शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

Maharashtra Politics: “मविआच्या महामोर्चापेक्षा आमची कोकणातील सभा मोठी होती”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2022 19:40 IST

Maharashtra News: सरकार एवढ्या वेगाने काम करतेय ते पाहून, जे घरात होते ते बाहेर आले, बाहेरचे रस्त्यावर उतरुन मोर्चात आले, आनंद आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटले आहे.

Maharashtra Politics:महाविकास आघाडीने महामोर्चा काढत शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. या मोर्चात तीनही पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. महाविकास आघाडीचे प्रमुख नेतेही या मोर्चात सहभागी झाले होते. मात्र, या मोर्चावरून आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत. भाजपने या मोर्चावर टीका केली आहे. यातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही यावर प्रतिक्रिया नोंदवली असून, महाविकास आघाडीच्या महामोर्चापेक्षा आमची कोकणातील सभा मोठी होती, असा खोचक टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला. 

तीनही पक्षांनी एवढी मेहनत घेतली. किती बैठका घेतल्या, किती तयारी केली, आणि मोर्चा आपण पाहिलेला आहे, त्याला किती यश मिळाले आहे, ते मला सांगण्याची आवश्यकता नाही. आमच्या कोकणातील सभेची माहिती घ्यावी. राज्य सरकारचे काम पाहून विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे, या शब्दांत एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीवर पलटवार केला आहे. 

सत्ता गेल्याने हताश झालेत, तीच-तीच भाषणे पाहिली

सत्ता गेल्याने हे हताश झालेत. आपण तीच-तीच भाषणे पाहिली. आरोप-प्रत्यरोपांची चढाओढ लागलेली आपण पाहिली. खरे म्हणजे जे चार-पाच महिन्यांपासून आम्ही जे काम करतोय ते पाहून त्यांना हताशपणा आणि नैराश्य आलेले आहे. एवढी मोठी तयारी, तीन पक्ष असूनही अन्य लोकांची मदत घ्यावी लागली. मुंबईत भगवा झेंड्यापेक्षा इतर झेंडे जास्त दिसत होते. त्यामुळे शिवसैनिक शिंदे गटात प्रवेश करत आहेत. आमदार, खासदार, पदाधिकारी रोज प्रवेश करत आहेत, असे एकनाथ शिंदे यांनी नमूद केले. 

आमचे युतीचे सरकार प्रचंड बहुमताने येईल

संजय राऊतांनी हे सरकार फेब्रुवारीचा महिना पाहणार नाही. ते कोसळेल, असा दावा केला होता. यावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, हे सरकार भक्कम आहे. केंद्राचा भक्कम पाठिंबा आहे. मोदी-शाह यांचा भक्कम पाठिंबा आहे. म्हणून आम्ही निर्णय घेत आहोत. नैराश्यापोटी सरकार पाडण्याचे दावे केले जात आहे. कुणी त्यावेळी म्हणाले होते की, एक महिन्यात सरकार पडेल. पण पाच महिने झाले. आता फेब्रुवारीचा मुहूर्त काढला आहे. ते मुहुर्तावर मुहूर्त काढत आहेत. एवढेच आहे की, त्यांना त्यांचा पक्ष वाचवण्यासाठी, कार्यकर्त्यांना थांबवण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. हे सरकार मजबूत आहे. सरकार सर्व कार्यकाळ पूर्ण करेल. तसेच पुढच्या निवडणुकीत आमचे युतीचे सरकार प्रचंड बहुमताने येईल, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. 

बाळासाहेबांचे विचार कुणी तोडून मोडून टाकले?

उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेवर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, लफंगे कोण आहे हे महाराष्ट्राने पाहिले आहे. त्यामुळे सत्ता मिळवण्यासाठी लफंगेगिरी कोणी केली? बाळासाहेबांचे विचार कुणी तोडून मोडून टाकले? ज्या पक्षाबरोबर निवडणूक लढवली त्याच्या पाठित कसा खंजीर खुपसला, ही लफंगेगिरीच आहे, असा पलटवार एकनाथ शिंदे यांनी केला. 

दरम्यान, जी काही सत्ता मिळवण्यासाठी बेईमानी केलेली आहे हे महाराष्ट्राच्या जनतेने पाहिलेय. त्यामुळे जास्त बोलण्याची आवश्यकता नाही. फक्त एवढेच सांगतो, सरकार एवढ्या वेगवान गतीने काम करतेय ते पाहून त्यांनी धास्ती घेतलीय. त्यामुळे जे घरात होते ते बाहेर आले, बाहेरचे रस्त्यावर आले आणि मोर्चात आले, आनंद आहे, चांगले आहे, अशी खोचक टीका एकनाथ शिंदे यांनी केली. जे आपल्या हिंदू देवदेवतांना शिव्या घालणारे, सावरकरांना अपमान करणारे हे व्यासपीठावर होते हे महाराष्ट्राचे दुर्देवी आहे, अशी खंतही शिंदे यांनी व्यक्त केली.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेMahavikas Aghadiमहाविकास आघाडीUddhav Thackerayउद्धव ठाकरे