शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
3
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
4
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
5
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
6
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
7
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
8
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
9
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
10
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
11
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
12
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
13
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
14
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
15
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
16
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
17
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
18
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
19
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
20
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  

वैद्यकीय सुविधांअभावी मुले दगावली

By admin | Updated: December 28, 2014 01:26 IST

तेलंगण सीमेलगतच्या आसरअल्ली भागातील एका महिलेने जुळ्या मुलांना जन्म दिला. मात्र, जन्मत:च या मुलांना आरोग्य केंद्रात आवश्यक सोयीसुविधा न मिळाल्याने या जुळ्या मुलांचा मृत्यू झाला.

गडचिरोली : तेलंगण सीमेलगतच्या आसरअल्ली भागातील एका महिलेने जुळ्या मुलांना जन्म दिला. मात्र, जन्मत:च या मुलांना आरोग्य केंद्रात आवश्यक सोयीसुविधा न मिळाल्याने या जुळ्या मुलांचा मृत्यू झाला. या घटनेला गडचिरोली जिल्हा आरोग्य प्रशासन व राज्य शासनाची टोल फ्री आरोग्य सेवा जबाबदार असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आह़े गडचिरोली या मागास जिल्ह्यात राज्य शासनाच्या तसेच जिल्हा परिषदेच्या आरोग्य सेवेशिवाय अन्य आरोग्य सेवा नाही. ४५ आरोग्य केंद्रे, ३ उपजिल्हा रुग्णालये, ८ ग्रामीण रुग्णालये व १ जिल्हा सामान्य रुग्णालय या भरवशावर आरोग्य यंत्रणेचा कारभार सुरू आहे. आरोग्य यंत्रणेत मोठ्या प्रमाणावर एमबीबीएस व इतर वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे गावपातळीवरील आरोग्य उपकेंद्रातून रुग्णांना ग्रामीण रुग्णालये व उपजिल्हा रुग्णालयात पाठविले जाते. तेथून रुग्ण जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविले जातात. असाच प्रकार सिरोंचा तालुक्यातील आसरअल्ली गावातील सारक्का गगुरी या महिलेबाबतही घडला. गगुरी यांना आसरअल्ली येथील उपकेंद्रात जुळी मुले झाली. परंतु या मुलांचे वजन कमी तसेच त्यांची स्थिती नाजूक असल्याने त्यांना आसरअल्लीवरून सिरोंचा ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. या रुग्णालयाने त्यांना अहेरी उपजिल्हा रुग्णालयात जाण्यासाठी सांगितले. अहेरीला येताना या महिलेचा एक शिशू १०० कि.मी.च्या प्रवासात दगावला. अहेरीवरून पुन्हा गडचिरोली येथे या महिलेला एका नवजात शिशूला घेऊन पाठविण्यात आले. गडचिरोली या जिल्हा रुग्णालयानेही त्या नवजात शिशंूवर आवश्यक उपचार करण्याची गरज होती. परंतु त्यांनीही नागपूर येथे जाण्याचा सल्ला दिला. आसरअल्ली ते नागपूरपर्यंतचा ४०० कि.मी.चा प्रवास करताना सारक्का गगुरी यांना आपला दुसराही शिशू गमवावा लागला. नागपूर येथे दुसऱ्याही नवजात शिशूचा मृत्यू झाला.गडचिरोली जिल्ह्यात अनेक आरोग्य केंद्रांना नवजात शिशू बाळ कक्ष (वॉर्मर) पुरवठा करण्यात आले आहे. मात्र ते हाताळण्याचे प्रशिक्षण कर्मचाऱ्यांना नाही. अनेक रुग्णालयांत बाळंतपणाच्या केसेस हाताळण्यासाठी वैद्यकीय अधिकारी नाहीत. केवळ ‘रेफर टू रेफर’ असा कार्यक्रम गावापासून जिल्ह्यापर्यंत सुरू आहे. त्यामुळेच सारक्कांना आपले जुळे अपत्य गमवावे लागले. (प्रतिनिधी)च्राज्य शासन प्रसूत महिलांना विनामूल्य रुग्णवाहिका उपलब्ध करून देते. मात्र सिरोंचा रुग्णालयात या सेवेसाठी डॉक्टर व वाहनचालक नाही. त्यामुळे २ महिन्यांपासून ही रुग्णसेवा बंद आहे. त्यामुळे अहेरीला येताना या महिलेचा एक शिशू १०० कि.मी.च्या प्रवासात दगावला. अहेरीवरून पुन्हा गडचिरोली येथे एका नवजात शिशूला घेऊन पाठविण्यात आले.