शहरं
Join us  
Trending Stories
1
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
4
पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिक ठार; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
5
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
6
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
7
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
8
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
9
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
10
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
11
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
12
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
13
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
14
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
15
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
16
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
17
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
18
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
19
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
20
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं

गढूळ राजकारण स्वच्छ करणार : आंबेडकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2019 05:01 IST

‘एमआयएम’चे खासदार असदुद्दीन ओवैसी मेळाव्याला अनुपस्थित

सातारा : ‘साताऱ्याचा इतिहास परिवर्तन व पुरोगामी चळवळीचा आहे. पण येथे प्रतिगामी बसलेत की काय हेच समजत नाही. पाणी गढूळ झालं की त्यात अळ्या होतात. असं पाणी फेकून भांडं स्वच्छ करावं लागतं. त्याचप्रकारे वंचित बहुजन आघाडी गढूळ पाणी स्वच्छ करायला निघालीय. त्यासाठी नव्या दमाची माणसं आम्ही उभी करणार आहोत,’ असे ठाम प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.येथील गांधी मैदानावर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सत्ता संपादन मेळावा झाला. यावेळी ते बोलत होते. या मेळाव्याला माजी आमदार लक्ष्मण माने, हरिभाऊ भदे, पार्थ पोळके, भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत खंडाईत, हाजी अस्लम सय्यद यांच्यासह राज्यातील वंचित बहुजन आघाडीचे मान्यवर उपस्थित होते.अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले, ‘९० दिवसांवर लोकसभा निवडणूक आली आहे. पण या देशाला अर्थमंत्री नाही. देशाचं महत्त्वाचं खातं असणारा अर्थ विभागच रामभरोसे असेल तर कसं चालायचं. या सरकारच्या काळात उजवा आणि डावा हात काय करतोय, तेच कळत नाही. त्याचबरोबर भाजप सरकारनं सवर्णांना १० टक्के आरक्षण दिलंय. यामुळे आमच्या पोटात दुखत नाही. पण यामुळे देशातील वैचारिक दिवाळखोरी समोर आलीय. कारण आरक्षण हे विकासाचं साधन नाही तर आश्वासन आहे. या सरकारला काय करावं आणि काय नको हेच कळेनासं झालंय. देशाच्या संविधानानं विकासाची दारं उघडतात; पण हे सरकार तेच बदलायला निघालंय. संविधान चिरंतन राहील, अशी भूमिका घ्यावी लागेल. त्यासाठीच बहुजन वंचित आघाडी निवडणुकीत उमेदवार उभे करणार आहे.या वैचारिक दिवाळखोरीच्या सरकारला बदलण्यासाठी आता नव्या सोशल अजेंड्याची गरज आहे, तेच आता करावे लागणार आहे, असेही अ‍ॅड. आंबेडकर यांनी यावेळी सांगितले. यावेळी राज्यातून आलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. दरम्यान, या मेळाव्यात पार्थ पोळके यांनी भारिप बहुजन महासंघात प्रवेश केला. त्यांचे स्वागत करण्यात आले.ओवैसींची अनुपस्थिती‘एमआयएम’चे खासदार असदुद्दीन ओवैसी हे मेळाव्याला येऊन मार्गदर्शन करणार होते. त्यादृष्टीने सर्व नियोजन झाले होते. पण ते या मेळाव्याला उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे उपस्थितांची नाराजी झाली.आंबेडकर सोलापुरातूनही उभे राहणारमाजी आमदार लक्ष्मण माने यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, ‘प्रकाश आंबेडकर हे अकोल्याबरोबरच सोलापूर लोकसभा मतदारसंघातूनही उभे राहणार आहेत. आता यामुळे समोरच्यांचा ब्लड प्रेशर वाढल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही प्रचारालाही येऊ नका, आम्ही तुम्हाला निवडून आणतो, असेही त्यांनी म्हणताच उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्याचे स्वागत केले.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसी