शहरं
Join us  
Trending Stories
1
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
2
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
3
"दगा फटका झाला तर बच्चू कडू फाशीवर जाईल" आंदोलनाचा विजय झाल्याचा दावा करत बच्चू कडूंनी सरकारला दिला इशारा
4
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांवर पोलिसांची पाळत, थेट बेडरुमध्ये घुसून हेरगिरी? आरोपामुळे खळबळ
5
भररस्त्यात पाठलाग, कारची काच फोडली... महिला पत्रकारावर मध्यरात्री हल्ला! अखेर दोघांना अटक
6
'मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा…’, आजारी संजय राऊत यांच्यासाठी सुषमा अंधारे यांची खास पोस्ट
7
सरदार पटेल यांना त्यांच्या 150व्या जयंतीनिमित्त शशी थरूर यांचं अभिवादन, महात्मा गांधींच्या नातवाच्या शब्दांत अर्पण केली श्रद्धांजली
8
Mumbai Hostage Case: ‘त्याने फटाके वाजवले आणि बाहेर गोळीबार सुरू असल्याचे सांगितले’; रोहित आर्या प्रकरणी प्रत्यक्षदर्शी वृद्ध महिलेचा खुलासा
9
ट्रम्प यांनी अण्वस्त्र टेस्टिंगचा आदेश देताच रशियाची थेट प्रतिक्रिया, दिला अल्टीमेटम!
10
मित्रांचा आग्रह जीवावर बेतला, पार्टीत बॅक टू बॅक पाजले पेग; २६ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू
11
पवईतील आरोपी रोहित आर्यला दीपक केसरकरांनी इतकी मोठी रक्कम का दिली?; सामाजिक कार्यकर्त्यांचा सवाल
12
मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत सापडली दोन सिल्वर गिबन; कस्टम अधिकारीही झाले अवाक्
13
वाघ अगदी जवळून पाहायचाय? मग, भारतातील 'या' ६ व्याघ्र प्रकल्पांना नक्की भेट द्या!
14
गोळीबार, आग आणि धमकीचं पत्र, फरार कैद्याने आणले पोलिसांच्या नाकी नऊ, नेमकं प्रकरण काय?
15
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटी बुडाले; सर्वात जास्त कुठे?
16
Extra Marital Affairs:मुलाचं लग्न ठरलं आणि होणाऱ्या सूनेच्या बापावरच जडला महिलेचा जीव; लग्नाआधीच दोघे गेले पळून
17
Rain Alert: कमी दाबाचे क्षेत्र कायम, या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; महाराष्ट्रात कुठे-कुठे पाऊस पडणार?
18
शेतकऱ्यांना न झुलवता तात्काळ कर्जमाफी करा; उद्धव ठाकरेंची राज्य सरकारकडे मागणी
19
धोनीची गुंतवणूक असलेली कंपनी बाजारात! ६ नोव्हेंबरला उघडणार IPO; प्राइस बँडसह तपशील जाणून घ्या
20
खात्यात ८ लाख जमा केले अन् प्राप्तिकर विभागाची 'टॅक्स' नोटीस; ६ वर्षांच्या लढ्यानंतर करदात्याचा विजय!

“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2025 20:08 IST

CM Devendra Fadnavis PC News: २०१४ ते २०२५ मध्ये जेवढे निर्णय ओबीसी समाजासाठी झाले, ते आमच्या सरकारने केले, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

CM Devendra Fadnavis PC News: दोन्ही बाजूंनी राजकारण चाललेले आहे. आम्ही काढलेला जीआर ओबीसींच्या कोणत्याही हक्कांवर गदा आणणारा नाही. एकही नकली व्यक्ती ओबीसीमध्ये समाविष्ट होणार नाही. ओबीसी नाही, असा कोणताही व्यक्ती समाविष्ट होणार नाही, अशा प्रकारची काळजी त्या जीआरमध्ये घेतलेली आहे, याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. 

राज्य सरकारने काढलेल्या जीआरबाबत ओबीसी नेत्यांनी तीव्र आक्षेप घेत टीका केली. पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या टीकेचे स्पष्ट शब्दांत उत्तर दिले. ते म्हणाले की, वडेट्टीवारांना बोलण्याचा कोणताही अधिकार नाही. याचे कारण ओबीसी समाजासाठी जे काही केले आहे, ते आमच्या सरकारने केले आहे. २०१४ ते २०२५ मध्ये जेवढे निर्णय ओबीसी समाजासाठी झाले, ते आमच्या सरकारने केले. 

२७ टक्के पूर्ण ओबीसींचे आरक्षण आणणारे आमचे सरकार

ओबीसींसाठी वेगळे मंत्रालय आणणारे आम्ही. ओबीसींसाठी योजना आणणारे आम्ही. महाज्योति तयार करणारे आम्ही. ओबीसींसाठी ४२ हॉस्टेल तयार करणारे आम्ही. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या सरकारने ओबीसींचे घालवलेले राजकीय आरक्षण, हे परत आणणारे आम्ही. २७ टक्के पूर्ण ओबीसींचे आरक्षण आणणारे आमचे सरकार आहे. त्यामुळे ओबीसींना हे समजत आहे की, त्यांचे हित पाहणारे कोण आहेत, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले. 

सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते

यापूर्वीच्या कोणत्या सरकारने ओबीसींचे हित केले, असा सवाल करत, मी दाव्याने सांगतो की, माझ्याशी खुली चर्चा करावी. ओबीसींसाठी आमच्या सरकारने केलेले काम आणि इतर सरकारने केलेले काम, यावर चर्चा करायला तयार आहे. यांना केवळ राजकारण करता येते. आम्हाला ओबीसी समाजाचे हित पाहायचे आहे. आम्ही ते हित करणारच आहोत. मराठा समाजाचे हित करणार आहोत. सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, आरक्षणासाठी राज्यात होत असलेल्या तरुणांच्या आत्महत्या तसेच दोन्ही समाजातील वाढत चाललेली तेढ, यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, मला असे वाटते की, जोपर्यंत दोन्ही समाजाचे नेते खरी वास्तविकता काय आहे, हे समाजापर्यंत पोहोचवणार नाही, तोपर्यंत तेढ कमी होणार नाही. हे स्पष्ट करू इच्छितो की, ज्यांच्याकडे कुणबी नोंदी आहेत, त्यांना सर्टिफिकेट मिळणार आहे. विनानोंदी सर्टिफिकेट मिळणार नाही. त्यामुळे ओबीसी समाजाने चिंता करायची आवश्यकता नाही. जणू काही आरक्षण गेले आहे, अशा प्रकारचे वातावरण तयार केल्यामुळे मुलांच्या मनावर परिणाम होतो. दुसऱ्या बाजूनेही टोकाचे राजकारण चाललेले आहे. अशा राजकारणाने कोणत्याच समाजाचे भले होऊ शकणार नाही. समाजाचे भले हे समाजापर्यंत वास्तविकता पोहोचवली तरच होऊ शकते. आम्ही ती वास्तविकता समाजापर्यंत पोहोचवत आहोत, असे त्यांनी म्हटले आहे. 

 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaratha Reservationमराठा आरक्षणOBC Reservationओबीसी आरक्षण