शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

वरळी हिट अँड रन प्रकरणातील मृत महिलेच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्र्यांकडून १० लाखांची मदत जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2024 21:35 IST

Mihir Shah, Worli Mumbai Hit and Run Case, Rs 10 Lakh aid to Kaveri Nakhwa: या प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शाह याला १६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी

Mihir Shah, Worli Mumbai Hit and Run Case, Rs 10 Lakh aid to Kaveri Nakhwa: पुण्यातील पोर्शे कारचे हिट अँड रन प्रकरण अजूनही ताजे असतानाच, रविवारी पहाटे मुंबईतील वरळी भागात असाच एक दुर्दैवी प्रकार घडला. २४ वर्षीय मिहीर शाह याने मद्यधुंद अवस्थेत कार चालवून नाखवा दाम्पत्याच्या दुचाकीला धडक दिल्याचा आरोप आहे. या दुर्घटनेत दुचाकीवरील महिला कावेरी नाखवा यांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या कावेरी नाखवा यांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून १० लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. या प्रकरणात नाखवा कुटुंबाचे झालेले नुकसान कधीही भरून येणारे नाही, पण मानवतेच्या दृष्टीकोनातून ही मदत जाहीर केली आहे अशा भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्या. मुंबई सागरी किनारा प्रकल्पाची पाहणी केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही घोषणा केली.

मुख्य आरोपी मिहीर शाह याला १६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी

वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शाह याला तब्बल ६० तासांनंतर मंगळवारी शाहपूरमधून अटक करण्यात आली. अपघातानंतर त्याने आपली कार वांद्रे, कलानगर परिसरात सोडली होती आणि वडील राजेश यांना फोन करून घटनाक्रम सांगितला होता. त्यानंतर मोबाईल बंद करून तो फरार झाला. अखेर मंगळवारी मिहीर शाहला शहापूरमधून अटक करण्यात आली. अपघाताच्या वेळी आपणच कार चालवत असल्याचे त्याने आपल्या कबुलीजबाबात म्हटले असल्याची माहिती आहे. त्यानंतर आज न्यायालयाने मिहीर शाह याला १६ जुलैपर्यंत पोलीस कोठडीचे आदेश दिले.

आरोपीचे वडील राजेश शाह शिंदे गटातून पदमुक्त

हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहीर शाह याला त्याला वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप विरोधी पक्षातील नेतेमंडळी करत होते. पण सुमारे ६० तासांनी त्याला अटक करण्यात आली. घडलेल्या प्रकारानंतर आरोपीचे वडील आणि शिंदे गटाचे पालघरचे उपनेते असलेले राजेश शाह यांच्यावर कारवाई करण्यात आली. त्यांना पदमुक्त करत त्यांनी पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 'कोण कितीही मोठा असला तरीही आरोपीला पाठीशी घातले जाणार नाही. अपघातानंतर पहिल्याच दिवशीपासून आरोपीवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले असून कारवाईत कुठलीही हयगय होणार नाही,' असेही मुख्यमंत्री म्हणाले.

दरम्यान, मुंबई आणि इतर शहरात हिट अँड रन प्रकरणे वाढत असल्याने शहरातील बार, पब आणि मद्यविक्रीच्या दुकानांवर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. रात्री उशिरापर्यंत बार चालू ठेवल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच अनधिकृतपणे चालणारे बार आणि पब जमीनदोस्त करण्याचे निर्देश आपण संबंधित मनपा आयुक्तांना दिले असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेMumbaiमुंबईAccidentअपघात