शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांचे ‘जय जवान, जय किसान’, गडचिरोलीत पोलिसांसोबत तर मुंबईत शेतकऱ्यांसोबत साजरी केली दिवाळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2022 06:12 IST

दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी दोन महत्त्वाचे निर्णय घेेणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी संध्याकाळी वर्षा या शासकीय निवासस्थानी शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी केेली

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकाच दिवशी सकाळी गडचिरोली येथे जाऊन आदिवासी बांधव आणि पोलिसांसोबत तर संध्याकाळी मुंबईत येऊन शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी केली. एकाच दिवसात मुख्यमंत्र्यांनी ‘जय जवान, जय किसान’ हा नारा कृतीतून दाखवून दिला. 

दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी दोन महत्त्वाचे निर्णय घेेणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी संध्याकाळी वर्षा या शासकीय निवासस्थानी शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी केेली. प्रत्येक जिल्ह्यातील ३ ते ४ प्रातिनिधिक शेतकरी या सोहळ्यास सपत्नीक उपस्थित होते. वर्षा निवासस्थानी शेतकऱ्यांना बोलावून दिवाळी साजरी करणारे एकनाथ शिंदे पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत.

मुंबईत आलेल्या शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भेटवस्तू देण्यात आल्या. यावेळी मुख्यमंत्री, त्यांच्या पत्नी लताताई, तसेच मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे आणि त्यांच्या पत्नी वृषाली असे संपूर्ण कुटुंब या सोहळ्यात सहभागी झाले होते. लताताई आणि वृषाली यांनी शेतकऱ्यांचे औक्षण केले आणि भेटवस्तू दिल्या. 

मुख्यमंत्री म्हणाले...- हे शेतकऱ्यांचे सरकार आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी  कृषी कृती विकास आराखडा तयार केला जात आहे. - नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीचे होणारे नुकसान लक्षात घेऊन पूरक जोडधंदा कसा देता येईल, यावर अधिकारी काम करीत आहेत. कृषी क्षेत्राला आधुनिकतेची जोड देऊ. - अवकाळी पाऊस, अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान लक्षात घेऊन आम्ही नियम बाजूला ठेवून दुप्पट मदत दिली. परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचीही भरपाई द्यायची आहे.

गडचिरोलीतील पोलिसांसोबत फराळभामरागड (जि. गडचिरोली) : मंगळवारी सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भामरागड तालुक्यातील नक्षलग्रस्त आणि दुर्गम धोडराज पोलीस मदत केंद्राच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन केले, तसेच आदिवासी बांधव आणि पोलीस जवानांसोबत दिवाळी साजरी करीत त्यांना भेटवस्तू आणि फराळाचे वाटप केले.

दुर्गम, आदिवासीबहुल भागाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी नक्षलवाद हा अडसर ठरत आहे. त्यामुळे या भागाच्या संपूर्ण विकासासाठी नक्षलवाद संपवणे गरजेचे आहे. त्यासाठी पोलीस दल सक्षम आहे.          - एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेGadchiroliगडचिरोलीDiwaliदिवाळी 2022