शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
2
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
3
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
4
त्याच पाकिस्तानने सणसणीत वाजवली! इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला दिला पाठिंबा, अमेरिका...
5
NSDL IPO Allotment Status: NSDL आयपीओला तुफान प्रतिसाद; लेटेस्ट GMP सह जाणून घ्या कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
6
२० मिनिटांत ८.८ लाख रुपये लंपास, 'या' ४ चुकांमुळे बँक खाते रिकामे! तुम्ही तर करत नाहीयेत ना?
7
विराट कोहलीसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर तमन्नानं अखेर सत्य सांगितलं, म्हणाली...
8
झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन; किडनीच्या आजाराने होते त्रस्त
9
"इंडस्ट्रीत माझी एकच चांगली मैत्रीण आहे...", शशांक केतकरने घेतलं 'या' अभिनेत्रीचं नाव
10
संशयाचं भूत मानगुटीवर बसलं, सीआरपीएफच्या जवानानं पत्नीचं मुंडकं छाटलं! वृत्त वाहिनीच्या ऑफिसमध्ये गेला अन्...
11
हातखंबा येथे पुन्हा अपघात, गॅसवाहू टँकर वडापावच्या टपरीवर आदळला; ग्रामस्थांनी महामार्ग अडवला
12
भारताबाबत ट्रम्प यांनी मोठी चूक केली, दिग्गज अर्थतज्ज्ञानं साधला निशाणा; म्हणाले, "हे म्हणणं एकदम..."
13
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
14
Share Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Sensex १६६ आणि निफ्टी ३१ अंकांच्या तेजीसह खुला, 'हे' शेअर्स वधारले
15
समृद्धीने सुसाट निघाल तर पकडले जाल, तुमच्यावर लक्ष ठेवणार एक हजार ‘डोळे’
16
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
17
‘महादेवी’ हत्तीण प्रकरणात शासनाचा आदेश नाही, उद्या मुंबईत बैठक : मुख्यमंत्री
18
Video : ६०० वर्षांनंतर पहिल्यांदाच! भूकंपानंतर ज्वालामुखीचा उद्रेक; रशियाच्या कामचटकाचा धोका अजूनही टळेना
19
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
20
पुत्रदा एकादशी-बुध प्रदोष: ८ राशींना सर्वोत्तम काळ, शुभ-लाभ; हाती पैसा राहील, कल्याण होईल!

मराठ्यांच्या लेकरांनो, आता खूप शिका, मोठे व्हा; मनोज जरांगे पाटलांचं भावनिक आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2024 19:08 IST

समाजातील प्रत्येकांच्या घरातील लेकरांसाठी लढतोय. जीव द्यायचीही तयारी आहे. समाजाची ताकद मी इंचही वाया जाऊ दिली नाही असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं. 

मुंबई - मधल्या काळात खूप संकट आले. राज्यातील आमच्या समाजातील काही लोकांनीही खोडा घालण्याचा प्रयत्न केला. मी खूप संघर्ष केला. सरकार आणि विरोधकांनी रचलेले षडयंत्र मी उधळून लावली. मी मागे हटलो नाही. समाजाला आरक्षण मिळवून द्यायचे हेच माझे मत होते. सगेसोयराचा अध्यादेश निघाला. मराठा समाजाला याचा खूप फायदा होणार आहे. मराठा समाजाच्या लेकरांनी आता खूप शिका, मोठे व्हा. मला माझे शरीर कधी साथ देते, कधी नाही. उपोषण जीवावर घेतलं आहे. मी कधी दिसून दिले नाही पण लेकरं मोठी व्हायला हवी अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी भावनिक आवाहन केले आहे.  

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, खूप दशकानंतर या यशाची मराठा समाज वाट बघत होता. कायम मराठ्यांना येड्यात काढण्याचं काम केले जायचे. मराठे इतक्या ताकदीने मुंबईला आले. ६४ किमी रांग लागली होती. कोट्यवधी मराठा मुंबईत घुसला त्यानतंर दुसऱ्याच दिवशी अध्यादेश काढला. मराठा समाजाला मी मायबाप मानले, समाजाने लेकराचा दर्जा दिला. समाजाला हाक दिली तेव्हा समाज पाठिशी उभा राहिला. वेळेप्रसंगी माझ्या जीवावर बेतलं. पण काम करताना कधी हयगय केली नाही. आता सगेसोयऱ्यांचा अध्यादेश मराठ्यांनी हातात घेतलाच असं त्यांनी सांगितले. 

तसेच माझ्या समाजानं खूप त्याग केलाय. अनेकांची कुटुंब उघड्यावर आहे. ज्या मायमाऊलींच्या कपाळाचे कुंकू पुसलंय, कर्ता पुरुष गेल्यावर त्या घरावर काय बेततं हे बोलणे सोप्पे असते. मी लवकरच अशा कुटुंबाची भेट घेणार आहे. आपण जिद्दी आहोत, एका ध्येयावर अडलो तर मरायलाही मागे हटत नाही. समाज एकजूट झाला तर श्रीमंतांची गरज असावी असं काही नाही. सर्वसामान्य मराठ्यांनी ठरवलं, मला साथ द्यायची. समाजाची शक्ती समाजासाठीच वापरते. आता जबाबदारी वाढली, वेळेप्रसंगी जीव गेला तरी आरक्षण मिळवून द्यायचे हे मी ठरवलं. मी समाजातील प्रत्येकांच्या घरातील लेकरांसाठी लढतोय. जीव द्यायचीही तयारी आहे. समाजाची ताकद मी इंचही वाया जाऊ दिली नाही असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं. 

दरम्यान, जर मला फसवलं तर मी एकटा मुंबई चालू देणार नाही. दगाफटका होणार नाही. कायदा पारित होईल. कायदा पारित करण्याची जबाबदारी सरकारची आहे. आता आरक्षणापासून मराठे वंचित राहणार नाही. हे श्रेय समाजाचे आहे. माझेही नाही. माझा लढा यापुढेही कायम राहणार आहे. रात्री ११ ते ३ वकील, तज्ज्ञ बोलावले. एका एका शब्दावर मंथन केले आहे. यापुढे लोकांना काय समजावून सांगायचे, कसं प्रमाणपत्र मिळवायचे यासाठी तालुकास्तरावर टीम तयार करणार आहे. शिंदे समितीच्या कामावर लक्ष ठेवणार आहे. लेकरांनी मोठे व्हावे, वेळेप्रसंगी पुन्हा मुंबईला यायची तयारी आहे असं मनोज जरांगे पाटील यांनी आवाहन केले. 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षण