शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

मालवणात ढगफुटी, ओढे-नद्यांना पूर, वाहतूक ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 06:25 IST

कोकण किनारपट्टीवर सक्रिय झालेला मान्सून गुरुवारी सलग तिसऱ्या दिवशीही धो-धो बरसला. मालवणमध्ये तर ढगफुटी झाली.

सिंधुदुर्ग : कोकण किनारपट्टीवर सक्रिय झालेला मान्सून गुरुवारी सलग तिसऱ्या दिवशीही धो-धो बरसला. मालवणमध्ये तर ढगफुटी झाली. तिथे ३५० मि.मी. पावसाची नोंद झाली. अनेक घरांमध्ये पाणी घुसून, लोकांचे संसार पाण्याखाली गेले. अनेक झाडेही उन्मळून पडली.ओढे-नद्यांना पूर आल्याने वाहतूक व्यवस्था ठप्प झाली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. देवली येथे डोंगर खचल्याने रहिवाशांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. मराठवाड्यात वीज पडून ८ ठार झाले आहेत. याशिवाय नगर आणि सोलापुरात प्रत्येकी एक जण दगावला आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज पहाटे अचानक मुसळधार पावसाला सुरुवात झाली. या पावसाचे पाण्याचे लोट अनेकांच्या घरात घुसले. वेंगुर्ले तालुक्यातील खवणे येथील गाबीतवाडा येथे ९ घरांमध्ये पाणी शिरून घरातील भांडी वाहून गेली. कोचरा-निवती येथे घराला पुराच्या पाण्याने वेढल्याने ९ जण अडकले होते. प्रशासनाने स्थानिक मच्छीमारांच्या साह्याने त्यांना सुखरूप बाहेर काढले.मालवण तालुक्यातील खालची देवली येथील कुलस्वामिनी मंदिरानजीक डोंगर खचला. यात डोंगराची माती देवली मार्गावरील रस्त्यावर आल्याने या मार्गावरील वाहतूक बंद होती. एका भंगार व्यावसायिकांच्या घरावर आंब्याचे झाड कोसळून घर जमीनदोस्त झाले. यात चार जण जखमी झाले. रायगड व रत्नागिरीमध्ये मात्र तुलनेने कमी पाऊस झाला. देवगड तालुक्यातील हुर्शी गडदेवाडीकडे जाणारा रस्ता पाण्याखाली गेल्याने पडेल हायस्कूलमधून येणाऱ्या विद्यार्थ्यांना पाण्यातूनच जीवघेणा प्रवास करीत घर गाठावे लागले.>पेण तालुक्यात भोगावती नदीचे पाणी अचानक वाढल्याने गणेश वास्कर, अनिकेत वास्कर व यशवंत अवास्कर हे तिघे वाहून गेले.>कोकण, गोव्यातील गुहागर, पणजी, रत्नागिरी १५०, मार्मागोवा, मोरगाव ११०, कणकवली, मडगाव ९०, खेड ८०, फोंडा ७०, संगमेश्वर, देवरुख, वाल्पोई ६०, चिपळूण ५० मि.मी. पाऊस.मध्य महाराष्ट्रात राधानगरी ५०, अमळनेर, जावळी माथा, खटाव, वडूज, नंदूरबार, ओझर, तळोदा ३०, बारामती, कोल्हापूर २० मि.मी. पाऊस.मराठवाड्यात सेलू ५०, अहमदपूर, आष्टी ४०, मानवत, परळी वैजनाथ ३०, अंबड, भूम, जिंतूर, नायगांव, खैरगांव, पालम २० मि.मी पाऊस पडला़विदर्भात मूर्तिजापूर ९०, अमरावती ७०, बार्शी टाकळी ६०, अकोला ५०, अंजनगाव, चिखलदरा, दिनापूर, कारंजा लाड, मंगरुळपीर, परतवाडा, पुसद, रामटेक ३० मि.मी. पाऊस झाला.>मराठवाड्यात वीज पडून ८ ठारउस्मानाबाद, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात पाऊस जोरदार पाऊस झाला. चार ठिकाणी वीज पडून ८ जणांचा मृत्यू झाला. एकट्या नांदेड जिल्ह्यात चौघे दगावले आहेत. लातूर जिल्ह्यातील दोघांचा समावेश आहे.अहमदनगर जिल्ह्यातील धालवडी (ता. कर्जत) येथील शेतकºयाच्या जागीच मृत्यू झाला. सोलापूर जिल्ह्यात हुलगेवाडी (ता. करमाळा) येथे एक जण ठार झाला. बुलडाणा जिल्ह्यातील माटरगाव बुद्रूक (ता. खामगाव) येथे वीज पडून झालाखाली उभे राहिलेल्या बाप-लेकीचा मृत्यू झाला.>पुरात युवती वाहून गेलीखान्देशातही जोरदार पाऊस झाला. बोदवड तालुक्यात नाल्याला आलेल्या पुरात चार बैलगाड्या उलटल्या. त्यात एक १६ वर्षीय युवती वाहून गेली.>मान्सून सक्रिय होणार : हिंदी महासागरव परिसरात मान्सूनसाठी अनुकूल परिस्थिती असून, २४ जूनपासून मान्सून पुन्हा सक्रिय होत असल्याचा आशादायक अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे़ दक्षिण महाराष्ट्र ते केरळ दरम्यान द्रोणीय स्थिती निर्माण झाल्याने सध्या पश्चिम किनारपट्टीवर जोरदार पाऊस पडत आहे. कोकणात मालवण ३५०, वेंगुर्ला ३२०, राजापूर २६०, मापुसा २२०, देवगड १९० व कुडाळ, पेडणे, सावंतवाडी येथे १७० मिमी पावसाची नोंदी झाली आहे. 

टॅग्स :Rainपाऊस