शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

'पत्रकारांना चहा पाजा, धाब्यावर न्या' या विधानावर चंद्रशेखर बावनकुळेंची सारवासारव

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2023 11:46 IST

पत्रकारांना विचारणार नाही. त्यांचे मत जाणून घेणार नाही. समाजात काय सुरू आहे ते विचारात घेणार नाही का.. म्हणून मी याप्रकारचा सल्ला दिला

मुंबई – अहमदनगर इथं पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी दिलेला अजब सल्ला सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पत्रकारांनी २०२४ पर्यंत आपल्याविरोधात एकही बातमी छापू नये यासाठी त्यांना चहा प्यायला घेऊन जा, धाब्यावर घेऊन जा, चहा प्यायला बोलवायचे म्हणजे समजलेच असेल तुम्हाला असं विधान बावनकुळेंनी केले. त्यावर टीकेची झोड उठताच आता बावनकुळे यांच्याकडून सारवासारव करण्यात येत आहे.

या विधानावर चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, आपण एवढे चांगले काम करतो, मोदींनी गेल्या ९ वर्षात इतके चांगले काम केले. भारताचे चंद्रयान ३ वैज्ञानिकांनी जागतिक यश मिळवले. देशात महिला आरक्षण लागू झाले तरीही नकारात्मक बातम्या येतात. त्यामुळे पत्रकारांसोबत बसा, त्यांचा सन्मान करा. तुम्ही त्यांच्याकडे चहा घ्यायला जा, किंवा त्यांना तुमच्याकडे चहाला बोलवा. खरी वस्तूस्थिती त्यांना सांगा. पत्रकार हे समाजातील मोठे स्थान आहे. आपल्या व्यवस्थेतील चौथा स्तंभ आहे. पत्रकारांना खरे सांगणे, पत्रकारांना समजावून सांगणे काय खरे आहे काय खोटे आहे. पत्रकारांकडून इनपुट घेणे, कारण पत्रकारांकडून समाजातील सत्य समजते. त्यामुळे पत्रकारांना सन्मान देऊन त्यांच्यासोबत चांगले वागा असं त्यांनी म्हटलं.

त्याचसोबत ४ बूथ जे पदाधिकाऱ्यांना दिलेत, त्या बूथवर लोकांचे काय म्हणणे आहे, पत्रकार इतके महत्त्वाचे असतात की ते समाजाचे मत आणि मन बदलू शकतात. शेवटी पत्रकारही एक मतदार आहे. त्याला मत मांडण्याकरता काय अडचण आहे. त्यांच्याशी सापत्न वागणूक कशाला? तुम्ही बोलतच नाही. पत्रकारांना विचारणार नाही. त्यांचे मत जाणून घेणार नाही. समाजात काय सुरू आहे ते विचारात घेणार नाही का.. म्हणून मी याप्रकारचा सल्ला दिला. त्यात कुठलेही वाईट वक्तव्ये नव्हते. आता पत्रकार परिषद संपल्यावर तुम्ही चहा घ्यायला चला यात काय वाईट आहे का? त्यामुळे हे चुकीचे आहे असा खुलासा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला.

काय म्हणाले होते बावनकुळे?

ज्या बुथवर तुम्ही काम कराल तेथे इलेक्ट्रॉनिक मीडियावाले कोण आहेत, पोर्टलवाले कोण आहेत हे पाहावे. आपण एवढे चांगले काम करतोय, पण हे असे काही टाकतात की, जणू गावात बॉम्बच फुटलाय. यासाठी बुथवर जे चार, पाच पत्रकार आहेत त्यांची यादी तयार करा. यात एक, दोन पोर्टलवाले, प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिकवाले असतील, त्यांना महिन्यातून एकदा चहा प्यायला बोलवा, चहा प्यायला बोलवायचे म्हणजे समजलेच असेल तुम्हाला. त्यात काही कमी जास्त झाले तर सुजय विखे आहेतच. महाविजय २०२४ पर्यंत बुथच्या संदर्भात एकही बातमी विरोधात येणार नाही याची काळजी घ्या असं बावनकुळेंनी पदाधिकारी बैठकीत म्हटलं.

 

टॅग्स :BJPभाजपाChandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळे