शहरं
Join us  
Trending Stories
1
सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या: रिपोर्ट
2
ठाणे, कल्याणमध्ये राज ठाकरेंच्या सभा होणार; श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्केंनी घेतली भेट
3
Qualification scenario for MI & RCB : मुंबई इंडियन्सचं प्ले ऑफमध्ये जाण्याचं गणित सापडलं; RCB लाही त्यानं बळ मिळालं
4
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार
5
टेन्शन वाढलं! ताप, डोकेदुखीसह भूक लागत नाही?; 'हा' धोकादायक व्हायरस करू शकतो अटॅक
6
आम्ही फटाके आणले होते... रिंकू खूप दुःखी झालाय! भारतीय खेळाडूच्या वडिलांचा भावनिक Video 
7
T20 World Cup भारत जिंकणार नाही; दिग्गजाने जाहीर केले ४ सेमी फायनलिस्ट
8
‘’उबाठा गटाची अवस्था ‘नाच गं घुमा, कशी मी नाचू’ अशी झालीय, मनसेची बोचरी टीका 
9
T20 World Cup साठीच्या भारतीय संघ निवडीची Inside Story! हार्दिक पांड्याच्या नावावर... 
10
Breaking: सलमान खानवर गोळीबार प्रकरण; आरोपींपैकी एकाची पोलिस कोठडीत आत्महत्या
11
Maneka Gandhi : "फक्त 2 दिवस बाकी..."; अमेठीतून राहुल, रायबरेलीतून प्रियंका, काय म्हणाल्या मनेका गांधी?
12
छत्रपती संभाजीराजेंच्या उमेदवारीवर उदय सामंताचा दावा; 'त्या' ड्राफ्टबाबत खळबळजनक खुलासा
13
Multibagger stock: ₹६ च्या शेअरनं दिलं छप्परफाड रिटर्न; ₹१ लाखांचे बनले ₹१ कोटी, गुंतवणूकदारांची चांदी
14
भाजपने मुंबईतील तीन उमेदवार का बदलले? फडणवीस म्हणाले, 'ज्यांना बदललं त्यांनी...'
15
सिंधुदुर्गात ठाकरे गटाचं बळ वाढणार, राणेंना आव्हान देणारा जुना शिवसैनिक घरवापसी करणार 
16
Binanceच्या फाऊंडरची तुरुंगात रवानगी, सर्वात श्रीमंत Crypto नं काय केली गडबड? दहशतवादाशी निगडीत प्रकरण
17
Fact Check: नेपाळ संसदेत पंतप्रधान मोदींवर झाली नाही टीका; जाणून घ्या व्हायरल Videoचे 'सत्य'
18
नाशिक लोकसभेत तीन शिवसैनिक भिडणार; गोडसे, वाजे अन् करंजकरांमध्ये कोण मारणार बाजी?
19
Sanjay Singh : "कोविशील्डचे गंभीर परिणाम, मृत्यू..."; आप नेते संजय सिंह यांची मोठी मागणी
20
"किरीट सोमय्यांना यामिनी जाधव, रवींद्र वायकरांसाठी 'स्टार प्रचारक' करा"; अनिल परबांचा टोला

मालवणात ढगफुटी, ओढे-नद्यांना पूर, वाहतूक ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 6:25 AM

कोकण किनारपट्टीवर सक्रिय झालेला मान्सून गुरुवारी सलग तिसऱ्या दिवशीही धो-धो बरसला. मालवणमध्ये तर ढगफुटी झाली.

सिंधुदुर्ग : कोकण किनारपट्टीवर सक्रिय झालेला मान्सून गुरुवारी सलग तिसऱ्या दिवशीही धो-धो बरसला. मालवणमध्ये तर ढगफुटी झाली. तिथे ३५० मि.मी. पावसाची नोंद झाली. अनेक घरांमध्ये पाणी घुसून, लोकांचे संसार पाण्याखाली गेले. अनेक झाडेही उन्मळून पडली.ओढे-नद्यांना पूर आल्याने वाहतूक व्यवस्था ठप्प झाली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. देवली येथे डोंगर खचल्याने रहिवाशांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. मराठवाड्यात वीज पडून ८ ठार झाले आहेत. याशिवाय नगर आणि सोलापुरात प्रत्येकी एक जण दगावला आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज पहाटे अचानक मुसळधार पावसाला सुरुवात झाली. या पावसाचे पाण्याचे लोट अनेकांच्या घरात घुसले. वेंगुर्ले तालुक्यातील खवणे येथील गाबीतवाडा येथे ९ घरांमध्ये पाणी शिरून घरातील भांडी वाहून गेली. कोचरा-निवती येथे घराला पुराच्या पाण्याने वेढल्याने ९ जण अडकले होते. प्रशासनाने स्थानिक मच्छीमारांच्या साह्याने त्यांना सुखरूप बाहेर काढले.मालवण तालुक्यातील खालची देवली येथील कुलस्वामिनी मंदिरानजीक डोंगर खचला. यात डोंगराची माती देवली मार्गावरील रस्त्यावर आल्याने या मार्गावरील वाहतूक बंद होती. एका भंगार व्यावसायिकांच्या घरावर आंब्याचे झाड कोसळून घर जमीनदोस्त झाले. यात चार जण जखमी झाले. रायगड व रत्नागिरीमध्ये मात्र तुलनेने कमी पाऊस झाला. देवगड तालुक्यातील हुर्शी गडदेवाडीकडे जाणारा रस्ता पाण्याखाली गेल्याने पडेल हायस्कूलमधून येणाऱ्या विद्यार्थ्यांना पाण्यातूनच जीवघेणा प्रवास करीत घर गाठावे लागले.>पेण तालुक्यात भोगावती नदीचे पाणी अचानक वाढल्याने गणेश वास्कर, अनिकेत वास्कर व यशवंत अवास्कर हे तिघे वाहून गेले.>कोकण, गोव्यातील गुहागर, पणजी, रत्नागिरी १५०, मार्मागोवा, मोरगाव ११०, कणकवली, मडगाव ९०, खेड ८०, फोंडा ७०, संगमेश्वर, देवरुख, वाल्पोई ६०, चिपळूण ५० मि.मी. पाऊस.मध्य महाराष्ट्रात राधानगरी ५०, अमळनेर, जावळी माथा, खटाव, वडूज, नंदूरबार, ओझर, तळोदा ३०, बारामती, कोल्हापूर २० मि.मी. पाऊस.मराठवाड्यात सेलू ५०, अहमदपूर, आष्टी ४०, मानवत, परळी वैजनाथ ३०, अंबड, भूम, जिंतूर, नायगांव, खैरगांव, पालम २० मि.मी पाऊस पडला़विदर्भात मूर्तिजापूर ९०, अमरावती ७०, बार्शी टाकळी ६०, अकोला ५०, अंजनगाव, चिखलदरा, दिनापूर, कारंजा लाड, मंगरुळपीर, परतवाडा, पुसद, रामटेक ३० मि.मी. पाऊस झाला.>मराठवाड्यात वीज पडून ८ ठारउस्मानाबाद, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात पाऊस जोरदार पाऊस झाला. चार ठिकाणी वीज पडून ८ जणांचा मृत्यू झाला. एकट्या नांदेड जिल्ह्यात चौघे दगावले आहेत. लातूर जिल्ह्यातील दोघांचा समावेश आहे.अहमदनगर जिल्ह्यातील धालवडी (ता. कर्जत) येथील शेतकºयाच्या जागीच मृत्यू झाला. सोलापूर जिल्ह्यात हुलगेवाडी (ता. करमाळा) येथे एक जण ठार झाला. बुलडाणा जिल्ह्यातील माटरगाव बुद्रूक (ता. खामगाव) येथे वीज पडून झालाखाली उभे राहिलेल्या बाप-लेकीचा मृत्यू झाला.>पुरात युवती वाहून गेलीखान्देशातही जोरदार पाऊस झाला. बोदवड तालुक्यात नाल्याला आलेल्या पुरात चार बैलगाड्या उलटल्या. त्यात एक १६ वर्षीय युवती वाहून गेली.>मान्सून सक्रिय होणार : हिंदी महासागरव परिसरात मान्सूनसाठी अनुकूल परिस्थिती असून, २४ जूनपासून मान्सून पुन्हा सक्रिय होत असल्याचा आशादायक अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे़ दक्षिण महाराष्ट्र ते केरळ दरम्यान द्रोणीय स्थिती निर्माण झाल्याने सध्या पश्चिम किनारपट्टीवर जोरदार पाऊस पडत आहे. कोकणात मालवण ३५०, वेंगुर्ला ३२०, राजापूर २६०, मापुसा २२०, देवगड १९० व कुडाळ, पेडणे, सावंतवाडी येथे १७० मिमी पावसाची नोंदी झाली आहे. 

टॅग्स :Rainपाऊस