शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

LMOTY 2019: मंत्रिपदाची घाई झालेल्यांना कसं टाळता?; मुख्यमंत्र्यांनी सांगितली गुरुकिल्ली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2019 16:43 IST

लोकमत महाराष्ट्रीय ऑफ द इयर पुरस्कार सोहळ्यात मुख्यमंत्र्यांची मुलाखत

मुंबई: मुख्यमंत्री म्हणून कधीकधी अभिनय करावा लागतो. राग आलेला नसतानाही चेहऱ्यावर राग दाखवावा लागतो, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. लोकमत महाराष्ट्रीय ऑफ द इयर 2019 या सोहळ्यात अभिनेता रितेश देशमख यांनी देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी अनेक मुद्दयांवर भाष्य केलं. अनेकांना मंत्रीपद हवं असतं, मात्र प्रत्येकाला मंत्रीपद देता येत नाही. मग अशा परिस्थितीला कसं सामोरे जाता, असा प्रश्न रितेशनं मुख्यमंत्र्यांना विचारला. 'अनेकजण मंत्रीपदासाठी माझ्याकडे येतात. प्रत्येक अधिवेशनाच्या आधी खूप आमदार ही मागणी घेऊन येतात. यावर एक युक्ती केली आहे. पुढच्या अधिवेशनाआधी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे, असं मी येणाऱ्या प्रत्येकाला सांगतो. प्रत्येक अधिवेशनावेळी मी हेच उत्तर देऊन वेळ मारुन नेतो,' असं उत्तर यावर फडणवीस यांनी दिलं. मुख्यमंत्र्यांच्या उत्तरानंतर रितेश देशमुखनं प्रतिप्रश्न केला. प्रत्येक अधिवेशनात तुम्ही मंत्रिपदाची आस बाळगून येणाऱ्याला सारखंच उत्तर देता. त्यावर त्यांचं समाधान होतं का, असं रितेशनं विचारलं. त्यावर साडेचार वर्षे तरी हेच उत्तर देऊन काम चाललं आहे. कारण राजकारण आशेवर चालतं आणि आशा कोणीच सोडत नाही, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. विविध क्षेत्रातील दिग्गजांचा आज लोकमतकडून गौरव करण्यात आला. 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इअर' पुरस्काराचं हे सहावं वर्षं आहे. राजकारण, समाजसेवा, कला, क्रीडा, प्रशासन, उद्योग अशा विविध विभागांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिलेदारांना हा पुरस्कार प्रदान केला जातो.

 

टॅग्स :LMOTY 2019महाराष्ट्रीयन ऑफ द इअर 2019Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस