शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांनी उघड केली बिल्डरांची खेळी, मुंबईतील भाडेकरूंना हक्काचे घर

By admin | Updated: July 17, 2015 00:32 IST

मुंबई उपनगरातील जुन्या मोडकळीस आलेल्या इमारतींमधील भाडेकरूंची होत असलेली फसवणूक थांबवता यावी म्हणून आणि त्यांना हक्काचे घर मिळावे म्हणून याच अधिवेशनात

मुंबई : मुंबई उपनगरातील जुन्या मोडकळीस आलेल्या इमारतींमधील भाडेकरूंची होत असलेली फसवणूक थांबवता यावी म्हणून आणि त्यांना हक्काचे घर मिळावे म्हणून याच अधिवेशनात त्यासाठी कायदा केला जाईल, जर विधेयक आले नाही, तर वटहुकूम काढला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. त्याचवेळी भाडेकरूंच्या इमारतींच्या बाबतीत बिल्डर कसे वागतात याचे वर्णन मुख्यमंत्र्यांनीच स्वत: सभागृहात केले.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, भाडेकरू, रहिवाशांनी बनविलेली यादी, मिळणारा एफएसआय, इमारत मालक, संस्था, विकासक यांना देणे, भाडेकरू, मालक, रहिवाशी यांच्या मालमत्तेच्या हक्कात बाधा येणार नाही असे सांगणे या गोष्टी धोरणाचा भाग म्हणून ठीक आहेत. त्या धोरणामुळे भाडेकरूंचा हक्क अबाधित राहतो; पण त्याला घराची शाश्वती उरत नाही. पाडली जाणारी इमारत किती काळात बांधून पूर्ण होईल याचे कोणतेही बंधन बिल्डरवर नसते. बिल्डर पळवाटा काढतात, घर मिळणार हे कागदावरच राहते. पण ते घर कधी मिळेल हेदेखील कळत नाही. यासाठी कायद्यातच बदल करावे लागतील. आपल्या विभागातर्फे यासाठीच्या कायद्याचा मसुदा याच अधिवेशनात आणला जाईल. जर ते शक्य झाले नाही, तर आपण अध्यादेश आणू असे या सभागृहातच घोषित करतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.खोटे आॅडिट करणाऱ्यांवर कारवाई-स्ट्रक्चरल आॅडिट करतानाही खोटे आॅडिट करून इमारती रिकाम्या करून घेतल्या जातात. अशावेळी बिल्डरच्या दबावाखाली येऊन अधिकारी काम करतात. अशा दबावाखाली येऊन काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवरदेखील कारवाई करू, असेही मुख्यमंत्री म्हणाले. शिवाय ट्रांझीट कॅम्पमध्ये बेकायदा राहणाऱ्यांच्या संबंधी अनेक आमदार प्रश्न विचारत आहेत; त्यासाठी ट्रांझीट कॅम्पच्या संबंधी स्वतंत्र लक्षवेधी लावा, असेही मुख्यमंत्र्यांनीच सुचवले.दुर्घटनेची होती भीती- भाजपाचे अतुल भातखळकर यांनी लक्षवेधी उपस्थित केली होती. मुंबई शहर व उपनगरातील मोडकळीस आलेल्या इमारतींमधील रहिवाश्यांना महानगरपालिकेच्या नियम ३५४ नुसार घरे रिकामे करण्याच्या नोटीसा बजावल्या आहेत; मात्र अशा इमारतींमधील रहिवाशांना पुन्हा आपले हक्काचे घर मिळेल याची कोणतीच शाश्वती नसल्यामुळे रहिवासी घर सोडायला तयार होत नाहीत. त्यामुळे अशा इमारती कोसळून दुर्घटना घडतात, असेही भातखळकर म्हणाले. या चर्चेत आ. आशिष शेलार, आ. योगेश सागर, आ. मंगलप्रभात लोढा, आ. राज पुरोहित आदींनीही भाग घेतला.