शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

मुख्यमंत्र्यांनी उघड केली बिल्डरांची खेळी, मुंबईतील भाडेकरूंना हक्काचे घर

By admin | Updated: July 17, 2015 00:32 IST

मुंबई उपनगरातील जुन्या मोडकळीस आलेल्या इमारतींमधील भाडेकरूंची होत असलेली फसवणूक थांबवता यावी म्हणून आणि त्यांना हक्काचे घर मिळावे म्हणून याच अधिवेशनात

मुंबई : मुंबई उपनगरातील जुन्या मोडकळीस आलेल्या इमारतींमधील भाडेकरूंची होत असलेली फसवणूक थांबवता यावी म्हणून आणि त्यांना हक्काचे घर मिळावे म्हणून याच अधिवेशनात त्यासाठी कायदा केला जाईल, जर विधेयक आले नाही, तर वटहुकूम काढला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. त्याचवेळी भाडेकरूंच्या इमारतींच्या बाबतीत बिल्डर कसे वागतात याचे वर्णन मुख्यमंत्र्यांनीच स्वत: सभागृहात केले.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, भाडेकरू, रहिवाशांनी बनविलेली यादी, मिळणारा एफएसआय, इमारत मालक, संस्था, विकासक यांना देणे, भाडेकरू, मालक, रहिवाशी यांच्या मालमत्तेच्या हक्कात बाधा येणार नाही असे सांगणे या गोष्टी धोरणाचा भाग म्हणून ठीक आहेत. त्या धोरणामुळे भाडेकरूंचा हक्क अबाधित राहतो; पण त्याला घराची शाश्वती उरत नाही. पाडली जाणारी इमारत किती काळात बांधून पूर्ण होईल याचे कोणतेही बंधन बिल्डरवर नसते. बिल्डर पळवाटा काढतात, घर मिळणार हे कागदावरच राहते. पण ते घर कधी मिळेल हेदेखील कळत नाही. यासाठी कायद्यातच बदल करावे लागतील. आपल्या विभागातर्फे यासाठीच्या कायद्याचा मसुदा याच अधिवेशनात आणला जाईल. जर ते शक्य झाले नाही, तर आपण अध्यादेश आणू असे या सभागृहातच घोषित करतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.खोटे आॅडिट करणाऱ्यांवर कारवाई-स्ट्रक्चरल आॅडिट करतानाही खोटे आॅडिट करून इमारती रिकाम्या करून घेतल्या जातात. अशावेळी बिल्डरच्या दबावाखाली येऊन अधिकारी काम करतात. अशा दबावाखाली येऊन काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवरदेखील कारवाई करू, असेही मुख्यमंत्री म्हणाले. शिवाय ट्रांझीट कॅम्पमध्ये बेकायदा राहणाऱ्यांच्या संबंधी अनेक आमदार प्रश्न विचारत आहेत; त्यासाठी ट्रांझीट कॅम्पच्या संबंधी स्वतंत्र लक्षवेधी लावा, असेही मुख्यमंत्र्यांनीच सुचवले.दुर्घटनेची होती भीती- भाजपाचे अतुल भातखळकर यांनी लक्षवेधी उपस्थित केली होती. मुंबई शहर व उपनगरातील मोडकळीस आलेल्या इमारतींमधील रहिवाश्यांना महानगरपालिकेच्या नियम ३५४ नुसार घरे रिकामे करण्याच्या नोटीसा बजावल्या आहेत; मात्र अशा इमारतींमधील रहिवाशांना पुन्हा आपले हक्काचे घर मिळेल याची कोणतीच शाश्वती नसल्यामुळे रहिवासी घर सोडायला तयार होत नाहीत. त्यामुळे अशा इमारती कोसळून दुर्घटना घडतात, असेही भातखळकर म्हणाले. या चर्चेत आ. आशिष शेलार, आ. योगेश सागर, आ. मंगलप्रभात लोढा, आ. राज पुरोहित आदींनीही भाग घेतला.