शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

मुख्यमंत्री, MPSC अन् निवडणूक आयोग...; ट्रोलिंगनंतर एकनाथ शिंदेंनी दिली कबुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2023 08:41 IST

‘ही पद्धत २०२५ पासून लागू करण्याची मागणी होती, त्याप्रमाणे निवडणूक आयोगाला आम्ही पत्र लिहिले आहे, कळवले आहे असं मुख्यमंत्री म्हणाले होते.

मुंबई - एमपीएससी परीक्षेच्या नवीन पेपर पॅटर्नविरोधात विद्यार्थ्यांनी सध्या आक्रमक पवित्रा घेतला आहे. नवीन पेपर पॅटर्न २०२५ पासून लागू करण्याची मागणी विद्यार्थ्यांची आहे. याबाबत बुधवारी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. पण, महाराष्ट्र लोकसेवा आयोग बोलण्याऐवजी चुकून ते निवडणूक आयोग म्हणाले आणि नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आले.

‘ही पद्धत २०२५ पासून लागू करण्याची मागणी होती, त्याप्रमाणे निवडणूक आयोगाला आम्ही पत्र लिहिले आहे, कळवले आहे. निवडणूक आयोगाकडून सकारात्मक निर्णय अपेक्षित आहे. कालही पुन्हा पत्र दिले आहे आणि एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या भूमिकेसोबत सरकार सहमत आहे,’ असे ते म्हणाले. अलीकडेच निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्हदेखील शिंदे गटाला देण्याचा महत्त्वाचा निर्णय दिल्यामुळे आयोगाबाबत चर्चा असतानाच शिंदे यांनी हे अजब वक्तव्य केल्यामुळे व्हिडीओ लगेच व्हायरल झाला. लागलीच राष्ट्रवादी काँग्रेसने व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट केला आणि ‘यांना उठता, बसता, खाता, पिता, झोपता, जागता, जाता, येता, बोलता फक्त आणि फक्त निवडणूक आयोगच दिसतो वाटतं, मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांचे निवेदन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला देण्याऐवजी निवडणूक आयोगाला पाठवले, यातच सगळे आले,’ अशी खोचक टीका केली.  

व्हिडीओ व्हायरल होत असून, आता एमपीएससीचा निकालही निवडणूक आयोग देणार वाटते, अशी चर्चा सुरू आहे. मात्र या व्हिडिओवरून मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, एमपीएससीच्या प्रश्नावर निवडणूक आयोग हे माझ्याकडून अनावधानाने झाले आहे. नेहमी निवडणूक आयोग, कोर्ट अशा गोष्टी चालू असल्यामुळे असे म्हणले गेले असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेMPSC examएमपीएससी परीक्षाElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग