शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

पंढरपुरात मुख्यमंत्र्यांना पूजेसाठी विरोध करणे चूकीचे; चर्चेतून मार्ग काढू - चंद्रकांत दादा पाटील  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2018 20:32 IST

मराठा समाजाने केलेल्या प्रत्येक मागणीची पूर्तता शासन पातळीवर करण्यात आली आहे तसेच  र्वरीत  मागण्यांसाठी ही प्रयत्नही सुरू आहेत.

मुंबई - मराठा समाजाने केलेल्या प्रत्येक मागणीची पूर्तता शासन पातळीवर करण्यात आली आहे तसेच  र्वरीत  मागण्यांसाठी ही प्रयत्नही सुरू आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, ही शासनाची भूमिका आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सारेजण प्रयत्न करत आहोत. मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करत असतानाही पंढरपुरात मुख्यमंत्र्यांना शासकीय महापूजेला विरोध करणे उचित ठरणार नाही. यासाठी विरोध न करता चर्चेतूनच मार्ग काढावा असे आवाहन राज्याचे महसूल मंत्री माननीय चंद्रकांतदादा पाटील यांनी केले आहे.

महसूल मंत्री  चंद्रकांत दादा पाटील म्हणाले, मराठा समाजाने आपल्या मागण्यासाठी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने मूक मोर्चे काढून आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधले. सगळ्या जगाला आदर्श होईल, अशा पद्धतीने हे मोर्चे काढून त्यांनी सरकारसमोर मागण्या ठेवल्या. या मागण्यांचा विचार करत सरकारने वेळोवेळी निर्णय घेत या मागण्या मान्य केल्या. शिष्यवृत्ती मधील सवलत, वसतिगृहांमधील सवलत, नोकऱ्यांमध्ये तसेच शिक्षणात आरक्षण यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. न्यायालयात ही मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात सरकार भक्कमपणे बाजू मांडत आहे. मराठा समाजाच्या प्रत्येक मागण्या पुर्ण करण्यात आले आहेत. न्यायालयातील बाबीदेखील सरकारची बाजू कशी बरोबर आहे, हे सांगण्याचे काम केले जात आहे. 

क्रांती मोर्चा नंतर मराठा समाजाच्या आरक्षणाचा मागण्या पूर्ण करण्यास सरकार कटिबद्ध आहे व प्रमुख मागण्यांपैकी बहुतांश मागण्या पूर्ण ही करण्यात आल्या आहेत. नुकतीच विधानसभेत माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी नोकर भरती देखील मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देणार असल्याचे जाहीर केले. यावरूनच मुख्यमंत्र्यांचं सरकार मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करत असल्याचे दिसून येत आहे.  मराठा समाजाच्या मागणीसाठी उपसमितीची देखील नेमणूक करण्यात आली असून स्वतः मी अध्यक्ष या नात्याने याची कामकाज अत्यंत जलदगतीने व वेगाने होण्यासाठी प्रयत्न करत आहे. सरकारने मराठा समाजाच्या विकासासाठी 450 कोटी रुपयांची तरतूद केली आहे तसेच आण्णासाहेब विकास महामंडळाच्या माध्यमातून आर्थिक उन्नतीसाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता आणि कौशल्य विकास योजना देखील मराठा समाजातील तरुण तरुणींसाठी लागू केली आहे.

मागण्या पूर्ण होत असताना पंढरपुरात मुख्यमंत्र्यांना शासकीय पूजेला विरोध करणे उचित ठरणार नाही. आपल्या अजूनही काही मागण्या असल्यास त्यासाठी सरकार चर्चेस तयार आहे व त्या मागण्या पूर्ण करण्याचा आटोकाट प्रयत्न करील. त्यामुळे विरोध करण्यापेक्षा चर्चा करून मार्ग निघू शकतो.  

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटील