शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

गढूळ राजकारण स्वच्छ करणार : आंबेडकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2019 05:01 IST

‘एमआयएम’चे खासदार असदुद्दीन ओवैसी मेळाव्याला अनुपस्थित

सातारा : ‘साताऱ्याचा इतिहास परिवर्तन व पुरोगामी चळवळीचा आहे. पण येथे प्रतिगामी बसलेत की काय हेच समजत नाही. पाणी गढूळ झालं की त्यात अळ्या होतात. असं पाणी फेकून भांडं स्वच्छ करावं लागतं. त्याचप्रकारे वंचित बहुजन आघाडी गढूळ पाणी स्वच्छ करायला निघालीय. त्यासाठी नव्या दमाची माणसं आम्ही उभी करणार आहोत,’ असे ठाम प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.येथील गांधी मैदानावर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सत्ता संपादन मेळावा झाला. यावेळी ते बोलत होते. या मेळाव्याला माजी आमदार लक्ष्मण माने, हरिभाऊ भदे, पार्थ पोळके, भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत खंडाईत, हाजी अस्लम सय्यद यांच्यासह राज्यातील वंचित बहुजन आघाडीचे मान्यवर उपस्थित होते.अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले, ‘९० दिवसांवर लोकसभा निवडणूक आली आहे. पण या देशाला अर्थमंत्री नाही. देशाचं महत्त्वाचं खातं असणारा अर्थ विभागच रामभरोसे असेल तर कसं चालायचं. या सरकारच्या काळात उजवा आणि डावा हात काय करतोय, तेच कळत नाही. त्याचबरोबर भाजप सरकारनं सवर्णांना १० टक्के आरक्षण दिलंय. यामुळे आमच्या पोटात दुखत नाही. पण यामुळे देशातील वैचारिक दिवाळखोरी समोर आलीय. कारण आरक्षण हे विकासाचं साधन नाही तर आश्वासन आहे. या सरकारला काय करावं आणि काय नको हेच कळेनासं झालंय. देशाच्या संविधानानं विकासाची दारं उघडतात; पण हे सरकार तेच बदलायला निघालंय. संविधान चिरंतन राहील, अशी भूमिका घ्यावी लागेल. त्यासाठीच बहुजन वंचित आघाडी निवडणुकीत उमेदवार उभे करणार आहे.या वैचारिक दिवाळखोरीच्या सरकारला बदलण्यासाठी आता नव्या सोशल अजेंड्याची गरज आहे, तेच आता करावे लागणार आहे, असेही अ‍ॅड. आंबेडकर यांनी यावेळी सांगितले. यावेळी राज्यातून आलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. दरम्यान, या मेळाव्यात पार्थ पोळके यांनी भारिप बहुजन महासंघात प्रवेश केला. त्यांचे स्वागत करण्यात आले.ओवैसींची अनुपस्थिती‘एमआयएम’चे खासदार असदुद्दीन ओवैसी हे मेळाव्याला येऊन मार्गदर्शन करणार होते. त्यादृष्टीने सर्व नियोजन झाले होते. पण ते या मेळाव्याला उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे उपस्थितांची नाराजी झाली.आंबेडकर सोलापुरातूनही उभे राहणारमाजी आमदार लक्ष्मण माने यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, ‘प्रकाश आंबेडकर हे अकोल्याबरोबरच सोलापूर लोकसभा मतदारसंघातूनही उभे राहणार आहेत. आता यामुळे समोरच्यांचा ब्लड प्रेशर वाढल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही प्रचारालाही येऊ नका, आम्ही तुम्हाला निवडून आणतो, असेही त्यांनी म्हणताच उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्याचे स्वागत केले.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसी