शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

गढूळ राजकारण स्वच्छ करणार : आंबेडकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2019 05:01 IST

‘एमआयएम’चे खासदार असदुद्दीन ओवैसी मेळाव्याला अनुपस्थित

सातारा : ‘साताऱ्याचा इतिहास परिवर्तन व पुरोगामी चळवळीचा आहे. पण येथे प्रतिगामी बसलेत की काय हेच समजत नाही. पाणी गढूळ झालं की त्यात अळ्या होतात. असं पाणी फेकून भांडं स्वच्छ करावं लागतं. त्याचप्रकारे वंचित बहुजन आघाडी गढूळ पाणी स्वच्छ करायला निघालीय. त्यासाठी नव्या दमाची माणसं आम्ही उभी करणार आहोत,’ असे ठाम प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.येथील गांधी मैदानावर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सत्ता संपादन मेळावा झाला. यावेळी ते बोलत होते. या मेळाव्याला माजी आमदार लक्ष्मण माने, हरिभाऊ भदे, पार्थ पोळके, भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत खंडाईत, हाजी अस्लम सय्यद यांच्यासह राज्यातील वंचित बहुजन आघाडीचे मान्यवर उपस्थित होते.अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले, ‘९० दिवसांवर लोकसभा निवडणूक आली आहे. पण या देशाला अर्थमंत्री नाही. देशाचं महत्त्वाचं खातं असणारा अर्थ विभागच रामभरोसे असेल तर कसं चालायचं. या सरकारच्या काळात उजवा आणि डावा हात काय करतोय, तेच कळत नाही. त्याचबरोबर भाजप सरकारनं सवर्णांना १० टक्के आरक्षण दिलंय. यामुळे आमच्या पोटात दुखत नाही. पण यामुळे देशातील वैचारिक दिवाळखोरी समोर आलीय. कारण आरक्षण हे विकासाचं साधन नाही तर आश्वासन आहे. या सरकारला काय करावं आणि काय नको हेच कळेनासं झालंय. देशाच्या संविधानानं विकासाची दारं उघडतात; पण हे सरकार तेच बदलायला निघालंय. संविधान चिरंतन राहील, अशी भूमिका घ्यावी लागेल. त्यासाठीच बहुजन वंचित आघाडी निवडणुकीत उमेदवार उभे करणार आहे.या वैचारिक दिवाळखोरीच्या सरकारला बदलण्यासाठी आता नव्या सोशल अजेंड्याची गरज आहे, तेच आता करावे लागणार आहे, असेही अ‍ॅड. आंबेडकर यांनी यावेळी सांगितले. यावेळी राज्यातून आलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. दरम्यान, या मेळाव्यात पार्थ पोळके यांनी भारिप बहुजन महासंघात प्रवेश केला. त्यांचे स्वागत करण्यात आले.ओवैसींची अनुपस्थिती‘एमआयएम’चे खासदार असदुद्दीन ओवैसी हे मेळाव्याला येऊन मार्गदर्शन करणार होते. त्यादृष्टीने सर्व नियोजन झाले होते. पण ते या मेळाव्याला उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे उपस्थितांची नाराजी झाली.आंबेडकर सोलापुरातूनही उभे राहणारमाजी आमदार लक्ष्मण माने यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, ‘प्रकाश आंबेडकर हे अकोल्याबरोबरच सोलापूर लोकसभा मतदारसंघातूनही उभे राहणार आहेत. आता यामुळे समोरच्यांचा ब्लड प्रेशर वाढल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही प्रचारालाही येऊ नका, आम्ही तुम्हाला निवडून आणतो, असेही त्यांनी म्हणताच उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्याचे स्वागत केले.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसी