शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

मुख्यमंत्र्यांना येतोय ‘मारुतीच्या बेंबी’चा अनुभव

By admin | Updated: July 26, 2015 02:43 IST

मुख्यमंत्रिपद खूप मोठे असले तरी या पदाच्या निमित्ताने येणारे ताणतणाव, व्यग्रता यातून ते फारसे सुखावह नाही तर प्रत्येक क्षणी जबाबदारीची जाणीव करून देणारे असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : मुख्यमंत्रिपद खूप मोठे असले तरी या पदाच्या निमित्ताने येणारे ताणतणाव, व्यग्रता यातून ते फारसे सुखावह नाही तर प्रत्येक क्षणी जबाबदारीची जाणीव करून देणारे असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाटते. अशीच भावना त्यांनी एक वऱ्हाडी कविता अन् मारुतीच्या बेंबीची गोष्ट ऐकवत सांगितली तेव्हा पत्रकार हास्यात बुडाले. आमदार ते मुख्यमंत्री या बदलाकडे कसे बघता, या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी प्रख्यात वऱ्हाडी कवी प्रा. देविदास सोटे यांच्या कवितेतील, ‘ये न्न रे बाबू खेन्नं रे गोया, आता काऊन म्हनतं फुटला डोया’, ही ओळ ऐकविली. एकदा पद स्वीकारल्यानंतर मुख्यमंत्रिपदाची खेळी चांगली खेळावीच लागेल. कारणे देता येणार नाहीत आणि मी ती देणारही नाही, असे सुचवत ते म्हणाले की, मारुतीच्या बेंबीत बोट टाकल्यानंतर विंचू चावलेला माणूस त्याला थंड वाटते, असे सांगतो पण त्याच्या वेदना त्यालाच कळतात; मुख्यमंत्रिपदाचेही तसेच आहे.मुख्यमंत्र्यांना फाइलवर सही करण्यासाठी किंवा न करण्यासाठीही आमिषे असतात, असे बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री असताना म्हणाले होते. आपला अनुभव काय या प्रश्नावर मुख्यमंत्री म्हणाले की, आमिषे देणाऱ्यांची माझ्याकडे येण्याची हिंमत होत नाही. मुलाखत अजून वाचली नाहीशिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी, पक्षाच्या मुखपत्रातून राज्य सरकारवरही तोफ डागली असून स्वबळाची भाषा केली आहे, याबाबत विचारले असता मुख्यमंत्र्यांनी शिताफीने सुटका करवून घेतली. ‘गेले काही दिवस अधिवेशनात व्यग्र असल्याने मला वृत्तपत्र वाचायला वेळ मिळाला नाही. आता दोन दिवसांच्या सुटीत वाचतो’ असे सांगून त्यांनी प्रश्नाला बगल दिली.सरपंचपदाची थेट निवडणूकसरपंच आणि उपसरपंच यांची निवड जनतेतून व्हावी, असा सरकारचा विचार आहे. तसेच दोन्ही पदांना काही जादा अधिकार दिले जातील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. महापौरपदाची थेट निवडणूक होण्याची शक्यता त्यांनी फेटाळली. नगराध्यक्षांचे चेकवरील सह्यांचे अधिकार काढून घेण्याचा राज्य सरकारचा निर्णय योग्यच आहे. कोणत्याही लोकप्रतिनिधीला अगदी मुख्यमंत्र्यांनाही तसे अधिकार नसतात, असे त्यांनी स्पष्ट केले. विधान परिषद सभागृहाचे अस्तित्व असले पाहिजे, असे मत व्यक्त करून ते म्हणाले की, राज्याच्या हिताचे निर्णय अडविण्याची भूमिका मात्र घेतली जाऊ नये.