शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर थरार! इंडिगोचे विमान सापडले गारपिटीच्या तडाख्यात; प्रवाशांचा आक्रोश, विमानात प्रचंड गोंधळ
2
'तेच माझं चुकलं…’वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाला नवे वळण देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल
3
पुणे, छत्रपती संभाजीनगरला मिळाले नवे आयुक्त; सरकारकडून कोणत्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या?
4
'दहशतवादाला जन्म देणारा पाकिस्तान...', WHO च्या मंचावरुन भारताचा पाकवर निशाणा
5
IPL 2025 : कुलदीप यादवची 'सेंच्युरी'; मोडला हरभजन सिंगचा विक्रम
6
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण : पतीसह सासू, नणंदेच्या पोलीस कोठडीत वाढ
7
MI vs DC : ट्रिकी खेळपट्टीवर तळपली सूर्या भाऊची बॅट! ठोकली कडक फिफ्टी
8
Thane: रस्त्याच्या कडेला लघुशंका करताना विजेच्या तारेला स्पर्श, १७ वर्षीय मुलाचा दुर्देवी अंत
9
Yavatmal: पतीला ज्यूसमधून दिले विष, विद्यार्थ्यांच्या मदतीने जाळला मृतदेह; मुख्याध्यापिकेने बनवला होता 'यूपीएससी मिशन २०३०' ग्रुप
10
Mumbai: कधीही कोसळण्याची भीती! 'या' आहेत मुंबईतील अतिधोकायदायक इमारती, पहा संपूर्ण यादी
11
Mumbai: वाडिया रुग्णालयाला मोठं यश, झिपर स्टॉपर गिळलेल्या १० महिन्याच्या बाळाला वाचवलं!
12
'मुंबईचा राजा' नावासह छापलेल्या खास जर्सीसह रोहितचा सन्मान; MI नं चाहत्यांनाही केलं खुश
13
"माझ्या लेकीला जनावरासारखं मारलं, तिचं बाळ कुठे ठेवलंय माहिती नाही"; वैष्णवीच्या वडिलांचा आक्रोश
14
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानपेक्षा अधिक बिथरला चीन; भारताविरोधात टाकले ४ नवे डाव
15
छत्तीसगडमध्ये 27 नक्षलवाद्यांचा खात्मा; पीएम नरेंद्र मोदींनी केले सुरक्षा दलांचे कौतुक; म्हणाले...
16
"१५ हजारांचा चायनिज ड्रोन पाडण्यासाठी १५ लाखांची मिसाईल वापरली’’,  विजय वडेट्टीवार यांची खोचक टीका 
17
'जगाची दिशाभूल करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न फसलाय', 'त्या' आरोपांवरून भारताने तिखट शब्दात सुनावले
18
MI vs DC : अक्षर पटेल का नाही?; फाफ म्हणाला. मागच्या दोन दिवसांपासून तो....
19
काळाचा घाला! साता जन्माचं नातं काही दिवसांत तुटलं; देवदर्शनावरुन परतणाऱ्या नवरा-नवरीचा मृत्यू
20
Vaishnavi Hagwane case : तुझ्या बापाला भीक लागली काय? मी तुला फुकट पोसणार काय?; शशांकने मागितले होते 2 कोटी रुपये

प्राधिकरणचा नागरी ग्रामीण विभाग गुंडाळला!

By admin | Updated: May 2, 2015 01:13 IST

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणवरील खर्चाचा भार कमी करण्यासाठी अखेर नागरी व ग्रामीण विभाग गुंडाळण्यात आला आहे. सोबतच तांत्रिक विभागही

विलास गावंडे, यवतमाळमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणवरील खर्चाचा भार कमी करण्यासाठी अखेर नागरी व ग्रामीण विभाग गुंडाळण्यात आला आहे. सोबतच तांत्रिक विभागही प्राधिकरणात वर्ग करण्यात आला आहे. आता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागातूनच सर्व प्रकारची कामे चालणार आहेत.उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्यासाठी तीन वर्षांपूर्वी प्राधिकरणातील विभागीय कार्यालयाचे नागरी-ग्रामीण विभाग, तांत्रिक विभाग असे विभाजन करण्यात आले़ मात्र उत्पन्नापेक्षा खर्चच अधिक असल्याची उपरती प्राधिकरणला झाली. या विभागासाठी असलेल्यामुख्य अधिकाऱ्यांसाठी वाहन, भत्ते शिवाय कार्यालयाचा दैनंदिन खर्चही वाढला होता. नवीनयोजनांची कामे या विभागाकडे सोपविण्यात आली होती. मात्र विभागाकडे कामेच नसल्याने फारसा उपयोग नव्हता. त्यामुळे हा विभागच बंद करण्याचा निर्णय प्राधिकरणने घेतला. प्राधिकरणच्या वरिष्ठ स्तरावरील बैठकांसाठी जलव्यवस्थापन तसेच नागरी व ग्रामीण विभागाचे अधिकारी उपस्थित राहात होते. दोन्ही अधिकाऱ्यांचा प्रवास, भत्ता आदी बाबींचा खर्च प्राधिकरणला झेपत नव्हता. वास्तविक सुरुवातीपासूनच या विभागाकडे वरिष्ठस्तरावरून दुर्लक्ष राहिले. २० कर्मचाऱ्यांची गरज असताना केवळ आठ ते दहा कर्मचाऱ्यांच्या भरवशावर गाडा हाकण्याचा प्रयत्न करण्यात आला.ही बाबही या विभागाच्या अयशस्वीतेला कारणीभूत असल्याचे सांगितले जाते. एकीकडे खर्चाचा भार वाढल्याचे कारण पुढे करत नागरी-ग्रामीण विभाग बंद करण्यात आला, तर दुसरीकडे मुख्य अभियंत्यांची सहा विभागीय कार्यालये सुरू करण्यात आली.औरंगाबाद, नागपूर, अमरावती, नाशिक, पुणे, ठाणे याठिकाणी सदर कार्यालये सुरू करण्यात आली आहेत. नागरी व ग्रामीण विभागाचा कर्मचारी वर्ग मुख्य अभियंता कार्यालयाकडे वर्ग केला जाणार आहे. सदर कार्यालयाकडे कर्मचाऱ्यांची वानवा होती. तोकड्या यंत्रणेवर कारभार सुरू होता.