शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

सोज्वळ चेहऱ्यामागे काय प्रकार चालतात हे कळलं; उदय सामंतांनी स्पष्टच सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2022 12:09 IST

माझी कार कुठल्याही शिवसैनिकाने थांबवली नाही. सिग्नलला कार थांबल्यानंतर बाजूला २ गाड्या उभ्या होत्या. त्यातून काही तरूण उतरले त्यांच्या हातात हत्यारं, दगडे होती.

मुंबई - माझ्यावर जो भ्याड हल्ला झाला त्यातून मी वाचलो आहे. लोकशाहीत जर कुणी उठाव केला तर त्याच्यावर हल्ला करणं दुर्दैवी आहे. मी शांत आहे कारण माझ्यावर संस्कार आहे. राजकारण आरोग्यदायी असले पाहिजे असं उद्धव ठाकरेंनी मुलाखतीत सांगितले. परंतु हे राजकारण समोरच्याचं आरोग्य बिघडवण्यासाठी आहे. एखाद्या सभेला हत्यारं घेऊन जातात का? असा सवाल माजी मंत्री आणि शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांनी विचारला आहे. 

उदय सामंत म्हणाले की, माझी कार कुठल्याही शिवसैनिकाने थांबवली नाही. सिग्नलला कार थांबल्यानंतर बाजूला २ गाड्या उभ्या होत्या. त्यातून काही तरूण उतरले त्यांच्या हातात हत्यारं, दगडे होती. कशाप्रकारे माझी काच फोडली गेली. त्याचे फोटो माझ्याकडे आहेत. राजकारण किती खालच्या स्तरावर जाते हे कालचं उदाहरण आहे. हा उत्स्फुर्त प्रतिसाद आहे असं सुभाष देसाई म्हणतात आणि निलम गोऱ्हे म्हणतात हे शिवसैनिक नाहीत हे संभ्रमाचं वातावरण जाणीवपूर्वक निर्माण करण्यासारखं आहे. विचार पटला नाही म्हणजे ठार मारणं हा लोकशाहीचा स्तंभ नाही. परंतु काल सोज्वळ चेहऱ्यापलीकडचे प्रकार काय चालतात ते पाहिले आहे असं आरोप त्यांनी केला. 

तसेच विकासाच्या कामातून आम्ही उत्तर देऊ असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं होतं. त्याच विचाराने आम्ही काम करतोय. मुख्यमंत्री त्याच मार्गाने जाणार होते असं सांगितले जात होते. या सर्व गोष्टीचा महाराष्ट्र पोलिसांनी विचार केला पाहिजे. २-३ व्यक्तीने पांढरे शर्ट घातलेले होते. ज्या नेत्याची सभा होती. त्यात काठ्या, चाबुक देणार आहोत अशी विधाने केली गेली. दैव्य बलवत्तर होतं म्हणून तुमच्यासमोर बोलतोय. नाहीतर माझ्या आईवडिलांना मुलाबद्दल प्रतिक्रिया विचारावी लागली असती. जे जे कुणी स्टेटमेंट देतात त्याकडे लक्ष द्यावं. जनतेच्या आशीर्वादामुळे मी सुखरुप आहे असं उदय सामंत यांनी सांगितले. 

दरम्यान, आम्ही एकनाथ शिंदेंसारख्या शाखाप्रमुखापासून मुख्यमंत्री बनवलं, तुम्ही गद्दार म्हणाला तरी शांत आहे. आईवडिलांना शिव्या घातल्या तरी शांत आहे. परंतु आम्ही शांत म्हणजे हतबल नाही. आमच्यावर संस्कार आहेत. मी असाह्य नाही. काल अर्वाच्च भाषेत शिवीगाळ होत होती. राजकारणाची लढाई विचारांची असायला हवी. विचाराचा प्रतिकार विचारानेच व्हावा. ज्यांनी हल्ला केला ते जेलमध्ये जातील. त्यांच्या कुटुंबीयांच्या मागे कोण उभं राहणार आहे? आता ती कुटुंब वाऱ्यावर पडली. आम्ही सेना स्टाईलने उत्तर देऊ. दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे आहेत. मी संयम पाळतोय. कर्माची फळे भोगावी लागणार आहे. मीदेखील काही सांगू शकतो असा इशारा उदय सामंत यांनी दिला आहे. 

असा मुख्यमंत्री होणे नाहीएकनाथ शिंदे यांच्याबाबत जो आदर होतो तो दुपटीने वाढला. माझी मेडिकल टेस्ट होईपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माझ्यासोबत होते. कुटुंबापेक्षा जास्त एकनाथ शिंदे यांनी जपलं. मनाचा मोठेपणा दाखवत पुढचे कार्यक्रम रद्द केले. सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री म्हणून ते शेवटपर्यंत माझ्यासोबत राहिले. मुख्यमंत्र्यांनी दाखवलेली संस्कृती ही खरी राजकीय संस्कृती आहे. असा मुख्यमंत्री होणे नाही अशा शब्दात उदय सामंत यांनी शिंदे यांचे कौतुक केले आहे. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाUday Samantउदय सामंतEknath Shindeएकनाथ शिंदे