शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

'पत्रकारांना चहा पाजा, धाब्यावर न्या' या विधानावर चंद्रशेखर बावनकुळेंची सारवासारव

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2023 11:46 IST

पत्रकारांना विचारणार नाही. त्यांचे मत जाणून घेणार नाही. समाजात काय सुरू आहे ते विचारात घेणार नाही का.. म्हणून मी याप्रकारचा सल्ला दिला

मुंबई – अहमदनगर इथं पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी दिलेला अजब सल्ला सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पत्रकारांनी २०२४ पर्यंत आपल्याविरोधात एकही बातमी छापू नये यासाठी त्यांना चहा प्यायला घेऊन जा, धाब्यावर घेऊन जा, चहा प्यायला बोलवायचे म्हणजे समजलेच असेल तुम्हाला असं विधान बावनकुळेंनी केले. त्यावर टीकेची झोड उठताच आता बावनकुळे यांच्याकडून सारवासारव करण्यात येत आहे.

या विधानावर चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, आपण एवढे चांगले काम करतो, मोदींनी गेल्या ९ वर्षात इतके चांगले काम केले. भारताचे चंद्रयान ३ वैज्ञानिकांनी जागतिक यश मिळवले. देशात महिला आरक्षण लागू झाले तरीही नकारात्मक बातम्या येतात. त्यामुळे पत्रकारांसोबत बसा, त्यांचा सन्मान करा. तुम्ही त्यांच्याकडे चहा घ्यायला जा, किंवा त्यांना तुमच्याकडे चहाला बोलवा. खरी वस्तूस्थिती त्यांना सांगा. पत्रकार हे समाजातील मोठे स्थान आहे. आपल्या व्यवस्थेतील चौथा स्तंभ आहे. पत्रकारांना खरे सांगणे, पत्रकारांना समजावून सांगणे काय खरे आहे काय खोटे आहे. पत्रकारांकडून इनपुट घेणे, कारण पत्रकारांकडून समाजातील सत्य समजते. त्यामुळे पत्रकारांना सन्मान देऊन त्यांच्यासोबत चांगले वागा असं त्यांनी म्हटलं.

त्याचसोबत ४ बूथ जे पदाधिकाऱ्यांना दिलेत, त्या बूथवर लोकांचे काय म्हणणे आहे, पत्रकार इतके महत्त्वाचे असतात की ते समाजाचे मत आणि मन बदलू शकतात. शेवटी पत्रकारही एक मतदार आहे. त्याला मत मांडण्याकरता काय अडचण आहे. त्यांच्याशी सापत्न वागणूक कशाला? तुम्ही बोलतच नाही. पत्रकारांना विचारणार नाही. त्यांचे मत जाणून घेणार नाही. समाजात काय सुरू आहे ते विचारात घेणार नाही का.. म्हणून मी याप्रकारचा सल्ला दिला. त्यात कुठलेही वाईट वक्तव्ये नव्हते. आता पत्रकार परिषद संपल्यावर तुम्ही चहा घ्यायला चला यात काय वाईट आहे का? त्यामुळे हे चुकीचे आहे असा खुलासा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला.

काय म्हणाले होते बावनकुळे?

ज्या बुथवर तुम्ही काम कराल तेथे इलेक्ट्रॉनिक मीडियावाले कोण आहेत, पोर्टलवाले कोण आहेत हे पाहावे. आपण एवढे चांगले काम करतोय, पण हे असे काही टाकतात की, जणू गावात बॉम्बच फुटलाय. यासाठी बुथवर जे चार, पाच पत्रकार आहेत त्यांची यादी तयार करा. यात एक, दोन पोर्टलवाले, प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिकवाले असतील, त्यांना महिन्यातून एकदा चहा प्यायला बोलवा, चहा प्यायला बोलवायचे म्हणजे समजलेच असेल तुम्हाला. त्यात काही कमी जास्त झाले तर सुजय विखे आहेतच. महाविजय २०२४ पर्यंत बुथच्या संदर्भात एकही बातमी विरोधात येणार नाही याची काळजी घ्या असं बावनकुळेंनी पदाधिकारी बैठकीत म्हटलं.

 

टॅग्स :BJPभाजपाChandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळे