शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
4
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
5
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
6
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
7
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
8
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
9
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
10
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
11
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
12
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
13
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
14
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
15
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
16
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
17
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
18
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
19
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक

Maharashtra Political Crisis: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईला रवाना; बंडखोर आमदार कधी येणार? महत्त्वाची अपडेट समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2022 16:56 IST

Maharashtra Political Crisis: मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी गोव्याला जाऊन बंडखोर आमदारांची एक विशेष बैठक घेतल्याचे सांगितले जात आहे.

मुंबई: शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यावरही राजकीय घडामोडींचा वेग कमी झालेला दिसत नाही. नव्या सरकारला बहुमत चाचणी सिद्ध करण्याचे आदेश राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी दिल्यानंतर आता विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवण्यात आले आहे. यासंदर्भातील हालचाली सुरू झाल्या असून, बंडखोर आमदारांचे नेते एकनाथ शिंदे गोव्याहून मुंबईला रवाना झाले असून, बंडखोर आमदार कधीपर्यंत मुंबईत परतणार याविषयी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. 

गुवाहाटीवरून गोव्याला गेलेले बंडखोर आमदार शनिवार, २ जुलै रोजी मुंबईत दाखल होणार आहेत. सुरुवातीला आलेल्या माहितीनुसार, २ आणि ३ जुलै रोजी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन घेण्यात येणार होते. मात्र, आता हे अधिवेशन ३ आणि ४ जुलै रोजी विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे सर्व बंडखोर आमदार तसेच शिंदे गटाला पाठिंबा दिलेले अपक्ष आमदार शनिवारी मुंबईत दाखल होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना बंडखोर आणि इतर अपक्ष आमदार हे भाजप आमदारांसह हॉटेल ताजमध्ये वास्तव्य करणार असल्याचे म्हटले जात आहे. 

एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस हे आमदारांना संबोधित करणार?

शिवसेना बंडखोर आणि इतर अपक्ष आमदार मुंबईत दाखल झाल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आमदारांना संबोधित करण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे रात्री उशिरा गोव्याला रवाना झाले. यावेळी त्यांनी बंडखोर आमदारांची बैठक घेतली. यानंतर ते आता पुन्हा मुंबईला रवाना झाले आहेत. राज्यातील विधान परिषद निवडणुकीनंतर शिवसेनेत बंडाळी झाली. एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक आमदारांनी सूरत गाठले. त्यानंतर शिवसेनेतील बंडखोर आमदारांची संख्या वाढत गेली. यानंतर शिंदे गट गुवाहाटीमधील हॉटेल रॅडिसनमध्ये उतरला होता. या ठिकाणी शिवसेनेचे ३९ आमदार आणि अपक्षांसह जवळपास ५० आमदार गुवाहाटीत होते. 

दरम्यान, भाजपने या सत्ता संघर्षात उडीत घेतल्यानंतर राज्यपालांना मविआ सरकारला बहुमत चाचणी घेण्यासंदर्भात पत्र दिले. यानंतर राज्यपालांनी विशेष अधिवेशन बोलावले. या पार्श्वभूमीवर बंडखोर आमदारांनी गुवाहाटीवरून गोव्याला येण्याचा निर्णय घेतला होता. सूरत, गुवाहाटी, गोव्यानंतर आता सर्व बंडखोर मुंबईत दाखल होणार आहेत.  

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळEknath Shindeएकनाथ शिंदे