शहरं
Join us  
Trending Stories
1
छ. संभाजीनगर भाजपमध्ये कार्यकर्त्यांचा उद्रेक थांबेना! मंत्र्यांच्या गाड्यांना काळं फासलं, घोषणाबाजी
2
"तैवानला चीनशी पुन्हा जोडणे हे आमचे ऐतिहासिक ध्येय...", चीनने बेटाच्या सीमेवर रॉकेटने केला बॉम्बहल्ला
3
VHT 2025 : सरफराज खानचा धमाका! स्फोटक 'सेंच्युरी'सह NZ विरुद्धच्या वनडे मालिकेआधी ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा
4
‘अगं, भाजीला काय आणू’... उत्तर येण्यापूर्वीच किंकाळी कानी पडली; पत्नीशी बोलता बोलता प्रशांत शिंदेने सोडला प्राण
5
'जबाबदारीने काम करायचे नसेल तर घरी बसा'; अजित पवारांचा नेत्यांना इशारा
6
घरगड्याच्या उमेदवारीसाठी सुरेश वरपूडकरांनी युती तोडण्याचे पाप केले; शिंदेसेनेचा आरोप
7
शिल्पा शिंदेनंतर 'अनिता भाभी'ही मालिकेत परतणार? 'धुरंधर' फेम सौम्या टंडन म्हणाली...
8
धातू बाजारात 'भूकंप'! चांदी १९ हजार रुपयांनी कोसळली, तर सोने १ हजाराने स्वस्त; किंमत अजून कमी होणार?
9
अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट! शेवटच्या क्षणी शिंदेसेनेने डाव टाकला; भाजपा-NCP एकत्र लढणार
10
Navi Mumbai: इन्स्टाग्रामवरुन जडले प्रेम, 'तिने' भेटायला बोलावलं; १५ वर्षाचा मुलगा कॅबमधून उतरला अन् घडला थरार
11
उस्मान हादी हत्या प्रकरणात बांगलादेश तोंडघशी पडला; मारेकरी भारतात नाही तर दुबईत सापडला...
12
२०२६ला गणपती कधी? यंदा १० नाही १२ दिवसांचा गणेशोत्सव; पाहा, गौरी पूजन, अनंत चतुर्दशी तारीख
13
तो म्हणतो, हॅण्डब्रेक काढताच बस उडाली; बसचालक रमेश सावंतला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात अटक; ३ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी
14
जगायचं कसं? नळाला येत होतं गटाराचं पाणी; इंदूरमध्ये मृत्यूचं तांडव, ३ अधिकारी तडकाफडकी निलंबित
15
'३ इडियट्स'च्या सीक्वलबाबत आर माधवन स्पष्टच बोलला, म्हणाला- "आम्ही आता म्हातारे झालोय..."
16
लोकसंख्यावाढीसाठी गर्भनिरोधकं केली महाग!
17
सरकारकडून दिलासा मिळण्याची अपेक्षा, Vodafone-Idea चे शेअर्स वधारले; AGR वर मिळू शकते गुड न्यूज
18
१० महिन्यांचेच वर्ष होते...! मूळ रोमन कॅलेंडरमध्ये जानेवारी, फेब्रुवारी नव्हतेच...; जुलैचे नाव राजाने आपल्या नावावरून ठेवले...
19
तुमचा फोन हॅक तर झाला नाही ना? फक्त 'हा' एक कोड डायल करा आणि काही सेकंदात सत्य जाणून घ्या
20
'२४ तासांत येमेन खाली ​​करा'; हे दोन मुस्लिम देश एकमेकांच्या विरोधात, जोरदार बॉम्बस्फोट करत केले हल्ले
Daily Top 2Weekly Top 5

CM Eknath Shinde: मुसळधार पाऊस झाला, मुंबईत पाणी तुंबले नाही पण ठाणे पाण्याखाली का गेले? CM शिंदे म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2022 00:19 IST

ठाण्यातील अनेक भाग मुसळधार पावसामुळे जलमय झाले होते, याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना प्रश्न विचारण्यात आला.

CM Eknath Shinde: मुंबई, ठाणे, उपनगर, पालघर, पुण्यासह राज्यातील अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे अनेक ठिकाणच्या सखल भागात पाणी साचले होते. यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली. यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुसळधार पाऊस झाला. मुंबईत पाणी तुंबले नाही, पण ठाण्यात मात्र अनेक ठिकाणी पाणी तुंबले असा प्रश्न विचारण्यात आला. यावर मुख्यमंत्री हसले आणि उत्तर दिले. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. यावेळी मुसळधार पावसामुळे ठाणे पाण्याखाली गेल्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना स्मित हास्य करत, पाऊस खूप जोरात पडतोय. सगळी यंत्रणा काम करतेय. फिल्डवर आहेत. जिथे जिथे नुकसान झाले असेल, त्याची दखल सरकार गांभीर्याने घेईल, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. 

विरोधकांच्या टीकेला आम्ही कामाने उत्तर देऊ

विरोधी पक्षाला आता केवळ टीका करण्यावाचून दुसरे काहीच काम उरलेले नाही. आम्ही आमचे काम करत आहोत. टीकेला टीकेने उत्तर न देता आणि आमच्या कामाने विरोधकांना उत्तर देऊ. म्हणूनच सुरुवातीच्या केवळ दोन महिन्यात अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. विरोधकांच्या टीकेला योग्य वेळी उत्तर देऊ. आता त्यावर जास्त भाष्य करणार नाही, असा इशाराही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला. 

दरम्यान, इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतचा गृहपाठ बंद करण्याविषयी निर्णय घेण्याचा सरकारचा विचार असून, याबाबत तज्ज्ञांनी यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे, यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना, हे सर्वसामान्यांचे सरकार आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान होणार असा कोणताही निर्णय घेतला जाणार नाही. विद्यार्थ्यांचे हित कशात आहे, त्यानुसार निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही एकनाथ शिंदे यांनी दिली. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदे