शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2025 15:05 IST

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

CM Devendra Fadnavis on Raj Thackery: महाराष्ट्र विधानसभेने नुकताच जनसुरक्षा कायदा मंजूर केला आहे. काही दुरुस्त्या आणि बदल होऊन विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात हा कायदा मंजूर करण्यात आला. विरोधकांनी या कायद्याला विरोध सुरुच ठेवला आहे. दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही या कायद्यावरुन बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आव्हान दिलं. आम्हाला फक्त अटक करून दाखवा असं राज ठाकरे यांनी म्हटलं. त्यावर प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्बन नक्षलसारखे वागाल, तर तुम्हालाही अटक होईल, असं म्हटलं.

शेतकरी कामगार पक्षाच्या ७८ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी रायगडमध्ये हजेरी लावली होती. यावेळी भाषणामध्ये राज ठाकरेंनी जनसुरक्षा कायद्यावरुन सरकारवर निशाणा साधला. आम्हाला अर्बन नक्षल म्हणणाऱ्यांनी आधी स्वतःची पात्रता तपासावी. आम्हाला फक्त अटक करून दाखवा, असं आव्हान राज ठाकरेंनी सरकारला दिलं. त्यावर नागपुरात माध्यमांशी बोलताना अशा प्रकारची वक्तवे ही कायदा न वाचता केलेली आहेत अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली.

"हा कायदा त्यांच्याकरता बनलेला नाही. तुम्ही अर्बन नक्षलसारखे वागाल तर तुमची अटक होईल. तुम्ही अर्बन नक्षलसारखे वागत नाहीत त्यामुळे तुमची अटक करायचं कारण नाही. जे लोक कायद्याच्या विरोधात वागतात त्यांच्यासाठी हा कायदा आहे. आंदोलकांच्या विरोधात हा कायदा नाही. सरकारच्या विरोधात बोलायची पूर्ण मुभा आहे. त्यासाठी हा कायदा नाही. अशा प्रकारची वक्तव्यं ही कायदा न वाचता केलेली आहेत," असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हिंदीसाठी आग्रही असल्याचेही राज ठाकरे म्हणाले. त्यावरही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं. माझं अतिशय पक्कं मत आहे की महाराष्ट्रामध्ये मराठी शिकली पाहिजे, ती अनिवार्य असली पाहिजे. पण महाराष्ट्रातल्या मराठी मुलांना मराठीत सोबत अजून एक भारतीय भाषा शिकायला मिळाली तर त्यात काय वावगं आहे. आपण भारतीय भाषांना विरोध करायचा आणि इंग्रजी करता पायघड्या घालायच्या या मानसिकतेला माझा विरोध आहे, असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

काय म्हणाले राज ठाकरे?

"बाहेरून येऊन जमिनी विकत घेणार आणि वाटेल तसं थैमान घालणार हे चालणार नाही. आता सरकारने कायदा आणला आहे जो आंदोलन करेल तो अर्बन नक्षल. एखाद्या प्रकल्पाला तुम्ही विरोध केला तर सरकार तुम्हाला अटक करू शकते. अटक करूनच पाहा, मराठी माणसाच्या थडग्यावर उद्योग उभे राहू देणार नाही. उद्योग आणायचे असतील तर मराठी माणसांना त्यात सामावून घ्यावे लागेल," असं राज ठाकरे म्हणाले. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसRaj Thackerayराज ठाकरेnagpurनागपूर