शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर विमानतळावर मुख्यमंत्री ताटकाळत थांबले

By admin | Updated: July 14, 2016 18:48 IST

साहेब ! बाहेर शेतकरी आलेत. त्यांचे काही प्रश्न आहेत.तुम्हाला भेटायंच म्हणतात़़. त्यांना बोलावू का? असे प्रांताधिकारी शहाजी पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारताच

- आप्पासाहेब पाटीलसोलापूर, दि. १४ - साहेब ! बाहेर शेतकरी आलेत. त्यांचे काही प्रश्न आहेत.तुम्हाला भेटायंच म्हणतात़़. त्यांना बोलावू का? असे प्रांताधिकारी शहाजी पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारताच मुख्यमंत्री फडणवीस यांनी तत्काळ हो म्हणत, चला भेटूयात म्हणत मुख्यमंत्री धावपट्टीवरून चालत मुख्य कार्यालयापर्यंत आले, पण़ शेतकरी गायब़़ पुन्हा मुख्यमंत्री म्हणाले, कुठे आहेत शेतकरी ? बोलवा त्यांना़ अखेर शेतकरी न आल्याने मुख्यमंत्री १५ ते २० मिनीट ताटकत थांबले !घडलेला प्रकार असा की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंढरपुरातील आषाढी वारीच्या महापुजेसाठी सहपरिवार गुरुवारी सोलापुरातील विमानतळावर दाखल झाले़ मुख्यमंत्री येणार म्हटल्यावर त्यांच्यासमोर आपल्या व्यथा मांडाव्यात म्हणून काही शेतकरी विमानतळावर आले होते़ आम्हाला मुख्यमंत्र्यांना भेटायचे आहे तसा निरोप तरी द्या अशी हाक शेतकऱ्यांनी प्रांताधिकासमोर मांडली़ यावेळी प्रांताधिकारी पवार यांनी ठीक आहे मी मुख्यमंत्र्यांना निरोप देतो त्यांनी जर वेळ दिला तर भेट होईल अन्यथा नाही असेही प्रांताधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना समजावून सांगितले़ यानंतर काही वेळाने मुख्यमंत्र्यांचे विमानतळावर आगमन होताच उपस्थित मान्यवरांनी मुख्यमंत्र्याचे स्वागत केले़ त्यानंतर मुख्यमंत्र्यांना प्रांताधिकारी यांनी शेतकऱ्यांचा तो निरोप पोहचविला़ या निरोपानंतर मुख्यमंत्र्यांनी कशाचाही विचार न करता तत्काळ शेतकऱ्यांना भेटण्यासाठी होकार दिला व पायी चालत ते विमान प्राधिकरण कार्यालयाकडे निघाले़ यावेळी शेतकऱ्यांना लवकर बोलवा़ मुख्यमंत्री पुढील दौऱ्यासाठी रवाना होणार आहेत, असे भाजपाचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार म्हटले़. यानंतर काही वेळाने प्रभारी पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी साहेब ! शेतकरी बाहेर नाहीत, असा निरोप दिला़ त्यानंतर मुख्यमंत्री निराश होऊन परतले़ यावेळी प्रभारी पोलीस आयुक्त दिपक पांडे, सहा़ पोलीस उपायुक्त अर्पणा गिते, भाजपाचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, प्रांताधिकारी शहाजी पवार, तहसिलदार समाधान शेंडगे, मनपा उपायुक्त अजित साठे आदी विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते़ प्रांतधिकारी शहाजी पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चुकीची माहिती दिली़ खरेच शेतकरी आले होते गेले कुठे़़़जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाच्या समन्वयाअभावी मुख्यमंत्री फडणवीस यांना ताटकाळत उभे रहावे लागले़ ही गोष्ट चुकीची आहे़-शहाजी पवारभाजपा जिल्हाध्यक्ष, सोलापूऱशेतकऱ्यांचे प्रश्न व अडीअडचणी जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांनी धावपट्टी सोडून काही अंतर चालत आले होते़ प्रचंड पोलीस बंदोबस्त व वेळ कमी असतानाही शेतकऱ्यांना भेटणाऱ्या मुख्यमंत्र्यांना प्रशासनाच्या समन्वयाचा अभावामुळे परत निघून जावे लागले़-अशोक निंबर्गीभाजपा, शहराध्यक्ष, सोलापूर शहऱकाही नाही शेतकरी विविध विषयांवर बोलणार होते़ ते येथे आलेही होते़ त्यामुळेच मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तसा निरोप दिला होता़ पण शेतकरी गायब कधी झाले हे कळलेच नाही़ त्यामुळे मुख्यमंत्र्यांची व शेतकऱ्यांची भेट होऊ शकली नाही़-शहाजी पवारप्रांताधिकारी, सोलापूऱसंतप्त शेतकरी निघून गेले.सोलापूर दुष्काळी जिल्हा़ तीन नक्षत्रे कोरडी गेली़ खरीप हंगामही वाया गेला़ फळबागा जळून गेल्या, अशा स्थिती आपल्या व्यथा मुख्यमंत्र्यांना मुंबईत जाऊन मांडू शकत नाही, तेच सोलापुरात येणार ही माहिती मिळताच शेतकरी त्यांना भेटण्यासाठी विमानतळावर आले होते़ मात्र पोलिसांनी बंदोबस्ताचे कारण पुढे करीत अक्षरश: त्ऱ्यांना तेथून पिटाळून लावले़ शेतकरी संतापाने निघून गेले़.