शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

चिमुरडींच्या किंकाळीने हादरतोय पुरोगामी महाराष्ट्र...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 05:31 IST

पुरोगामी महाराष्ट्र चिमुरडींच्या किंकाळीने हादरत असल्याचे वास्तव एनसीआरबीच्या आकडेवारीतून उघड होत आहे. ३६ राज्यापैकी महाराष्ट्र राज्यात पहिल्या क्रमांकावर असून वर्षभरात ४८ चिमुरड्यांची हत्या करण्यात आल्याची नोंद आहे.

मुंबई : पुरोगामी महाराष्ट्र चिमुरडींच्या किंकाळीने हादरत असल्याचे वास्तव एनसीआरबीच्या आकडेवारीतून उघड होत आहे. ३६ राज्यापैकी महाराष्ट्र राज्यात पहिल्या क्रमांकावर असून वर्षभरात ४८ चिमुरड्यांची हत्या करण्यात आल्याची नोंद आहे. महिन्याला चार चिमुरड्यांची हत्या करण्यात होत असल्याची गंभीर बाब या अहवालातून समोर येत आहे.एनसीआरबीने जाहिर केलेल्या आकडेवारी नुसार, हत्याकांडात महाराष्ट्र तिसºया क्रमांकावर आहे. देशामध्ये ३० हजार ४५० हत्याकांडानी खळबळ उडवली. यामध्ये उत्तरप्रदेश आघाडीवर असून महाराष्ट्र तिसºया क्रमांकावर आहे. यात मन हेलावणारी बाब म्हणजे ६ वर्षाखालील चिमुकल्यांच्या हत्येत पहिल्या क्रमांकावर असलेल्या राज्यात चिमुरड्यांचा गळा घोटण्यात प्रमाण अधिक आहे. गेल्या वर्षभरात ९४ चिमुकल्यांची हत्या झाली. यामध्ये ४८ मुलींचा समावेश आहे. कुठेतरी आजही नकोशी म्हणून चिमुरड्यांची जन्मदाते किंवा नातेवाईकच हत्या करत आहेत. तर काही विकृत वासनेच्या बळी ठरत आहेत. कुठेतरी आजही मुलगी वाचवा बाबत जनजागती होणे गरजेचे आहे.राज्यामध्ये लहान मुलांवर लैंगिक अत्याचाराच्या गुन्यांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत १३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. राज्यात लैंगिक अत्याचाराचे ४ हजार ८१५ गुन्हे दाखल झाले आहेत. देशामध्ये लहान मुलांवर करण्यात आलेल्या अत्याचाराचे १ लाख ६ हजार ९५८ गुन्हे दाखल आहेत. यात राज्य दुसºया क्रमांकावर आहे. उत्तरप्रदेश मुलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यात आघाडीवर असून मध्यप्रदेश तिसºया क्रमांकावर आहे. अल्पवयीन मुलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र