शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
4
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
5
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
6
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
7
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
8
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
9
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
10
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
11
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
12
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
13
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
14
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
15
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
16
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
17
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
18
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
19
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
20
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!

मराठ्यांच्या लेकरांनो, आता खूप शिका, मोठे व्हा; मनोज जरांगे पाटलांचं भावनिक आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2024 19:08 IST

समाजातील प्रत्येकांच्या घरातील लेकरांसाठी लढतोय. जीव द्यायचीही तयारी आहे. समाजाची ताकद मी इंचही वाया जाऊ दिली नाही असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं. 

मुंबई - मधल्या काळात खूप संकट आले. राज्यातील आमच्या समाजातील काही लोकांनीही खोडा घालण्याचा प्रयत्न केला. मी खूप संघर्ष केला. सरकार आणि विरोधकांनी रचलेले षडयंत्र मी उधळून लावली. मी मागे हटलो नाही. समाजाला आरक्षण मिळवून द्यायचे हेच माझे मत होते. सगेसोयराचा अध्यादेश निघाला. मराठा समाजाला याचा खूप फायदा होणार आहे. मराठा समाजाच्या लेकरांनी आता खूप शिका, मोठे व्हा. मला माझे शरीर कधी साथ देते, कधी नाही. उपोषण जीवावर घेतलं आहे. मी कधी दिसून दिले नाही पण लेकरं मोठी व्हायला हवी अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी भावनिक आवाहन केले आहे.  

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, खूप दशकानंतर या यशाची मराठा समाज वाट बघत होता. कायम मराठ्यांना येड्यात काढण्याचं काम केले जायचे. मराठे इतक्या ताकदीने मुंबईला आले. ६४ किमी रांग लागली होती. कोट्यवधी मराठा मुंबईत घुसला त्यानतंर दुसऱ्याच दिवशी अध्यादेश काढला. मराठा समाजाला मी मायबाप मानले, समाजाने लेकराचा दर्जा दिला. समाजाला हाक दिली तेव्हा समाज पाठिशी उभा राहिला. वेळेप्रसंगी माझ्या जीवावर बेतलं. पण काम करताना कधी हयगय केली नाही. आता सगेसोयऱ्यांचा अध्यादेश मराठ्यांनी हातात घेतलाच असं त्यांनी सांगितले. 

तसेच माझ्या समाजानं खूप त्याग केलाय. अनेकांची कुटुंब उघड्यावर आहे. ज्या मायमाऊलींच्या कपाळाचे कुंकू पुसलंय, कर्ता पुरुष गेल्यावर त्या घरावर काय बेततं हे बोलणे सोप्पे असते. मी लवकरच अशा कुटुंबाची भेट घेणार आहे. आपण जिद्दी आहोत, एका ध्येयावर अडलो तर मरायलाही मागे हटत नाही. समाज एकजूट झाला तर श्रीमंतांची गरज असावी असं काही नाही. सर्वसामान्य मराठ्यांनी ठरवलं, मला साथ द्यायची. समाजाची शक्ती समाजासाठीच वापरते. आता जबाबदारी वाढली, वेळेप्रसंगी जीव गेला तरी आरक्षण मिळवून द्यायचे हे मी ठरवलं. मी समाजातील प्रत्येकांच्या घरातील लेकरांसाठी लढतोय. जीव द्यायचीही तयारी आहे. समाजाची ताकद मी इंचही वाया जाऊ दिली नाही असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं. 

दरम्यान, जर मला फसवलं तर मी एकटा मुंबई चालू देणार नाही. दगाफटका होणार नाही. कायदा पारित होईल. कायदा पारित करण्याची जबाबदारी सरकारची आहे. आता आरक्षणापासून मराठे वंचित राहणार नाही. हे श्रेय समाजाचे आहे. माझेही नाही. माझा लढा यापुढेही कायम राहणार आहे. रात्री ११ ते ३ वकील, तज्ज्ञ बोलावले. एका एका शब्दावर मंथन केले आहे. यापुढे लोकांना काय समजावून सांगायचे, कसं प्रमाणपत्र मिळवायचे यासाठी तालुकास्तरावर टीम तयार करणार आहे. शिंदे समितीच्या कामावर लक्ष ठेवणार आहे. लेकरांनी मोठे व्हावे, वेळेप्रसंगी पुन्हा मुंबईला यायची तयारी आहे असं मनोज जरांगे पाटील यांनी आवाहन केले. 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षण