शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
2
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
3
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
4
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
5
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
6
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
7
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
8
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
9
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
10
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
11
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
12
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप
13
बॉलिवूडच्या बादशाहाने केलं मतदान, पत्नी आणि मुलांसह केंद्रावर पोहोचला अन्...
14
सामूहिक बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीला जिवंत वीट भट्टीत जाळले; नराधमांना फाशीची शिक्षा
15
Chhattisgarh Accident: छत्तीसगडमध्ये मृत्यूचे तांडव; मजुरांच्या वाहनाचा भीषण अपघात; १७ जण दगावले
16
"आशिष शेलार यांनी लोकसभा निवडणुकीतून काढला पळ’’, मुंबईतील मतदानादरम्यान ठाकरे गटाचा टोला 
17
'शिंदेंसोबत जायला मी विरोध केला होता'; गजानन किर्तीकरांच्या पत्नीने मांडली रोखठोक भूमिका
18
...अन् अचानक तरुण झाला कोट्यधीश; खात्यात आले 9900 कोटी, बँक मॅनेजरही हैराण
19
"ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे...", अभिनेत्री वैशाली भोसलेला मतदान करता न आल्यामुळे व्यक्त केला संताप
20
अहमदाबाद विमानतळावर मोठी कारवाई, इस्लामिक स्टेटचे ४ दहशतवादी पकडले, श्रीलंकेचे कनेक्शन उघड

मुख्यमंत्री तोडगा काढणार?

By admin | Published: May 13, 2016 1:27 AM

शहराची मेट्रो, २४ तास पाणीपुरवठा, जायका, कचरा प्रकल्पाची जागा, विकास आराखडा यांसह अनेक महत्त्वाचे प्रश्न अनेक दिवसांपासून रखडले आहेत.

पुणे : शहराची मेट्रो, २४ तास पाणीपुरवठा, जायका, कचरा प्रकल्पाची जागा, विकास आराखडा यांसह अनेक महत्त्वाचे प्रश्न अनेक दिवसांपासून रखडले आहेत. यावर अनेकदा बैठका होऊन मार्ग काहीच निघत नसल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी, १३ मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबाबत महत्त्वपूर्ण बैठक घेत आहेत. या बैठकीमध्ये प्रश्नांवर तोडगा निघणार की पुन्हा आश्वासनेच मिळणार, याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.राज्य शासनाकडे प्रलंबित असलेल्या प्रश्नांची सविस्तर माहिती महापालिका प्रशासनाकडून संकलित करण्यात आली आहे. शुक्रवारी होणाऱ्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांपुढे ती ठेवली जाणार असल्याची माहिती महापौर प्रशांत जगताप व आयुक्त कुणाल कुमार यांनी दिली.प्रकल्पग्रस्तांच्या दोन मागण्या पूर्ण झाल्याशिवाय भामाआसखेड प्रकल्पाचे काम सुरू करू देणार नाही, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. त्यामध्ये प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीवरील शेरे रद्द करावेत व ६५ टक्के भरल्याशिवाय जमिनींचा ताबा मिळावा, अशा मागण्या त्यांनी ठेवल्या आहेत. याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार राज्य शासनाचा असून, मुख्यमंत्र्यांपुढे हा प्रश्न ठेवण्यात येणार असल्याचे जगताप यांनी सांगितले. विकास आराखड्याला शासनाची अंतिम मंजुरी मिळत नसल्याने अनेक अडचणी येत आहेत, त्यामुळे त्याला तातडीने मंजुरी देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.शहराची पाण्याची गरज लक्षात घेता किमान ६ टीएमसी पाणी मुळशी धरणातून घ्यावे लागणार आहे. मुळशी धरण ते शहरापर्यंत पाइपलाइन टाकण्यासाठीचा आराखडा पालिकेने तयार केला आहे. मुळशी धरणामध्ये २८ टीएमसी इतका पाणीसाठा आहे. त्या पाण्यातून साडेतीनशे मेगावॉट इतकी वीजनिर्मिती होते. तितकी वीज शासनाने त्यांना उपलब्ध करून द्यावी आणि मुळशी धरणाचे पाणी पुणे, पिंपरी-चिंचवड यांना वाटून द्यावे, असा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांपुढे मांडण्यात येणार असल्याचे जगताप यांनी सांगितले.पीएमपीच्या इमारती विकसित करण्यासाठी अडीच एफएसआय मिळावा, जायका प्रकल्पाच्या अडचणी दूर व्हाव्यात, पिंपरी सांडस येथील जागा कचरा प्रक्रियेसाठी मिळावी, अमृत योजना वेगाने मार्गी लागावी आदी विषय मुख्यमंत्र्यांपुढे मांडले जाणार आहेत. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, पालकमंत्री गिरीश बापट, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह जिल्ह्यातील सर्व खासदार, आमदार, पालिकेतील गटनेते उपस्थित राहणार आहेत.