शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
2
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
3
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
4
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
5
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
6
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
7
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
8
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
9
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
10
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
11
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
12
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
13
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
14
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
15
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
16
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
17
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
18
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
19
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
20
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील

शहर फणफणले साथीच्या तापाने

By admin | Updated: September 24, 2016 01:21 IST

हवामानातील बदलामुळे साथीच्या आजारांचा विळखा उद्योगनगरीला बसला

पिंपरी : हवामानातील बदलामुळे साथीच्या आजारांचा विळखा उद्योगनगरीला बसला असून, शहर तापाने फणफणले आहे. डेंगी, मलेरिया आणि चिकुनगुनिया या आजाराचे रुग्ण वाढू लागले आहेत. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत डेंगीचे ११९ रुग्ण आढळून आले आहेत, तर मलेरियाचे ४३ आणि चिकुनगुनियाचे १६ रुग्ण आढळून आले आहेत. साथीच्या आजारांनी रुग्णालये फुल झाली आहेत. गेल्या नऊ महिन्यांत स्वाइन फ्लूचे केवळ सहा रुग्ण आढळून आले आहेत. >साथीचे आजार वाढीकडे दुर्लक्षपिंपरी-चिंचवड महापालिकेला पवना धरणातून पाणीपुरवठा होतो. या वर्र्षी धरण १०० टक्के भरल्याने दिवसातून एकवेळ पाणीपुरवठा केला आहे. पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे साथीचे आजार मोठ्या प्रमाणावर वाढत असतात. डासोपत्तीच्या ठिकाणांकडे आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे डेंगी, मलेरिया, चिकुनगुनियाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. पाण्यामुळे होणाऱ्या आजारात वाढ झाल्याची महापालिकेची आकडेवारी वाढत आहे, असा महापालिकेचा आलेख सांगतो. धुराळणी नावालाचआरोग्य विभागाचे कर्मचारी सुस्त असल्याच्या तक्रारी नगरसेवकांनी सर्वसाधारण सभा आणि स्थायी समितीत केलेल्या आहेत. डासोत्त्पत्तीची ठिकाणे नष्ट करण्याची जबाबदारी या कर्मचाऱ्यांवर असते. मात्र, तक्रार आल्यानंतरच कर्मचारी धुराळणीसाठी जातात. अन्य वेळी हे कर्मचारी धुराळणी करीत नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत.भोसरी, दिघीत डेंगी वाढलाभोसरी गावठाण, दिघी, कुदळवाडी, चिखली, चिंचवड वाल्हेकरवाडी, आकुर्डी परिसरात डेंगीसदृश आजारांचे रुग्ण वाढले आहेत. परिसरातील पाण्याची डबकी बुजवून डासोत्पत्तीची ठिकाणे नष्ट करावीत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. मात्र, कर्मचारी कमी असल्याचे कारण महापालिकेकडून दिले जात आहे, अशी तक्रार नागरिकांनी लोकमतकडे केली.पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्र हे गेल्या ४४ वर्षांमध्ये ८६ चौरस किलोमीटरवरून १७७ चौरस किलोमीटर इतके वाढले आहे. गेल्या ३० वर्षांत नागरीकरण वेगाने वाढले आहे. वाढत्या नागरिकीकरणामुळे शहराच्या मूलभूत सुविधांवरही ताण येत आहे. वायू, पाणी, ध्वनिप्रदूषण दिवसेंदिवस वाढतच आहे. पिण्याचे पाणी आणि पावसाळ्यातील साचणारे पाणी यामुळे साथीचे आजार वाढत आहेत. याबाबत महापालिकेच्या पर्यावरण अहवालात गंभीर मुद्देही उपस्थित केले आहेत. महापालिका प्रशासन केवळ उपाययोजना करण्यापलीकडे काहीही ठोसपणे पावले उचलत नसल्याबद्दल नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. उपाययोजनांवरील अंमलबजावणीकडे महापालिकेतील आरोग्य आणि पर्यावरण विभागाचे दुर्लक्ष होत आहे. पावसाळ्यात थंडी, ताप, खोकला असे साथीचे आजार वाढतात. आरोग्य विभागाकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजना कमी पडत असल्याचे आजार बळावत आहेत. गेल्या चार महिन्यांत डेंगीचे ११९ रुग्ण आढळून आले, तर मलेरियाचे ४३ आणि चिकुनगुनियाचे १६ रुग्ण आढळून आले आहेत. साथीच्या आजारांनी रुग्णालये फुल आहेत. गेल्या वर्षी तापाचे एक लाख ३७३९ रुग्ण आढळून आले होते.>आजार व त्याची लक्षणेताप : लक्षणे - कणकण, सुस्ती येणे, भूक मंदावणे, जास्त झोप येणे, उदासीनता येणेलेप्टोस्पायरोसिस : लक्षणे - थंडी वाजणे, तीव्र डोकेदुखी, स्नायू दुखणे, पोटदुखी, डोळे लाल होणे, काहीवेळा त्वचेवर रॅश येणेस्वाइन फ्लू : लक्षणे - सर्दी, घशात खवखव, ताप, अंगदुखी गॅस्ट्रो : लक्षणे - पोटाच्या वरच्या भागात दुखणे, अन्नावरची इच्छा उडणे, उलट्या, ढेकरा येणे, भूक मंदावणेकावीळ : लक्षणे - अस्वस्थता वाटणे, सांधे दुखी, ताप, उलट्या किंवा अन्नावरची इच्छा उडणे, डोकेदुखीटायफॉइड : लक्षणे - भूक कमी लागणे, डोकेदुखी, अंगदुखी, ताप (४ डिग्रीपर्यंत जाऊ शकतो), सुस्तपणा येणे, उलट्या होणे, अन्नावरची इच्छा उडणेकॉलरा : लक्षणे - जुलाब, डायरिया, अशक्तपणा येणे, डिहायड्रेशन, पोटदुखीहे जरूर करापाणी उकळून, गाळून प्या, ताजे शिजलेले अन्न खा, खाण्याआधी हात स्वच्छ धुवा, साचलेल्या पाण्यातून चालू नका, पायाची जखम उघडी ठेवू नका, बाहेरून आल्यावर पाय स्वच्छ धुवा, घराच्या परिसरात साचलेले पाणी काढून टाका>हे टाळा न शिजवलेले पदार्थ खाऊ नका, चटणी खाणे टाळा, उघड्यावरचे पदार्थ खाऊ नका, स्टॉल्स, खाण्याच्या गाड्यांवरचे पाणी पिऊ नका, ताप २ ते ३ दिवसांपर्यंत अंगावर काढू नका, स्वत:च औषधे घेणे टाळा, पावसात अधिक काळ भिजू नका