शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup 2026 Schedule Announced : टी-२० वर्ल्ड कपचं वेळापत्रक जाहीर! भारत-पाक एकाच गटात
2
सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीवर CM फडणवीसांचे भाष्य; म्हणाले, “निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया...”
3
Video: धक्कादायक! माजी आमदार निर्मला गावित यांना अज्ञात कारने उडवले, रुग्णालयात दाखल
4
कुटुंबियांचा लग्नास विरोध; पाकिस्तानी हिंदू प्रेमी युगुल सीमा ओलांडून भारतात, BSF ने घेतले ताब्यात
5
“जोपर्यंत CM आहे, तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही”; फडणवीसांनी दिला शब्द
6
बिहार फत्ते; आता 'या' दोन राज्यात NDA चे सरकार स्थापन होणार, अमित शाहांचा मोठा दावा...
7
आम्ही जाण्यापूर्वीच पोस्टमार्टेम, पंचनामा नाही, तिच्या डोक्यावर वळ...; गौरी गर्जे-पालवेच्या आईचे गंभीर आरोप 
8
TET Paper Leak: मराठवाड्यातून गोंदियातील शिक्षकांना कॉल, कुणाकडे दीड लाख, कुणाला मागितले तीन लाख रुपये
9
'सहकुटुंब सहपरिवार' फेम अभिनेत्री अडकली लग्नबेडीत, पुण्यात थाटामाटात पार पडला विवाहसोहळा
10
चीनने पुन्हा गरळ ओकली; अरुणाचल प्रदेश चीनचा भाग असल्याचा पुनरुच्चार...
11
Travel : परदेशात कशाला... भारतातच आहे 'मिनी थायलंड'; कपल्ससाठी 'स्वर्गीय' ठिकाण!
12
तुम्हीही बेडवर लॅपटॉप चालवताय? एक मोठी चूक आणि बसू शकतो हजारोंचा फटका! ताबडतोब वाचा...
13
'...तर देशभरात भाजपचा पाया हादरवून टाकेन', SIR प्रक्रियेवरुन ममता बॅनर्जींचा केंद्रावर हल्लाबोल
14
भेटायला म्हणून गेला अन् भलताच अडकला! गावकऱ्यांनी २ मुलांच्या आईसोबत लावून दिलं तरुणाचं लग्न अन्... 
15
राम मंदिरावर धर्मध्वज डौलानं फडकला, ध्वजावरील ‘ते’ झाड नेमकं कोणतं? इंटरेस्टिंग माहिती...
16
थोडी सभ्यता बाळगा! विमानतळावर पायजमा-स्लिपर घालून येऊ नका! अमेरिकेत निघाला ट्रम्प सरकारचा फतवा
17
"जे होतं ते आम्ही फडणवीस यांच्यासमोर मनमोकळ्या...", महायुतीतील नाराजी नाट्यावर एकनाथ शिंदेंचा खुलासा
18
“श्रीराम काल्पनिक होते असं म्हणणारी गुलामी संपवू”; PM मोदींनी सांगितला २०३५ पर्यंतचा संकल्प
19
हे भगवान...! २६ हजार कोटींची मालकीण करणार एका चहावाल्याशी लग्न; उद्योगजगतात खळबळ...
20
श्रीराम मंदिर बांधणे सोपे होते, पण मॅकॉले प्रेरित गुलामीची मानसिकता..; PM मोदींनी पुन्हा 'तो' मुद्दा काढला
Daily Top 2Weekly Top 5

सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीवर CM फडणवीसांचे भाष्य; म्हणाले, “निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया...”

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 21:04 IST

CM Devendra Fadnavis: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.

CM Devendra Fadnavis: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीने अत्यंत कळीचा ठरलेल्या ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडली. या निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षणाची ५० टक्क्यांची घटनात्मक मर्यादा ओलांडल्याने हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले. या आरक्षणाच्या वैधतेमुळे राज्यातील हजारो ग्रामपंचायत, नगरपरिषद आणि महानगरपालिका निवडणुकांचे भवितव्य सध्या धोक्यात आले आहे. आता या प्रकरणी शुक्रवारी सुनावणी होणार आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.

सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. विकास गवळी यांनी दाखल केलेल्या याचिकेत, काही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षणाची ५० टक्के मर्यादेपेक्षा जास्त ठेवण्यात आल्याचा दावा करण्यात आला. न्यायालयाने गेल्या सुनावणीत बांठिया आयोगाच्या अहवालाच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते, ज्याचा वापर राज्य सरकारने वाढीव ओबीसी आरक्षण निश्चित करण्यासाठी केला. आजच्या सुनावणीतही न्यायालयाने यावर लक्ष केंद्रित केले. सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारली.

निवडणुका निर्विघ्नपणे पार पडतील

सर्वोच्च न्यायालय समजून घेईल की, निवडणुका सुरू झालेल्या आहेत, सगळी प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. येत्या २ तारखेला मतदान होणार आहे. त्यामुळे संपूर्ण प्रक्रिया निर्विघ्नपणे पार पडण्याकरिता जी काही विनंती आहे, ती सर्वोच्च न्यायालय मान्य करेल. आजही सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाबाबत सकारात्मक टिपण्णी केली आहे. जो काही जुना निर्णय आहे, त्याचे मोठ्या खंडपीठाने पुनरावलोकन केले पाहिजे, अशा प्रकारची टिपण्णीही केली आहे. मला अशी अपेक्षा आहे की, निवडणुका निर्विघ्नपणे पार पडतील. अर्थातच हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाला घ्यायचा आहे. त्यामुळे या संदर्भात जास्त बोलू शकणार नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

दरम्यान, राज्य सरकारने प्रत्येकवेळी हीच भूमिका घेतलेली आहे की, संपूर्ण ओबीसी आरक्षणासहितच निवडणुका झाल्या पाहिजेत. उद्धव ठाकरे यांचे सरकार असताना त्यांनी निर्णय घेतला होता आणि त्यामुळे जवळपास सगळ्या ठिकाणचे ओबीसी आरक्षण संपले होते. आम्ही न्यायालयात गेलो, न्यायालयाने आरक्षण दिले. त्यानंतर आम्ही सांगितले की ते पूर्ण मिळायला हवे. त्यावर न्यायालयाने टिपण्णी केली होती, त्यावरच या निवडणुका सुरू झाल्या. परंतु, काही लोक पुन्हा कटेंम्प्टमध्ये गेले. त्यांनी सांगितले की, कृष्णमूर्ती यांचा यापूर्वीचा एक निर्णय आहे, त्यामुळे पुन्हा या प्रकरणी सुनावणी सुरू झाली, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : CM Fadnavis comments on Supreme Court hearing about OBC reservation.

Web Summary : CM Fadnavis anticipates smooth elections after Supreme Court's OBC reservation hearing. He hopes court considers ongoing election process. Previous government decisions impacted OBC reservations, leading to current legal proceedings. Fadnavis emphasizes government's commitment to OBC reservation in elections.
टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSupreme Courtसर्वोच्च न्यायालयLocal Body Electionस्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकPoliticsराजकारण