शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

मुख्यमंत्र्यांची भेट, नंतर प्रकाश आंबेडकरांची वसंत मोरेंवर टीका; म्हणाले तीन विषयांवर चर्चा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2024 17:11 IST

मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर आंबेडकर यांनी ही प्रतिक्रिया दिली. तसेच शिंदेंसोबत झालेल्या चर्चेचा तपशीलही त्यांनी दिला.

मनसे सोडत लोकसभेला वंचितमध्ये उमेदवारीसाठी आलेल्या पुण्याचे वसंत मोरे यांनी शिवबंधन बांधणार असल्याचे जाहीर केले आहे. मातोश्रीवर जाऊन ते येत्या काही दिवसांत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. यावेळी मोरे यांनी वंचितच्या लोकांनी, मतदारांनी आपल्याला स्वीकारले नसल्याचे कारण सांगितले होते. आता त्याला प्रकाश आंबेडकर यांचे प्रत्यूत्तर आले आहे. 

वसंत मोरेंचे राजकारण आयाराम-गयारामांप्रमाणे आहे. त्यांना माणसे ओळखता येत नाहीत. त्यांच्याकडून सातत्याने अशा गोष्टी घडत आहेत, अशी टीका आंबेडकर यांनी केली. मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर आंबेडकर यांनी ही प्रतिक्रिया दिली. तसेच शिंदेंसोबत झालेल्या चर्चेचा तपशीलही त्यांनी दिला.

मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेमध्ये मुख्य तीन मुद्दे होते, जमीनीवरील शेतीसाठी केले अतिक्रमण, गावामध्ये स्वतंत्र घरे बांधली आहेत त्याला अतिक्रमण काढण्याच्या नोटीसा आल्या आहेत. तसेच दीक्षाभूमी आंदोलन प्रकरण या मुद्द्यांवर चर्चा झाली. ज्यांनी शेतीसाठी अतिक्रमण केले आहे त्यांच्या पिकांचे नुकसान होणार नाही, ती पिकं त्यांनाच मिळतील असा निर्णय त्याठिकाणी घेण्यात आला असल्याचे आंबेडकर यांनी सांगितले. 

गावामधील घरे आहेत पण ती अतिक्रमीत आहेत असे दाखवण्यात आले आहे. त्यांना उठवले जाणार नाही. नोटीस बजावल्या जाणार नाहीत. त्यासंदर्भातील नवीन धोरण शासन लवकरच जाहीर करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. याचबरोबर दीक्षाभूमी प्रकरणात ज्या कार्यकर्त्यांवर केसेस झाल्या आहेत त्या सर्व केसेसवर कोणतीही पुढची प्रक्रिया होणार नाही असे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आहेत, असेही आंबेडकर म्हणाले. 

 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरVasant Moreवसंत मोरेShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदे