शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
2
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
3
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
4
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
5
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
6
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
7
भारतानंतर आता दक्षिण आफ्रिकेनेही सुरू केली बांग्लादेशी घुसखोरांविरुद्ध हद्दपारीची मोहीम
8
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
9
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
10
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
11
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
Daily Top 2Weekly Top 5

विरोधक पसरवताहेत भाजपा संविधान बदलवणार असल्याच्या अफवा, मुख्यमंत्र्यांची टीका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2019 13:59 IST

विरोधकांची दुकानदारी बंद झाली आहे, म्हणून ते खोटं बोलून संभ्रम निर्माण करत आहेत. भाजप संविधानाला बदलणार असल्याचा भ्रम काँग्रेस व विरोधकांकडून पसरविण्यात येत आहे.

नागपूर  - विरोधकांची दुकानदारी बंद झाली आहे, म्हणून ते खोटं बोलून संभ्रम निर्माण करत आहेत. भाजप संविधानाला बदलणार असल्याचा भ्रम काँग्रेस व विरोधकांकडून पसरविण्यात येत आहे. मात्र संविधानाचा मूळ आराखडा कुणीच बदलू शकत नाही, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज काँग्रेससह अन्य विरोधकांवर जोरदार टीका केली.भाजपच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या राष्ट्रीय अधिवेशनात उपस्थितांना संबोधित करताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस यांनी विरोधकांवर निशाणा साधला.''भाजप संविधानाला बदलणार असल्याचा भ्रम काँग्रेस व विरोधकांकडून पसरविण्यात येत आहे. मात्र संविधानाचा मूळ आराखडा कुणीच बदलू शकत नाही. बाबासाहेबानी दिलेल्या संविधानाची रक्षा ही आमची सर्वात मोठी प्राथमिकता . काँग्रेसने केवळ बाबासाहेबांच्या नावाचा उपयोग केला. त्यांच्या कथनी व करणीमध्ये अंतर होते. आम्ही बोलतो कमी, काम जास्त करतो. भाजपच्या 10 वर्षांच्या शासनकाळात अनुसूचित जातींसाठी काँग्रेसपेक्षा जास्त काम झाले. काँग्रेसने केवळ काही नेत्यांनाच मोठे केले. बाबासाहेबांचे नाव घेण्याचा काँग्रेसला अधिकार नाही. विरोधकांची दुकानदारी बंद झाली आहे, म्हणून ते खोटं बोलून संभ्रम निर्माण करत आहेत.'' असे मुख्यमंत्री म्हणाले.

 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाPoliticsराजकारण