शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
3
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
4
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
5
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
6
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
7
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
8
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
9
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
10
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
11
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
12
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
13
हा सदोष मनुष्यवधच!
14
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
15
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
16
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
17
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
18
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
19
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?

ठाणेकर की बारामतीकर? कुणासोबत काम करणं, सांभाळून घेणं अवघड वाटतं?; देवेंद्र फडणवीस म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 15:04 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाणेकर की बारामतीकरांसोबत काम करायला अवघड वाटतं याचे उत्तर दिलं.

CM Devendra Fadnavis: राज्यातल्या राजकारणात महाविकास आघाडीच्या स्थापनेनंतर झालेले दोन मोठे भूकंप म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली फूट. या फुटीनंतर राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झालं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्कालीन मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या साथीने राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार आणलं. मात्र सत्तेचा वाटा, मंत्र्यांची सुरक्षा अशा काही कारणांमुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याची जोरदार चर्चा सुरु होती. मात्र मुख्यमंत्री फडणवीस यांनी या नाराजीनाट्यावर अनेकदा पडदा टाकला होता. आता एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांना ठाणेकरांसोबत काम करण अवघड वाटतं की बारामतीकरांसोबत याचं उत्तर दिलं आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'मुंबएआय टेक वीक २०२५ या कार्यक्रमात 'गव्हर्निंग द फ्युचर: एआय अँण्ड पॉलिसी' या विषयावर बोलत होते. यावेळी लोकमत मीडियाचे सहव्यवस्थापकीय संचालक आणि संपादकीय संचालक ऋषी दर्डा यांनी त्यांची मुलाखात घेतली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ठाणेकरांना सांभाळून घेणं अवघड वाटतं की बारातमीकरांना असा प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी हा प्रश्न त्यांनाच विचारा असं म्हटलं.

"हा प्रश्न तुम्ही त्यांनाच विचारायला हवा. मला तर सगळेच चालतात. त्यांना माझ्यासोबत काम करण्याबाबत काय वाटतं हे तेच सांगू शकतात. मी ठाणेकरांसोबतही काम करु शकतो आणि बारामतीच्या लोकांसोबतही काम करु शकतो," असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

महापालिकेच्या निवडणुका कधी होणार?

यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेच्या निवडणुकांबाबतही भाष्य केलं. "एआय सुद्धा महापालिकेच्या निवडणुका कधी होणार हे सांगू शकत नाही. आपल्या संविधानात सुप्रीम कोर्ट हे एआयपेक्षाही वरच्या स्थानी आहे. जेव्हा सुप्रीम कोर्ट ठरवेल तेव्हा महापालिका निवडणुका होतील. पण त्या लवकर व्हाव्यात असं आम्हाला वाटतं. स्थानिक पातळीवरील आमच्या कार्यकर्त्यांना आम्ही यापासून वंचित ठेवू शकत नाही. येत्या काही दिवसात सुप्रीम कोर्ट याबाबत निर्णय घेईल," असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदेAjit Pawarअजित पवार