शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

सोज्वळ चेहऱ्यामागे काय प्रकार चालतात हे कळलं; उदय सामंतांनी स्पष्टच सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2022 12:09 IST

माझी कार कुठल्याही शिवसैनिकाने थांबवली नाही. सिग्नलला कार थांबल्यानंतर बाजूला २ गाड्या उभ्या होत्या. त्यातून काही तरूण उतरले त्यांच्या हातात हत्यारं, दगडे होती.

मुंबई - माझ्यावर जो भ्याड हल्ला झाला त्यातून मी वाचलो आहे. लोकशाहीत जर कुणी उठाव केला तर त्याच्यावर हल्ला करणं दुर्दैवी आहे. मी शांत आहे कारण माझ्यावर संस्कार आहे. राजकारण आरोग्यदायी असले पाहिजे असं उद्धव ठाकरेंनी मुलाखतीत सांगितले. परंतु हे राजकारण समोरच्याचं आरोग्य बिघडवण्यासाठी आहे. एखाद्या सभेला हत्यारं घेऊन जातात का? असा सवाल माजी मंत्री आणि शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांनी विचारला आहे. 

उदय सामंत म्हणाले की, माझी कार कुठल्याही शिवसैनिकाने थांबवली नाही. सिग्नलला कार थांबल्यानंतर बाजूला २ गाड्या उभ्या होत्या. त्यातून काही तरूण उतरले त्यांच्या हातात हत्यारं, दगडे होती. कशाप्रकारे माझी काच फोडली गेली. त्याचे फोटो माझ्याकडे आहेत. राजकारण किती खालच्या स्तरावर जाते हे कालचं उदाहरण आहे. हा उत्स्फुर्त प्रतिसाद आहे असं सुभाष देसाई म्हणतात आणि निलम गोऱ्हे म्हणतात हे शिवसैनिक नाहीत हे संभ्रमाचं वातावरण जाणीवपूर्वक निर्माण करण्यासारखं आहे. विचार पटला नाही म्हणजे ठार मारणं हा लोकशाहीचा स्तंभ नाही. परंतु काल सोज्वळ चेहऱ्यापलीकडचे प्रकार काय चालतात ते पाहिले आहे असं आरोप त्यांनी केला. 

तसेच विकासाच्या कामातून आम्ही उत्तर देऊ असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं होतं. त्याच विचाराने आम्ही काम करतोय. मुख्यमंत्री त्याच मार्गाने जाणार होते असं सांगितले जात होते. या सर्व गोष्टीचा महाराष्ट्र पोलिसांनी विचार केला पाहिजे. २-३ व्यक्तीने पांढरे शर्ट घातलेले होते. ज्या नेत्याची सभा होती. त्यात काठ्या, चाबुक देणार आहोत अशी विधाने केली गेली. दैव्य बलवत्तर होतं म्हणून तुमच्यासमोर बोलतोय. नाहीतर माझ्या आईवडिलांना मुलाबद्दल प्रतिक्रिया विचारावी लागली असती. जे जे कुणी स्टेटमेंट देतात त्याकडे लक्ष द्यावं. जनतेच्या आशीर्वादामुळे मी सुखरुप आहे असं उदय सामंत यांनी सांगितले. 

दरम्यान, आम्ही एकनाथ शिंदेंसारख्या शाखाप्रमुखापासून मुख्यमंत्री बनवलं, तुम्ही गद्दार म्हणाला तरी शांत आहे. आईवडिलांना शिव्या घातल्या तरी शांत आहे. परंतु आम्ही शांत म्हणजे हतबल नाही. आमच्यावर संस्कार आहेत. मी असाह्य नाही. काल अर्वाच्च भाषेत शिवीगाळ होत होती. राजकारणाची लढाई विचारांची असायला हवी. विचाराचा प्रतिकार विचारानेच व्हावा. ज्यांनी हल्ला केला ते जेलमध्ये जातील. त्यांच्या कुटुंबीयांच्या मागे कोण उभं राहणार आहे? आता ती कुटुंब वाऱ्यावर पडली. आम्ही सेना स्टाईलने उत्तर देऊ. दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे आहेत. मी संयम पाळतोय. कर्माची फळे भोगावी लागणार आहे. मीदेखील काही सांगू शकतो असा इशारा उदय सामंत यांनी दिला आहे. 

असा मुख्यमंत्री होणे नाहीएकनाथ शिंदे यांच्याबाबत जो आदर होतो तो दुपटीने वाढला. माझी मेडिकल टेस्ट होईपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माझ्यासोबत होते. कुटुंबापेक्षा जास्त एकनाथ शिंदे यांनी जपलं. मनाचा मोठेपणा दाखवत पुढचे कार्यक्रम रद्द केले. सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री म्हणून ते शेवटपर्यंत माझ्यासोबत राहिले. मुख्यमंत्र्यांनी दाखवलेली संस्कृती ही खरी राजकीय संस्कृती आहे. असा मुख्यमंत्री होणे नाही अशा शब्दात उदय सामंत यांनी शिंदे यांचे कौतुक केले आहे. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाUday Samantउदय सामंतEknath Shindeएकनाथ शिंदे