शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

राजीनामा-शासन भिकारी, माणिकराव कोकाटेंच्या विधानावर CM फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 15:57 IST

CM Devendra Fadnavis: माणिकराव कोकाटे यांनी शासनासंदर्भात केलेल्या विधानावरून पुन्हा एकदा विरोधकांकडून टीका केली जात आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत भाष्य केले.

CM Devendra Fadnavis: शासन शेतकऱ्यांकडून एक रुपया घेते. आम्ही शेतकऱ्याला एक रुपया देत नाही. त्यामुळे शासनच भिकारी आहे. शेतकरी भिकारी नाही. एक रुपया ही किंमत फार थोडी आहे. एक रुपयाच्या विम्यामुळे महाराष्ट्रामध्ये पाच-साडेपाच लाख बोगस अर्ज माझ्याच काळात सापडले. मी ते बोगस अर्ज तत्काळ रद्द केले, असे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले होते. शासन भिकारी आहे, या कोकाटे यांच्या विधानावरून वाद निर्माण होण्याची शक्यता असून, विरोधकांकडून टीका केली जात आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली.

ते काय बोलले, ते मी ऐकलेले नाही. तथापि, जर त्यांनी असे वक्तव्य केले असेल, तर मंत्र्यांनी असे वक्तव्य करणे चुकीचे आहे. पीकविम्याच्या संदर्भात आपण जाणीवपूर्वक निर्णय घेतला आणि त्याची पद्धती बदलली. पीकविम्यात आपल्या लक्षात आले की, पीकविम्यात काही वर्षांमध्ये शेतकऱ्यांना फायदा झाला, तरी बहुतांश वर्षांमध्ये त्याचा अधिक फायदा कंपन्या घेत आहेत. म्हणून त्याची पद्धती बदलली. पण पद्धती बदलत असताना, आपण दुसरा निर्णय हादेखील घेतला की, शेतकऱ्याला मदत तर करूच; पण, त्यासोबतच ५ हजार कोटी रुपये दरवर्षी शेतीमध्ये आपण गुंतवू करू. त्याची सुरुवातही केली आहे. २५ हजार कोटी रुपये ५ वर्षांत शेतीमधील गुंतवणूक आपण वाढवत आहोत. त्यामुळे मला असे वाटते की, अशा प्रकारचे वक्तव्य योग्य नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. ते पत्रकारांशी बोलत होते.  

अतिशय उत्तम अर्थव्यवस्था ही महाराष्ट्राची आहे

मी आजही सांगतो की, देशाच्या कुठल्याही राज्याच्या ज्याच्या अर्थव्यवस्था मोठ्या आहेत, त्या अर्थव्यवस्थांमध्ये आजही सगळ्यात चांगली, मी असे म्हणत नाही की, आपण श्रीमंत आहोत, आपल्याकडे खूप पैसा आहे; परंतु, तुलनेने विकसनशील अर्थव्यवस्थेत अतिशय उत्तम अर्थव्यवस्था ही महाराष्ट्राची आहे. आपल्यासमोर आव्हानेही आहेत. पण तरीही आपण आपल्या अर्थव्यवस्थेतील वित्तीय तूट ३ टक्क्यांपेक्षा कमी ठेवण्यात आजही यशस्वी झालेलो आहोत. अनेक राज्ये कर्जांमध्ये २५ टक्क्यांच्या वर गेली आहेत, वित्तीय तूट ४ ते ५ टक्क्यांपर्यंत गेली आहे. महाराष्ट्राची ही अवस्था नाही. त्यामुळे उपलब्ध साधनांचा उत्तम उपयोग करून महाराष्ट्रातील जनांचे कल्याण करण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले.

दरम्यान, प्रश्न असा आहे की, राजीनामा देण्यासारखे घडले काय? एक व्हिडिओ, जो विरोधकांनी काढला, त्यांना तर मी कोर्टात खेचून अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार, त्यांनी माझी बदनामी केली आहे. खरे म्हणजे हा इतका छोटा विषय आहे. हा विषय एवढा का लांबला हे मलाही समजले नाही. यासंदर्भात मी आधीच खुलासा केला आहे. मला रमी खेळताच येत नाही. अशा प्रकारचा आरोप चुकीचा आणि बिनबुडाचा आहे. मी ऑनलाइन रमी खेळत असेन, मी जर दोषी सापडलो, तर नागपूरच्या अधिवेशनात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या दोघांपैकी कुणीही निवेदन करावे. त्या क्षणाला न थांबता, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना न भेटता राज्यपालांकडे जाऊन राजीनामा देईन, असे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी स्पष्ट केले.

 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसManikrao Kokateमाणिकराव कोकाटेAgriculture Sectorशेती क्षेत्र