शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
2
मराठी तरुणीला मारहाण करून पळालेल्या परप्रांतीय तरुणाला मनसैनिकांनी पकडले, चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले 
3
केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले... 
4
नवे उपराष्ट्रपती निवडताना भाजपला नाही चिंता; ४२२ सदस्यांचे समर्थन; बहुमताने एकच उमेदवार
5
मतदार यादीवरून विरोधक आक्रमकच; पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कामकाज ठप्प
6
धनखड यांनी राजीनामा नेमका का दिला? संसदेबाहेर चर्चा
7
गडचिरोलीत विकासविरोधी कारवायांना विदेशातून फंडिंग! नक्षलींनी बंदुका सोडून मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन
8
Mumbai Local: मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
9
कॅप्टनच्या 'सेंच्युरी'नंतर टीम इंडियाकडून क्रांतीचा 'सिक्सर'! टी-२० सह इंग्लंडला वनडेतही 'धोबीपछाड'
10
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
11
रहस्यमय रस्ता, दिवसातून केवळ दोन तासच दिसतो, मग गायब होतो, कारण काय?
12
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
13
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
14
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा
15
IND vs ENG : हरमनप्रीत कौरची कडक सेंच्युरी! निर्णायक वनडेत टीम इंडियानं केली विक्रमांची 'बरसात'
16
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
17
गिलनं 'टाइमपास' करणाऱ्या इंग्लंडच्या सलामी जोडीच्या 'त्या' कृतीचा केला 'पंचनामा'; म्हणाला...
18
१००% प्रॉफिट...! दुप्पट झाला कंपनीचा नफा; बुधवारी फोकसमध्ये राहणार हा शेअर 
19
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
20
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी

प्राधिकरणचा नागरी ग्रामीण विभाग गुंडाळला!

By admin | Updated: May 2, 2015 01:13 IST

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणवरील खर्चाचा भार कमी करण्यासाठी अखेर नागरी व ग्रामीण विभाग गुंडाळण्यात आला आहे. सोबतच तांत्रिक विभागही

विलास गावंडे, यवतमाळमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणवरील खर्चाचा भार कमी करण्यासाठी अखेर नागरी व ग्रामीण विभाग गुंडाळण्यात आला आहे. सोबतच तांत्रिक विभागही प्राधिकरणात वर्ग करण्यात आला आहे. आता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागातूनच सर्व प्रकारची कामे चालणार आहेत.उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्यासाठी तीन वर्षांपूर्वी प्राधिकरणातील विभागीय कार्यालयाचे नागरी-ग्रामीण विभाग, तांत्रिक विभाग असे विभाजन करण्यात आले़ मात्र उत्पन्नापेक्षा खर्चच अधिक असल्याची उपरती प्राधिकरणला झाली. या विभागासाठी असलेल्यामुख्य अधिकाऱ्यांसाठी वाहन, भत्ते शिवाय कार्यालयाचा दैनंदिन खर्चही वाढला होता. नवीनयोजनांची कामे या विभागाकडे सोपविण्यात आली होती. मात्र विभागाकडे कामेच नसल्याने फारसा उपयोग नव्हता. त्यामुळे हा विभागच बंद करण्याचा निर्णय प्राधिकरणने घेतला. प्राधिकरणच्या वरिष्ठ स्तरावरील बैठकांसाठी जलव्यवस्थापन तसेच नागरी व ग्रामीण विभागाचे अधिकारी उपस्थित राहात होते. दोन्ही अधिकाऱ्यांचा प्रवास, भत्ता आदी बाबींचा खर्च प्राधिकरणला झेपत नव्हता. वास्तविक सुरुवातीपासूनच या विभागाकडे वरिष्ठस्तरावरून दुर्लक्ष राहिले. २० कर्मचाऱ्यांची गरज असताना केवळ आठ ते दहा कर्मचाऱ्यांच्या भरवशावर गाडा हाकण्याचा प्रयत्न करण्यात आला.ही बाबही या विभागाच्या अयशस्वीतेला कारणीभूत असल्याचे सांगितले जाते. एकीकडे खर्चाचा भार वाढल्याचे कारण पुढे करत नागरी-ग्रामीण विभाग बंद करण्यात आला, तर दुसरीकडे मुख्य अभियंत्यांची सहा विभागीय कार्यालये सुरू करण्यात आली.औरंगाबाद, नागपूर, अमरावती, नाशिक, पुणे, ठाणे याठिकाणी सदर कार्यालये सुरू करण्यात आली आहेत. नागरी व ग्रामीण विभागाचा कर्मचारी वर्ग मुख्य अभियंता कार्यालयाकडे वर्ग केला जाणार आहे. सदर कार्यालयाकडे कर्मचाऱ्यांची वानवा होती. तोकड्या यंत्रणेवर कारभार सुरू होता.