शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
2
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
3
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
4
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
5
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
6
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
7
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
8
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
9
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
10
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
11
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
12
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
13
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
14
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश
15
31 जुलैपासून सुरू होणार 'या' कंपनीचा कार प्लांट, दर वर्षी बाहेर पडणार 1.50 लाख इलेक्ट्रिक कार!
16
'ऑपरेशन सिंदूर' अजून संपले नाही; CDS जनरल अनिल चौहान यांचे मोठे विधान
17
Sex Racket: फाइव्ह स्टार हॉटेल आणि हाय- प्रोफाइल विदेशी महिला; मुंबईतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश!
18
Shravan 2025: पौराणिक कथांच्या शेवटी 'साठा उत्तराची कहाणी... सुफळ संपूर्ण' असं का म्हणतात?
19
तुमच्या PF खात्यात पैसे नसले तरीही नॉमिनीला आता थेट ५०,००० मिळतील; EPFO ने 'हे' नियम बदलले
20
Walmik Karad : 'धनंजय मुंडेंना संपवून वाल्मिक कराडला पोटनिवडणूक घ्यायची होती'; बाळा बांगरांचा गंभीर आरोप

मुख्यमंत्र्यांना येतोय ‘मारुतीच्या बेंबी’चा अनुभव

By admin | Updated: July 26, 2015 02:43 IST

मुख्यमंत्रिपद खूप मोठे असले तरी या पदाच्या निमित्ताने येणारे ताणतणाव, व्यग्रता यातून ते फारसे सुखावह नाही तर प्रत्येक क्षणी जबाबदारीची जाणीव करून देणारे असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : मुख्यमंत्रिपद खूप मोठे असले तरी या पदाच्या निमित्ताने येणारे ताणतणाव, व्यग्रता यातून ते फारसे सुखावह नाही तर प्रत्येक क्षणी जबाबदारीची जाणीव करून देणारे असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाटते. अशीच भावना त्यांनी एक वऱ्हाडी कविता अन् मारुतीच्या बेंबीची गोष्ट ऐकवत सांगितली तेव्हा पत्रकार हास्यात बुडाले. आमदार ते मुख्यमंत्री या बदलाकडे कसे बघता, या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी प्रख्यात वऱ्हाडी कवी प्रा. देविदास सोटे यांच्या कवितेतील, ‘ये न्न रे बाबू खेन्नं रे गोया, आता काऊन म्हनतं फुटला डोया’, ही ओळ ऐकविली. एकदा पद स्वीकारल्यानंतर मुख्यमंत्रिपदाची खेळी चांगली खेळावीच लागेल. कारणे देता येणार नाहीत आणि मी ती देणारही नाही, असे सुचवत ते म्हणाले की, मारुतीच्या बेंबीत बोट टाकल्यानंतर विंचू चावलेला माणूस त्याला थंड वाटते, असे सांगतो पण त्याच्या वेदना त्यालाच कळतात; मुख्यमंत्रिपदाचेही तसेच आहे.मुख्यमंत्र्यांना फाइलवर सही करण्यासाठी किंवा न करण्यासाठीही आमिषे असतात, असे बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री असताना म्हणाले होते. आपला अनुभव काय या प्रश्नावर मुख्यमंत्री म्हणाले की, आमिषे देणाऱ्यांची माझ्याकडे येण्याची हिंमत होत नाही. मुलाखत अजून वाचली नाहीशिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी, पक्षाच्या मुखपत्रातून राज्य सरकारवरही तोफ डागली असून स्वबळाची भाषा केली आहे, याबाबत विचारले असता मुख्यमंत्र्यांनी शिताफीने सुटका करवून घेतली. ‘गेले काही दिवस अधिवेशनात व्यग्र असल्याने मला वृत्तपत्र वाचायला वेळ मिळाला नाही. आता दोन दिवसांच्या सुटीत वाचतो’ असे सांगून त्यांनी प्रश्नाला बगल दिली.सरपंचपदाची थेट निवडणूकसरपंच आणि उपसरपंच यांची निवड जनतेतून व्हावी, असा सरकारचा विचार आहे. तसेच दोन्ही पदांना काही जादा अधिकार दिले जातील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. महापौरपदाची थेट निवडणूक होण्याची शक्यता त्यांनी फेटाळली. नगराध्यक्षांचे चेकवरील सह्यांचे अधिकार काढून घेण्याचा राज्य सरकारचा निर्णय योग्यच आहे. कोणत्याही लोकप्रतिनिधीला अगदी मुख्यमंत्र्यांनाही तसे अधिकार नसतात, असे त्यांनी स्पष्ट केले. विधान परिषद सभागृहाचे अस्तित्व असले पाहिजे, असे मत व्यक्त करून ते म्हणाले की, राज्याच्या हिताचे निर्णय अडविण्याची भूमिका मात्र घेतली जाऊ नये.