, असा पलटवार एकनाथ शिंदे यांनी केला. 

दरम्यान, जी काही सत्ता मिळवण्यासाठी बेईमानी केलेली आहे हे महाराष्ट्राच्या जनतेने पाहिलेय. त्यामुळे जास्त बोलण्याची आवश्यकता नाही. फक्त एवढेच सांगतो, सरकार एवढ्या वेगवान गतीने काम करतेय ते पाहून त्यांनी धास्ती घेतलीय. त्यामुळे जे घरात होते ते बाहेर आले, बाहेरचे रस्त्यावर आले आणि मोर्चात आले, आनंद आहे, चांगले आहे, अशी खोचक टीका एकनाथ शिंदे यांनी केली. जे आपल्या हिंदू देवदेवतांना शिव्या घालणारे, सावरकरांना अपमान करणारे हे व्यासपीठावर होते हे महाराष्ट्राचे दुर्देवी आहे, अशी खंतही शिंदे यांनी व्यक्त केली.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेMahavikas Aghadiमहाविकास आघाडीUddhav Thackerayउद्धव ठाकरे