शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
4
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
7
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
8
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
9
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
10
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
11
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
12
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
13
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
14
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
15
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
16
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
17
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
18
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
19
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
20
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांची मराठवाड्यात शिवारफेरी

By admin | Updated: September 5, 2015 01:20 IST

मागेल त्याला शेततळे अन् आॅगस्टमध्ये चारा छावणी सुरू केल्याचा 'क्रांतिकारी' निर्णय सांगत कुठल्याही ठोस निर्णयाविना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मराठवाड्याच्या दुष्काळी भागातील

मराठवाडा वर्तमान धर्मराज हल्लाळेमागेल त्याला शेततळे अन् आॅगस्टमध्ये चारा छावणी सुरू केल्याचा 'क्रांतिकारी' निर्णय सांगत कुठल्याही ठोस निर्णयाविना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मराठवाड्याच्या दुष्काळी भागातील तीन दिवसांचा दौरा जणू शिवारफेरीच ठरला़ आता पाहणी झाली, आराखडे तयार आहेत़ लवकरच निर्णय घेऊ, एवढाच काय तो शाब्दिक दिलासा दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांना मिळाला़ चारा छावणीची अट शिथिल करून १५ लाखांची ठेवमर्यादा ५ लाखांवर आणली़ ५०० ऐवजी २५० जनावरे असली तरी छावणी सुरू होईल, एवढेच नाहीतर गेल्या ५० वर्षांत पहिल्यांदाच आॅगस्टमध्ये चारा छावणी सुरू करण्याचा क्रांतिकारी निर्णय आमच्या सरकारने घेतला, असे मुख्यमंत्र्यांनी ठासून सांगितले़ त्याचवेळी गेल्या कित्येक वर्षांत आज इतकी भीषण परिस्थिती उद्भवली नव्हती, हे सरकारने लक्षात घेतले पाहिजे़ मराठवाड्यात आजघडीला ८१२ गावांमध्ये १२१६ टँकर सुरू आहेत़ लातूर व जालना शहराला १५ दिवसांतून एकवेळ पाणीपुरवठा होतो़ परभणीला १० ते १२ दिवसाआड, उस्मानाबाद, बीडला ८ दिवसाआड तर नांदेड, हिंगोलीला तीन-चार दिवसाआड पाणीपुरवठा होतो़ ग्रामीण भागाचा तर भरपावसाळ्यातच टँकरवाडा झाला आहे़ जिल्ह्याची ठिकाणे असलेल्या शहरांवर पेयजलाचे संकट आहे़ अशावेळी मराठवाड्यातील पाण्याच्या टँकरसाठी ८० कोटींची तरतूद केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले़ प्रत्यक्षात जिल्हा शहरे असलेल्या ठिकाणी पुढील पावसाळ्यापर्यंतचे नियोजन करावे लागणार आहे़ एकूण लोकसंख्या, प्रकल्पांमधील उपलब्ध पाणी, नजीकच्या प्रकल्पातील उपलब्धता व इतर आपत्कालीन उपाययोजना जाहीर करून जनतेला दिलासा द्यावा लागणार आहे़ लातूरला रेल्वेने पाणी देण्याचे नियोजन केले आहे़ त्याच धर्तीवर संपूर्ण मराठवाड्यातील मोठ्या शहरांमध्ये भविष्यात उद्भवणारी परिस्थिती लक्षात घेवून रेल्वे मार्गाचा उपयोग करून वा अन्य मार्गाने पाणी कोठून व कसे आणता येईल, याचे नियोजन करण्याचे निर्देश त्या-त्या जिल्ह्याच्या प्रशासनाला देणे अपेक्षित आहे़ आॅगस्टमध्ये चारा छावणी सुरू केल्याचे भूषण सांगणाऱ्या सरकारला शेतकऱ्यांनी खडे बोल सुनावले आहेत़ चारा कसा उगवायचा ते सांगू नका, दावणीला चारा द्या, सरसकट मदत करा, या मागणीचे आश्वासनही मिळू शकलेले नाही़ चारा छावण्यांपेक्षा दावणीला चारा देत थेट शेतकऱ्यांना मदत करण्याची आवश्यकता आहे़ लोकसंख्येच्या प्रमाणात टंचाईग्रस्त भागातील टँकरची संख्या ठरते़ त्याच धर्तीवर पशूधन संख्येवरही टँकरची संख्या वाढवावी, असा यापूर्वीचा शासन आदेश आहे़ त्यामुळे जनावरांच्या पाण्याची सोय टँकर आराखड्यात आणली पाहिजे़ कृष्णा खोऱ्याच्या पहिल्या लवादाने मान्य केलेले ७ टीएमसी पाणी मराठवाड्याला देण्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली़ यापूर्वीच्या सरकारमध्ये ९ टीएमसी पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता़ प्रत्यक्षात कालबद्ध कार्यक्रमाची आखणी करून मराठवाड्याला हक्काचे पाणी देण्याची वेळ आली आहे़ त्यामुळे ७ टीएमसीची मेहरबानी नको, हक्काचे पाणी दिले पाहिजे़ याशिवाय विभागात दीड लाख शेततळी, प्रत्येक जिल्ह्यात मनरेगाच्या माध्यमातून लोकांना रोजगार या दीर्घकालीन उपाययोजना मुख्यमंत्र्यांनी सांगितल्या़ त्यांनी ३ दिवसांत २९ गावांना भेटी दिल्या़ २५ ते ३० हजार लोकांशी संवाद साधला़